Category: ठाणे

Thane news

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

ठाणे : केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवरी या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम १४ दिवस राबवण्यात येणार आहे. कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासंदर्भांत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. गीता काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला निर्देशित केले आहे. समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध पथकांमार्फत घेवून त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने कुष्ठरोग अभियान सुरु केले आहे. ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२५ अखेर ७११ कुष्ठ रुग्णांची नोंद कुष्ठरोग विभागाने केली आहे. वेदना नसल्याने अनेकवेळा रुग्ण या आजाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळेत निदान करण्यासाठी कुष्ठरोग विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोग विषयी जनजागृती करणे, हे या मोहिमेच मुख्य उद्दीष्ट आहे. या बाबत जिल्हा समन्वय समितीची सभा १३ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील मनुष्य बळाची माहिती घेवून त्यानुसार सूक्ष्म कृती आराखडा बनवुन त्याप्रमाणे कुष्ठरोग शोध मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील २६ लाख ८४ हजार ८९४ तर शहरी भागातील १४ लाख ६४ हजार ०४१ निवडलेल्या जोखीम ग्रस्त भागातील एकूण ४१ लाख ४८ हजार ९३५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि मोहिमेचे सर्व स्तरावर प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी २ हजार ५३२ गटांकडून काम करण्यात येणार आहे. चौकट कुष्ठरोगाची लक्षणे :- कुष्ठरोग जिवाणूमुळे होणारा सांसर्गिक आजार आहे. अंगावर असणारा फिक्कट, लालसर रंगाचा बधिर चट्टा व हाता पायामध्ये अशक्तपणा येणे ही कुष्ठरोगाची प्रमुख लक्षणे आहेत.कानाच्या पळया जाड होणे व चेहरा लालसर, तेलकट व जाड होणे. त्वचेशी संलग्न मज्जा जाड व दुखर्‍या होणे कुष्ठरोग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. कुष्ठरोगामुळे येणारी विकृती : Grade I विकृती : यामध्ये तळहाताला किंवा तळपायाला बधिरता येते. संवेदना नसल्याने गरम वस्तु पकडल्याने किंवा काही टोचल्याने तळ हाताला किंवा तळ पायाला जखमा पडु शकतात ज्या वर्षानुवर्षे बसत नाहीत.Grade II विकृती : या प्रकारच्या विकृती डोळ्यांनी दिसण्यासारखी असते जसे की हात पायाची बोटे वाकडी होणे, मनगट लुळे पडणे, पाय लुळा पडणे, तळहाताला तळपायाला जखमा पडणे, डोळ्यांच्या पापण्या पूर्णतः बंद न करता येणे अशा प्रकारच्या विकृती ग्रेड टु च्या कुष्ठरोगमध्ये येते कुष्ठरोग रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून अति जोखमीच्या भागात राहणार्‍या समाज घटकांना कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारीला युवासेनेतर्फे राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ – पुर्वेश सरनाईक

अनिल ठाणेकर शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे रविवार, ९ फेब्रुवारीला राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदाच्यावर्षीही या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख संपूर्ण देशभरात पसरली. सुरुवातीला सीएम एकनाथ शिंदे अर्थात कॉमन मॅन आणि आता डिसीएम एकनाथ शिंदे अर्थात डेडीकेटेड टू कॉमन मॅन ही बिरुदावली जनतेने आपसूक  दिलेली आहे. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, युवा वर्ग आणि विद्यार्थी या प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  सातत्याने करत आहेत. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. याच जाणिवेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी हा दिवस ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संकल्पनेव्दारे युवासेनेतर्फे राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या ६१ सन्मानमूर्तींमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटीत कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या ९ फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरा होत असतानाच सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याचा साहेबांचा आदर्श जोपासण्याचा निर्णय युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्यातर्फे घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भातील विस्तृत माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द

शिक्षक, मुख्याध्यापकांना मोठा दिलासा कल्याण :   मध्ये होत असलेल्या दहावी बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शिक्षण बोर्डाने घेतला आहे. यासंदर्भात राज्य…

भाजपतर्फे  नागरी सुविधा शिबिराचे आयोजन

ठाणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने रामचंद्र नगर परिसरातील जनतेसाठी नागरी सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा शुभारंभ आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या शिबिराच्या मुख्य संयोजिका ठाणे शहर भाजपच्या सरचिटणीस डॉ समीरा भारती म्हणाल्या, केंद्र शासनाने नागरिकांसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार जनतेच्या दारात जाऊन त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नविन मतदार नोंदणी, मतदार कार्डात पत्ता बदल, नविन आधारकार्ड किंवा त्यात काही बदल असतील ते, पोस्ट खात्याचा अवघ्या ५४९ रुपयांचा १० लाख रुपयांचा अपघात विमा, जेष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास दाखला-डोमीसाईल सर्टिफिकेट नागरिकांना करुन घेता येणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा नागरिकांनी अवश्य फायदा घ्यावा. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी भाजप ठाणे शहर चिटणीस ऍड तृप्ती जोशी,  लोकमान्य-सावरकर नगर मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत पडवळ  विशेष परिश्रम घेत आहेत.यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याणच्या जी प्लस हार्ट रुग्णालयात झाली अत्याधुनिक ‘मिनीमल इनव्हेसिव्ह हार्ट सर्जरी’

यशस्वी सर्जरी करणारे ठाणेपलिकडील पहिलेच रुग्णालय कल्याण  : कल्याणच्या वैद्यकीय क्षेत्रात अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपला वेगळा ठसा उमटवलेल्या जी प्लस हार्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये अतिशय परिणामकारक आणि अत्याधुनिक समजली…

कर्नाटक राज्य परिवहनच्या प्रतिष्ठित सेवेचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणार –  प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची “प्रतिष्ठित सेवा” अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे! असे कौतुकोद्गार  राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. आज बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी  त्यांच्यासोबत *कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ . रामलिंगा रेड्डी* यांच्या सह राज्याचे  परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री . नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक  यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते. या वेळी मंत्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेस ची पहाणी केली, तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. “आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे.” अशा प्रकारे बस सेवेचे  कौतुक केले . या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस  मंत्री सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये ९ मीटर पासून १५ मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या,  विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये  “वायफाय ” पासून ” युरिनल ” पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची  सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना सांगितले. दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना,संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय.ए.एस.(I.A.S.) दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच  राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत .त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री महोदयांच्या  देण्यात आली.आपल्या मनोगतात मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, सन्माननीय पंतप्रधान ‌नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा! जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील. याचाच एक भाग म्हणून कर्नाटक राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या  ऐरावत, अंबारी, राजहंस यासारख्या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या सेवेची माहिती करून घेणे, तसेच त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली होती.  यावेळी बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात कर्नाटक परिवहन सेवेचे सादरीकरण करण्यात आले. या निमित्ताने कर्नाटक राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना, नाविन्यपूर्ण योजना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का, याची देखील चाचपणी या दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात आली.

श्री उद्यानगणेश मंदिर चषक जिंकण्यासाठी शालेय ३६ कॅरमपटूंमध्ये आज चुरस 

ठाणे : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी…

विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन जिमखाना उपांत्य फेरीत

श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथम विभागीय पुरुष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेत पुरुषांच्या उपांत्य गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी  (मुंबई उपनगर), सरस्वती…

सेहचाळीस किलोच्या गांजासह सहा आरोपी अटकेत

मिरा – भाईंदर  येथील नवघर पोलिसांच्या धडक  कारवाईत सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे. नवघर पोलीसांची गस्त सुरु असताना हे सहा आरोपी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. यांच्या कडच्या तीन मोठ्या बॅगेत तपासणी केली असता त्यात सेहचाळीस किलो गांजा सापडला. या गांजाची बाजारातील किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये आहे. या आरोपीमध्ये दोन जण गुजरातचे असून चोघे ओडिसाचे असल्याचे कळले. या सगळ्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेतल्याचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. हे अट्टल गुन्हेगार आहेत का? हा गांजा ते कोणाला देणार होते ? हा गांजा त्यांनी कुठून आणला? याबद्दलची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची टीम त्यांच्या राज्यात जाऊन अधिक चौकशी करेल असं ते पुढे म्हणाले. आजच्या तरुणांना तसेच या पिढीला अशा व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अशीच मोहीम राबवावी अशी अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करत आहेत.

सह्याद्री, ओम साईश्वर,  समर्थ, राजर्षी शाहू महाराजची विजयी सलामी

मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा ठाणे: महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय…