Category: ठाणे

Thane news

मालमत्ता कर भरा, अन्यथा जप्तीच्या कारवाईला सामोरे जा!

मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटिसा मुंबई : आर्थिक क्षमता असूनही दिलेल्या मुदतीत करभरणाकरण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. विहित मुदतीत त्यांनी कर भरणा न केल्यास मुंबई पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाईल, असे या नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यातर्फे मुंबई शहर आणि उपनगरांमधील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व विभागांमध्ये कर भरण्याची सोय करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न १)  एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. २) पालिकेने २०२३-२४ मालमत्ता कर देयके ऑनलाइन उपलब्ध करून दिली असून, ती ई-मेलद्वारेही पाठवली जात आहेत. एकूण ९ लाख २२ हजार देयके पाठवण्यात आली आहेत. कशी होते पालिकेची कारवाई? मालमत्ता कर हा मुंबई पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने कारवाई होते. मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. मालमत्ताधारकास २१ दिवसांची नोटीस मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते; मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत मालमत्ता कर न भरणाऱ्यांची यादी वाढतच आहे. या कालावधीत दोन ते अडीच हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. ही रक्कम दोन हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. यादीतील पहिल्या १०० थकबाकीदारांची रक्कमच १ हजार ३०० कोटी रुपये आहे. आणखी ७५० कोटी रुपयांची भर थकबाकीपोटी पालिकेच्या तिजोरीत आधीच ७०२ कोटी रुपये जमा झाले होते. २६ फेब्रुवारीपासून नवीन देयके पाठवल्यापासून ते आत्तापर्यंत त्यात आणखी ७५० कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.

 ज्युनियर गटात ठाण्याचे वर्चस्व

 श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटी ट्रस्ट आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ डेरवण (चिपळूण) : येथे सुरु असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२४  स्पर्धेत चौथ्या  दिवशी  खो खो मध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात राजेंद्र विद्यालय, खंडाळा…

मातोश्री गंगुबाई शिंदे रुग्णालयात दोघींवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

ठाण्यात गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबोटिक शस्त्रक्रिया होतेय मोफत ठाणे : ठाण्याच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजु महिला रुग्णांवर रोबोटिक मशिनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडु फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नविन रोबोटीक तंत्रज्ञानाचे तसेच, गंगुबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काऊंटर नसलेले गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात तब्बल १२ कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशिन नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. या मशिनद्वारे बदलापुर येथील पुष्पा केदारे ५० वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. केदारे यांना गेल्या तीन वर्षापासुन संधीवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्रास होत होता.तर, भिवंडीच्या बेबी गायकवाड ६६ वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकाच्या संदर्भाने गंगुबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भुलतज्ज्ञ डॉ.अक्षय राऊत, अस्थीतज्ज्ञ डॉ. सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया  नुकत्याच केल्या. याकामी रोबोटीक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक साह्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले.रोबोटीक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागला. एरव्ही मॅन्युअली ऑर्थोपेडीक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशिनद्वारे केलेल्या शस्त्रकियेमध्ये टाळता येतात. या मशिनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्त्राव देखील कमीतकमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले. गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णाच्या संपुर्ण शरीराचे सिटी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशिनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे तयारी केली जाते. रोबोट, पेन्डन्ट, ओटीएस, सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वतः ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. दोनच दिवसात रुग्ण चालु लागतो. – डॉ.सचिन पांडे, ऑर्थोपेडीक सर्जन ठाण्यात गेली दोन वर्ष सुरू असलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये रुग्णाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिधापत्रिका धारक गरीब रुग्णांवर अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया तसेच सर्व औषधोपचार इथे मोफत केला जातो. नुकतेच दोन महिला रुग्णावर रोबोटीक शस्त्रक्रिया करून गुडघ्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. – डॉ. जालंदर भोर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कै.गंगुबाई शिंदे रुग्णालय.

जिल्हा परिषदेचे तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिर संपन्न

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजित करणे या योजनेअंतर्गत तालूकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण, तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता जिल्हास्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य विषय जागृकता निर्माण करण्यासाठी तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिरात एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ दिला गेला. आरोग्य संबंधित माहिती, सेवा रुग्णांना देणे ही खरी गरज आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. डॉ. अशोक नांदापूरकर उप संचालक मुंबई मंडळ ठाणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर, भास्कर रेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड आणि डॉ. अभिजीत वानखेडे आणि यांच्या सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी मोलाचे योगदान देत शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्री रुग्ण 28, हृदयरोग 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग 39, पोटाचे विकार 31, नाक कान घसा 50, रक्तदाब 200, मधुमेह 94, रक्त लघवी 25, ईसीजी 25, ब्रेस्ट कॅन्सर साठीची मॅमोग्राफी  30 लाभार्थ्यांची करण्यात आली व इतर 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिराकरिता हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित बोबडे, न्यूरोलॉजिस्ट डॉ. डॉ दिलराज कडलस, बालरोग तज्ञ डॉ. श्याम राठोड,  स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढीये, , नेत्ररोग तज्ञ डॉ. देवयानी बढीये, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रशांत जावळे, कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव किरपण, दंततज्ञ डॉ. वर्षा चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. विशाल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली रोडगे, नेत्रचिकित्सा अधिकारी विठ्ठल बडीये, जनरल फिजीशियन डॉ. हिरामण साबळे उपस्थित होते. यावेळी अधिकारी, तालुकास्तरीय समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता समोर येत आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : जगाला पारदर्शी कारभाराचे बौद्धीक देणा-या भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता हळूहळू समोर येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, इंडिया आघाडीचे प्रवक्ते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. ‘इलेक्ट्रोल बॉन्ड’च्या माध्यमातून धनधांडग्यांच्या मानेवर सुरी ठेवल्यानंतर भाजपने सामान्य-गोरगरीब जनतेच्या नकळत त्यांच्या खात्यातून सरकारी योजनांसाठी पैसे वळते केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी बँक कर्मचा-यांना हाताशी घेऊन हा घोटाळा करण्यात आला आहे. लोकांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना सरकारी योजनांचा भाग केले गेले आणि लोकांच्याच टॅक्सचा पैसा वापरून भाजपची प्रतिमा उजळवण्यासाठी सरकारी जाहीरातींवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत एप्रिल २०२३ पर्यंत अनुक्रमे १६.२३ कोटी आणि ३४.१८ कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची आकडेवारी सांगितली जात असली तरी यातील बहुतांश लोकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून योजनांसाठी पैस काढले गेले आहेत. लोकांच्या खात्यातून सरकारी योजनांकडे हे पैसे वळते करण्याचे आदेश वरून देण्यात आले असल्याची कबुली स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकांच्या कर्मचा-यांनी दिली आहे. ‘Article 14’ या पोर्टलच्या @HemantGairola25 यांनी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये, कशाप्रकारे खुलेआमपणे लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला याची इत्यंभूत माहिती आकडेवारी सहित देण्यात आली आहे. article-14.com/post/banks-wan...मुख्य धारेतील मीडियाच्या रडारवरून भाजप विरोधी बातम्या केव्हाच गायब झाल्या आहेत. पण भाजपवाले आणि गोदी मीडियावाले एक गोष्ट विसरतात ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर ट्विट करताना म्हटले आहे.

अश्विन शेळकेचा अष्टपैलू खेळ

४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : अश्विन शेळकेचा अष्टपैलू खळे आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या  अरमान पठाणच्या मोलाच्या योगदानामुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने बिनेट कम्युनिकेशन संघाचा चार विकेट्सनी पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील की गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. बिनेट कम्युनिकेशन संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने ३५ षटकात १७७ धावा करत विजय निश्चित केला. युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टॉस जिकंत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. भूषण शिंदेने आक्रमक फलंदाजी करत ४३ धावांसह बिनेट कम्युनिकेशन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दीपक भोगलेने ३१, सिद्धार्थ घुलेने २५ आणि सागर मुळयेने २४ धावा बनवत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. अश्विन शेळके आणि पार्थ चंदनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. अरमान पठाण आणि ओमर पटनीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना अश्विनने २५ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी करत युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. अर्धशतकापासून वंचीत राहिलेल्या अश्विनने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. अरमान पठाणने ३२ धावा केल्या. सिद्धार्थ घुलेने दोन गडी बाद केले. तर सिद्धार्थ नरसिम्हा, प्रथमेश बेलछेडा आणि दिपक भोगलेने  प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : बिनेट कम्युनिकेशन : ३४ षटकात सर्वबाद १७५ ( भूषण शिंदे ४३, दिपक भोगले ३१, सिद्धार्थ घुले २५, सागर मुळये २४, अश्विन शेळके ७-३१-३, पार्थ चंदन ७-४२-३, अरमान पठाण ७-२४-२, ओमर पटनी ६-२७-२) पराभूत विरुद्ध  युनायटेड पटनी इंडस्ट्रीज : ३३.४ षटकात ६ बाद १७७ ( अश्विन शेळके नाबाद ४७ , अरमान पठाण ३२, सिद्धार्थ घुले ७-१-३०-२, सिद्धार्थ नरसिम्हा २.४- २४-१, प्रथमेश बेलछेडा ७-३०-१, दिपक भोगले ७-३२-१).

आपण सर्व माणूस होवूयात…!

विशेष मनोज शिवाजी सानप शहरातील एका चर्चित दुकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात ७० – ७५च्या वयाची म्हातारी स्त्री…

मुख्यमंत्री शिंदेनी लुटला नातवासोबत धुळवडीचा आनंद

ठाणे: होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात. त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करू या. असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित…

उद्धव ठाकरेंकडून आज उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असून ज्या जागांवर एकमत झाल्या आहेत त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटांच्या जागांची घोषणा आज उद्धव ठाकरे करणार आहेत. तशी माहिती उद्धव…