Category: ठाणे

Thane news

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत

लाखो नागरिकांना दूषित पाणी उल्हासनगर : शहरातील खेमानी नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लॉ होऊन उल्हास नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित असल्याची ओरड सुरू झाली. उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. उल्हासनगर संच्युरी कंपनी जवळून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करते. नेमके त्याच ठिकाणी शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा लाखो नागरिकाला होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्यावर, महापालिकेने खेमानी नाल्याचे पाणी विहिरीत अडविले जाते. अडविले पाणी पंपिंग करून शांतीनगर मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून नदी खाडीत सोडले जाते. यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. नाल्याचे सांडपाणी अडवलेल्या ठिकाणी तुंबून ओव्हरफ्लॉ होत नदी पात्रात जात असल्याचे चित्र आहे. यावर महापालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थेकडून होत आहे. शहरातील खेमानी नाल्या प्रमाणे, म्हारळगावातून येणारा सांडपाणी नाला खेमानी नाल्यापुर्वी उल्हास नदीला मिळून नदीचे पाणी प्रदूषित करीत आहे. त्या नाल्याचे पाणी अडवून, त्यावर प्रक्रिया करून नदी ऐवजी नदी खाडीत पंपिंगद्वारे सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खेमानी नाल्याचे पाणी ज्याठिकाणी अडविले आहे. त्याठिकाणी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी एक लोखंडी जाळी बसविली आहे. त्या जाळीला कचरा अडकुन पाणी ओव्हरफ्लॉ होऊन नदीत जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

साहित्यिकांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने लिहावे – कृष्णात खोत

ठाणे : लेखक आणि कवींनी कुठल्याही काळात सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या बाजूने असले पाहिजे. सत्याचे लेखन हाच त्यांचा धर्म, तीच त्यांची जात असली पाहिजे. आत्मविस्थापनाच्या सद्ध्याच्या दुर्दैवी काळात तर लिहिणाऱ्या हातांनी निर्भयपणे लिहीत रहायला हवे. स्वतःला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारत रहायला हवेत असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनाचे दुसरे पुष्प कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्काराच्या वितरणाने गुंफले गेले. शनिवारी वा. अ. रेगे सभागृहात खोत यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले. सत्तेचे ढोंग फाडण्याचे काम च्हित्यिक करत असतो. कोणताही साहित्यिक हा लोकशाही वादी असतो त्यात जास्त लोकशाही वादी हा कादंबरीकार असतो कारण तो अल्पमतवादी असतो. तो एकट्या माणसाचे सत्य घेऊन लढत असतो. लिहीणारा माणूस हा नेहमी शेवटच्या हबाकावर बसलेलेा असतो. सामान्यांचा आवाज पोहोचवण्याची ताकद लेखकात असते. राजाला लेखकाची भिती वाटत असते. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व लेखक, कवीने करावे तेव्हाच सामान्य माणसांचा चेहरा वाचता येतो. लेखकाने सभ्यतेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. जेत्यांचा इतिहास लिहीताना पराजितांच्या इतिहासाकडे देखील बाकराने पहावे. मानवता, करुणा याकडे देखील लेखकाचे लक्ष हवे. धर्म म्हणजेच सत्य यापलिकडे काही नाही अशी त्याची भूमिका असावी. धर्म हा उंबराच्या आत आणि उंबराच्या बाहेर आल्यावरमानवतेचा, भूतदयेचा धर्म लेखकाने पाळावा. मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे यावर लेखकाचा विश्वास असला पाहिजे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे प्र.संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, २०२४ पासून ज्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात त्या साहित्यकृतींचा समावेश शासनाच्या ग्रंथालयात केला जाणार आहे. शासकीय ग्रंथालये देखील आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत. ४७ लाख शासनमान्य ग्रंथ शासनाकडे असून त्यापैकी ३० लाख ग्रथांची नोंदणी ई प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, १०० हून अधिक वर्षे झालेल्या पुस्तकांचे शासनाच्या माध्यमातून डिजीटायझेशन करुन ती पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ललित गटात वैभव साटम लिखीत भावकी अन गावकी तर ललितेतर गटात रुपाली मोकाशी लिखीत श्रीस्थानकाचे शीलेहार यांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय साहित्य पुरक्साराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डावीकडून ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, दा.कृ. सोमण, ठाणेकर, गाडेकर, खोत, विश्वस्त मकरंद रेगे, हेमंत काणे आणि विनायक गोखले आदी उपस्थित होते. वृंदा दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

गुजरातमधील पर्यटक बोर्डी समुद्रकिनाऱ्यावर

बोर्डी : राज्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव आणि नारगोल समुद्रकिनारी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ आता बोर्डी या निसर्गरम्य समुद्रकिनारी, तसेच येथील वॉटरपार्कमध्ये वाढला आहे. आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने कोणत्याही वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील बहुसंख्य पर्यटन केंद्रावर पर्यटकांना जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. गुजरात राज्यातील वापी, सुरत, तसेच अन्य शहरांमध्ये प्रचंड तापमान वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळावा, म्हणून त्या भागातील ग्रामस्थ पर्यटनाचा व थोडाफार थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी उंबरगाव, नारगोल, तसेच अन्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पर्यटनाचा ओघ वाढला होता; मात्र १ जूनपासून गुजरात प्रशासनाने राज्यातील पर्यटकांवर समुद्रकिनारी जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. हे नागरिक बोर्डी परिसरातील वॉटरपार्क, तसेच समुद्रकिनारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे बोर्डी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

‘राजावाडी’च्या शवविच्छेदन केंद्राचे काम पूर्ण

मृतांच्या नातेवाईकांसाठी पाणपोई व इतर सुविधा घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः घाटकोपर येथील राज्य सरकारच्या अखत्यारीतील राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राची मोडकळीस आलेली इमारत, शवविच्छेदन सुरू असताना नातेवाईकांना बसायला नसलेली जागा, पाणपोई आदी सुविधा आता निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर या केंद्राला आता नवी झळाळी मिळाली आहे. पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळील हे शवविच्छेदन केंद्र फारच जुने होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मोडकळीस आलेली इमारत, छत कोसळण्याचे प्रकार, मृतांच्या नातेवाईकांची आसन व्यवस्‍था, पिण्याचे पाणी, अस्‍वच्छता, कमी मनुष्यबळ अशा तक्रारींत वाढ झाली होती. याची दखल घेत केंद्राचे मुख्याधिकारी, पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील यांनी या ठिकाणी पाहणी करून राज्याचे वैद्यकीय उपसंचालक यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता. दररोज ४० मृतदेहांची चिकित्सा घाटकोपरच्या या केंद्रावर नवी मुंबई, मुंबई उपनगरे तसेच ठाण्यापासून ते अगदी रेल्वेच्या हद्दीतील मृतांचे शवविच्छेदन केले जाते. रोज हा आकडा सरासरी ३५ ते ४० इतका असतो. मात्र त्या तुलनेत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना याचा त्रास होत होता. याची दखल घेत डॉ. पाटील यांनी पोलिस सर्जन म्हणून नागपाडा येथे पदभार घेतल्यानंतर कमी वेळेत या केंद्राचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

कल्याण लोकसभेसाठी ८४ टेबल्सवर मतमोजणी होणार

कल्याण : कल्याण लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याची मतमाेजणी डोंबिवली पूर्वेतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ४ जूनला सकाळी ८…

‘शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची दिखाव्याची कामे बंद करा!’

मनसे आमदार राजू पाटील यांची ‘एमएमआरडीए’वर टीका कल्याण : शिवसेना-भाजपवर विकास कामांच्या माध्यमातून नेहमीच टिकेची झोड उठविणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महायुतीचा धर्म बाजुला ठेऊन…

जड-अवजड वाहनांमुळे घोडबंदर मार्गावर कोंडी

एक किलोमीटर अंतर गाठण्यासाठी दोन तास ठाणे : ठाणे आणि मुंबई अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात…

जिल्हा परिषदेचे ८१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ठाणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने सेवानिवृत्त होत असलेल्या ८१ अधिकारी…

आरटीई प्रवेशासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त, ४ जूनपर्यत मुदतवाढ –  बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्ह्यात ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी…

बोराळेपाडा भागातील विद्यार्थ्यांसाठीची यांत्रिक बोट चालू स्थितीत – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेली यांत्रिक बोट सुव्यवस्थित असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम नियमितपणे सुरू होईल.…