Category: ठाणे

Thane news

महात्मा गांधी विद्यालयात करपल्लवी गोंधळी लोककलेचा अनोखा सांस्कृतिक कलाविष्कार

कल्याण: श्रीकृष्ण कला फाऊंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या करपल्लवी गोंधळी लोककलेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. पूर्वप्राथमिक विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर…

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका २० वर्षीय महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे साडेआठ किलो वजनाचा दुर्मिळ ट्युमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला…

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.…

दिवा- कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत तरुणी ठार

दिवा : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रविवारी सकाळी एक सुन्न करणारी घटना घडली. अवघ्या १८ वर्षीय तरुणी कामावर जाते सांगत घराबाहेर पडली होती. दिवा- कोपर दरम्यान लोकलच्या धडकेत तिचा जागीच दुर्दैवी…

उलवेकरांचा पाणीप्रश्न लवकरच संपुष्टात येणार

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सचिन घरत, सचिन राजेंचा पाठपुरावा राज भंडारी उलवे :उलवे नोडमधील सेक्टर १५ ते १८ मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष येथील रहिवाशांना सतावत आहे. उलवेकरांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये म्हणून सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे आता उलवेमधील पाणीप्रश्न संपुष्टात येणार असल्याचे अश्वासन आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर, सेक्टर १७, उलवे येथे भव्य जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या जनता दरबारास गव्हण ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन घरत तसेच सचिन राजे येरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोडमधील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता दरबारामध्ये महत्त्वाचा विषय उलवे नोडमधील पाणी टंचाई व पाणीपुरवठ्याची समस्या हा होता. यावेळी सचिन घरत आणि सचिन राजे येरुणकर यांनी सेक्टर १५, १६, १७ व १८ येथील रहिवाशांच्या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर नवीन जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. याशिवाय नागरिकांनी मांडलेल्या विविध नागरी समस्या व अडचणी संयमाने ऐकून घेत, संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासनही देण्यात आले. या जनता दरबारास सुमारे ६०० रहिवाशांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रश्नांचे समाधान झाल्याची भावना व्यक्त करत कार्यक्रमाचे कौतुक केले. ००००

 २५ लाखांच्या भाड्यावरून वाद

महापालिकेकडे वाहने असूनही, खाजगी यंत्रसामग्री भाड्याने घेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात मिरा -भाईंदर : शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी एका खाजगी कंपनीकडून अंदाजे २५ लाख रुपये खर्च करून दोन हायड्रॉलिक बूम लिफ्ट (मॅन लिफ्ट) भाड्याने घेण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष आणि नागरिकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की, भारतीय हवामान विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तात्काळ छाटण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यामुळे अतिरिक्त यंत्रसामग्रीची गरज निर्माण झाली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेकडे आधीपासूनच उपलब्ध असलेली दोन हायड्रॉलिक वाहने शहरभरातील काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती. वेळखाऊ नियमित निविदा प्रक्रियेमुळे, ही तातडीची गरज भागवण्यासाठी विविध कंपन्यांकडून दरपत्रके मागवण्यात आली. सर्वात कमी दर देणाऱ्या कंपनीकडून चालक, ऑपरेटर आणि इंधनासह दोन यंत्रे भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाअंतर्गत नवीन हायड्रॉलिक यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, विरोधी पक्ष आणि नागरिक प्रश्न विचारत आहेत की, महानगरपालिकेकडे आधीपासूनच दोन हायड्रॉलिक वाहने आहेत आणि त्यांचा पूर्ण वापर का केला गेला नाही. शिवाय, कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन यंत्रे खरेदी करण्याऐवजी ती भाड्याने घेण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि नियमित निविदा प्रक्रियेऐवजी तात्पुरती पद्धत का अवलंबण्यात आली. या प्रश्नांमुळे प्रशासनाच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. ०००००

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी विकास पानसरे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर ठाणे- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने विकास पानसरे (भा.प्र.से.) यांची पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवार, ३० जुलैपासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. विकास पानसरे यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्यटन संचालनालयाच्या धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जगाच्या नकाशावर राज्याला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचे काम विकास पानसरे करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवाचा उपयोग राज्याच्या शाश्वत आणि पर्यटन विकासाला गती देण्यासाठी होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी मंगेश जोशी (भा.प्र.से.) पर्यटन संचालक म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे काम पाहत होते. मंगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, राज्यातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे आणि पर्यटन क्षेत्रातील खासगी भागीदारी वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्याच्या पर्यटनाला देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. मंगेश जोशी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पर्यटन संचालनालयाने त्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामध्ये विकास पानसरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विकास पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ००००

– कावड यात्रेसाठी विशेष सुविधांची मागणी

शिवसेनेचे केडीएमसीला निवेदन कल्याण : श्रावण महिन्यात निघणारी कावड यात्रा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी शिवसेना उत्तर भारतीय विभागाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेना कल्याण शहर (उत्तर भारतीय विभाग) प्रमुख सी. पी. मिश्रा यांनी महापौर ॲड. हर्षाली  चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे तसेच पदाधिकारी प्रशांत तिवारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिरातून हजारो शिवभक्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात जलाभिषेकासाठी कावड यात्रा काढतात. या यात्रेत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सी. पी. मिश्रा यांनी यात्रा मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजविणे, संपूर्ण मार्गाची स्वच्छता करणे, विविध ठिकाणी मोबाईल शौचालयांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा व्यवस्थापन तसेच अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बहुतांश कावड यात्रेकरू अनवाणी चालत असल्याने मार्ग स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. श्रद्धाळूंच्या भावनांचा सन्मान राखत महानगरपालिकेने या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, जेणेकरून कावड यात्रा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केडीएमसीच्या सुका कचरा संकलन मोहिमेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ऍड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास  कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन विभागाने शाश्वत शून्य कचरा मोहीम हाती घेतली…

ठाकरेंच्या शिवसेनेकडून राम मंदिरात महाआरती आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा केला निषेध

कल्याण : अयोध्येतील राम मंदिरातील देणगी व कथित दानचोरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने रविवारी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात महाआरती करत आणि रामरक्षा पठण करत चोरीच्या घटनेचा जाहीर…