Category: ठाणे

Thane news

शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज-मकरंद अनासपुरे

अनिल ठाणेकर ठाणे : शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास प्रसिध्द अभिनेते व नाम फाऊडेंशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच, संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ ते १२ मे दरम्यान ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतमालाला हमी भाव मिळण्याची गरज आहेच, त्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला, फळे थेट ग्राहकांना थेट मिळावीत, आणि त्यासाठी दलालाची फळी तोडून ग्राहक आणि शेतकरी यांच्यात हा पूल या महोत्सवाच्या माध्यमातून तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांशी यानिमित्ताने संवाद होतो, त्यांच्या समस्या जाणून घेता येतात, यासाठी गेली १२ वर्षे मी या महोत्सवाला भेट देत असल्याचे मकरंद अनासपुरे म्हणाले. गेल्या ५ वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने शेतकर्यांना सुलतानी नाही तर अस्मानी संकटाचाही सामना करावा लागतो आहे, गेल्या २- ३ कोकणात आलेल्या मोठ्या वादळांचा सामना कोकणातील शेतकऱ्यांनी केला आहे, मात्र अशा अस्मानी संकटांनी कोकणातील शेतकरी मोडून पडत नाहीत, ते पुन्हा उभे रहातात, आणि जोमाने कामाला लागतात, त्यामुळे मला कोकणच्या शेतकऱ्यांचे कौतुक वाटते असे मकरंद अनासपुरे यांनी केले. संस्कार संस्थेचे अध्यक्ष व आंबा महोत्सवाचे संयोजक आमदार संजय केळकर यांच्यासह मकरंद अनासपुरे यांनी या महोत्सवास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोकणातील भूमिपुत्रांच्या आंब्याना शहरात बाजारपेठ मिळावी, यासाठी आमदार संजय केळकर हा महोत्सव गेली कित्येक वर्ष भरवत आहे, नाम फाऊडेंशनची सुरवात होती, तेव्हा मराठवाड्याच्या शेतकर्यांच्या धान्याचे स्टॉल या महोत्सवात लावू द्यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांच्याकडे केली होती, त्यावेळी त्यांनी या महोत्सवात मराठवाड्यातल्या शेतकर्यांचे १५ स्टॉल लावले होते, १० दिवसात २५ टन धान्यांची विक्री झाल्याची आठवण अनासपुरे यांनी सांगितली.    शेतकर्यांना, भूमिपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी आमदार केळकर यांची धडपड सुरू असते, या महोत्सवात विक्रीसाठी येणारा आंबा हा नैसर्गिक, सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला दर्जेदार असतो. या महोत्सवाच्या माध्यमातून , इंडिया विरूध्द भारत यांच्यातील पुल सांधण्यासाठी असे महोत्सव गरजेचे आहे, असे मत अनासपुरे यांनी व्यक्त केले. मी स्वतः ग्रामीण भागातून शहरात आलो आहे, त्यामुळे मला माझ्या गावकडचे धान्य,नैसर्गिक पध्दतीने पिकवलेले फळे मला शहरात मिळावीत, याचा शोध मी घेत असतो, त्यामुळे नैसर्गिक, सेंद्रिय पध्दतीने पिकवलेल्या या शेतमालासाठी एकत्रित असे व्यासपीठ, बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आमदार केळकर ठाणेकरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. कोकणातील राजापूर, चिपळूण मध्ये आलेल्या महापूराने खूप नुकसान झाले होते, त्यावेळी नाम फाऊडेंशनने केवळ मदतच पोहचवली नाही तर जगबुडी, वशिष्ठी,गोदवली यासारख्या नद्यातील गाळ नाम फाऊडेंशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या मार्गदर्शनखाली काढण्याचे खूप मोठे काम नाम फाऊडेंशनने केले, त्यामुळे आता तिथे परिस्थिती सुधारत असल्याचे अनासपुरे यांनी नमूद केले. सजग नागरिकांनी या महोत्सवाला भेट देवून शेतकर्यांच्या या चळवळीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. या महोत्सवातील आंबा हा सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला आहे, या महोत्सवातील आंबा हा थेट शेतकऱ्यांच्या शेतातला,अढीतला आहे, त्यामुळे दर्जेदार आंबा आहे, १२ मे पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला आवर्जून भेट देवून शेतकर्यांच्या चळवळीला पाठिंबा द्यावा. असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, सुनील लोखंडे उपस्थित होते.

महायुतीच्या घोषणांनी शहापूर तालुका दुमदुमला

कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूरात उत्स्फूर्त प्रतिसाद शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या रॅलीला शहापूर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहापूर शहरात काढलेल्या भव्य रॅलीने शहापूर शहर…

किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न

अनिल ठाणेकर ठाणे : मुरबाड मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत सोमवारी, ५ मे ला श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. स्थानिक आमदार .किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून आणि अविरत प्रयत्नाने मुरबाड तालुक्यातील ऐतिहासिक,सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र संगमेश्वर येथील भगवान शंकर मंदिराचा जिर्णोद्धार आणि मंदिर परीसराचे सुशोभिकरण कामाचे भुमीपुजन काही काळापुर्वी संपन्न झाले होते. मंदिर जिर्णोद्धारावेळी विविध धार्मिक विधी करण्यात येतात,त्यापैकीच एक विधी म्हणजे संकोच विधी होय. सोमवारी, ५ मे २०२४ रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर मंदिराचा संकोच विधी संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किसन कथोरे आवर्जुन उपस्थित राहिले आणि त्यांनी भगवान महादेवांचे मनोभावे दर्शन घेतले.

ठाणे जिल्ह्यात १३ रणरागिणी निवडणुकीच्या रिंगणात

ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब अजमावू पाहत आहेत. त्यात अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात ७९…

भिवंडीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम राहणार 

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी एक अपक्ष तर दुसरा काँग्रेसच्या नावाने भरला होता. परंतु काँग्रेसकडुन अधिकृत उमेदवारी मिळून…

ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक पुसायचा आहे !

राजन विचारे यांना मतदारांची साथ ठाणे : महाविकास आघाडी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला मतदारांनी साथ दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ठाण्याला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. अशी साद घालत विचार यांनी आज जोरदार प्रचार केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात केलेली कामे,युद्धपातळीवर सुरू असलेली प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी मी कटिबध्द असल्याचा विश्र्वास विचारे यांनी मतदारांना दिला. यावेळी जागोजागी मतदारांनी तुफान प्रतिसाद देत विचारे यांचे स्वागत केले. त्यावेळी जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतिक राणे, जिवाजी कदम, युवासेना अधिकारी किरण जाधव, राज वर्मा, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, युवासेना आरती खळे, पूजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, कॉंग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष विक्रम खामकर, महेश म्हात्रे सरचिटणीस कॉंग्रेस, आपचे सलुजा, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून प्रचाराला सुरूवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क,आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी,वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा,राबोडी, मीनाताई ठाकरे चौक,गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर,कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका,सिविल हॉस्पिटल,उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ,खारकर आळी, सिडको, स्टेडियम ठाणा कॉलेज,खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशा परिसरातून प्रचाराची रॅली निघाली. अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड – विचारे या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. त्यामूळेच वायफळ भाषण करण्यात ते व्यस्त आहेत. मुळात लोकसभा सारख्या निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टिकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करून जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला.

धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच, मग प्रसंग खोटे कसे?

राजन विचारे यांचे मिंधेना रोखठोक प्रतिउत्तर ठाणे : प्रतिनिधी – धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक तुम्हीच होता त्यातले प्रसंग तुम्हीच दाखवले मग हे प्रसंग खोटे कसे असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्याच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २ वर्षानंतर त्यांना आपण खोटं दाखवले असल्याची कबुली देतात याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखविला असल्याचा आरोप विचारे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडा पर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.  आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते, असे देखील शिंदे म्हणाले होते, मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचेच काम शिंदे यांनी केले. ठाण्यातील सर्व यंत्रणा मिंधे तिकडे घेऊन जात असत त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या कामावर निवडून आलो आहे. शिंदे यांनी केलेले बंड फोडलेली शिवसेना हे सर्व केवळ खुर्चीसाठीच होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. यांनी केवळ सेटिंगचे राजकारण केले शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या असा सवालही त्यांनी केला. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहेत. तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचारे यांनी यावेळी व्यक्त केला. गोल्डन गॅंगचा “लीडर” म्हणून म्हस्के प्रसिद्ध नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौर पदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची आतापर्यंत प्रसिद्धी राहिली आहे. ठाणे महापालिका लुटण्याचे काम मिंधे आणि म्हस्के याने केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली त्यामुळे तुमच्या मनात दिघे यांच्यावरील प्रेम काय आहे हे जनतेला माहित आहे. शिवसेनेत मला ४० वर्ष झाली, यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आम्ही टेभी नाक्यावरील साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होतो आणि अजूनही आहोत. मला शिवसेनेत ४० वर्ष झाली या बाकीच्यांचा उदय साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, दिघे साहेबानी मोठं वादळ येऊन सुद्धा पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता. याना मात्र शिवसेना संपवायची होती असा आरोप विचारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

 महिला गटाचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

७१वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे, श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटात  कर्नाळा क्रीडा (रायगड), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे) या…

३७वी डॉ. श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धा  

ओंकार, सिद्धेश चमकले ठाणे : ओंकार करंदीकर,अश्विन माळीची गोलंदाजी आणि राहुल कश्यपच्या नाबाद खेळी मुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने रॉयल क्रिकेट क्लबचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित ३७ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समर्लिग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॊयल क्रिकेट क्लबला ६१ धावांमध्ये गुंडाळल्यावर ८.२ षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या ६४ धावांसह विजय इंदप क्रिकेट क्लबने आगेकूच कायम राखली. ओंकार करंदीकर, अश्विन माळी आणि स्वप्नील दळवीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत रॉयल क्रिकेट क्लबला ६१ धावांवर रोखले. भावेश पवारच्या २६ धावांचा अपवाद वगळता रॉयलचे इतर फलंदाज छाप पाडू शकले नाहीत. ओंकार आणि अश्विनने प्रत्येकी तीन, स्वप्नील दळवीने दोन आणि प्रतीक जयस्वालने एक गडी बाद केला. त्यानंतर राहुल कश्यपच्या नाबाद ३२ धावांमुळे विजय इंदप क्रिकेट क्लबने ८  गडी राखून पराभव केला. सिद्धेश भगतने १३ धावा केल्या. संक्षिप्त धावफलक : रॉयल क्रिकेट क्लब : १५.४ षटकात सर्वबाद ६१(भावेश पवार २६, ओंकार करंदीकर ४-११-३, अश्विन माळी ४-१५-३ स्वप्नील दळवी ०.४- १-२) पराभूत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट क्लब : ८.२ षटकात २ बाद ६४ ( राहुल कश्यप नाबाद ३२, सिद्धेश भगत १३, राहुल म्हात्रे २-२१-१, गणेश मोरे ३-१८-१).

रिपाइं (आठवले) जिल्हा महिलाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

अनिल ठाणेकर ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला ठाण्यात मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रिपाइंच्या ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा मनिषा करलाद  यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी विटावा येथे सभेचे आयोजन केले होते. या सभेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मनिषा करलाद यांनी विटावा, रेतीबंदर, माजीवडा आदी भागातील कार्यकर्त्यांसह हा पक्ष प्रवेश केला. रामदास आठवले हे भाजप सोबत गेले आहेत. सध्या भाजपकडून संविधानविरोधी भूमिका घेतली जात आहे. त्याविरोधात लढण्याची भूमिका घेण्याऐवजी आठवले भाजपला साथ देत असल्याने आपण संविधान रक्षणासाठी शरदचंद्र पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम करणार आहोत, असे करलाद यांनी सांगितले. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करलाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान,  मनिषा करलाद आणि त्यांचे दिवंगत पती गणपत करलाद हे दलित पँथर पासून आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. नामांतर लढा, रिडल्स आदी आंदोलनात हे दाम्पत्य सक्रीय होते. गणपत करलाद यांच्या निधनानंतर मनिषा करलाद यांनी ही परंपरा सुरू ठेवली होती. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विटावा परिसरातील ताकद अधिकच वाढली आहे.