Category: ठाणे

Thane news

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया कागदपत्र पडताळणीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व नियम २०११ अंतर्गत आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेशस्तर वर्गात २५% जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम फेरीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी अॅलॉटमेंट लेटर, हमीपत्र व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी शासनाने २० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी कै. शंकरराव झुंझारराव मनपा शाळा क्रमांक १, गांधी चौक, बारदान गल्ली, कल्याण पश्चिम येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) करण्यात येणार आहे. ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रेच ग्राह्य शासनाच्या निर्देशानुसार पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अपलोड केलेली मूळ कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांच्या मुळ प्रतींसह छायांकित प्रतींचे दोन संच सोबत आणणे आवश्यक आहे. पालकांनी आरटीई पोर्टलवरून अॅलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून निर्धारित कालावधीत पडताळणी पूर्ण करून आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ

“क्रांतीसूर्याचं देणं” काव्यसंग्रहासाठी कविता पाठवण्याची मुदत वाढ ठाणे : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२७), सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने साकार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विनंतीचा विचार करून, आता कविता पाठविण्याची अंतिम मुदत  २४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या ऐतिहासिक काव्यप्रकल्पासाठी कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाडच्या चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कवितांमधून केवळ निवडक आणि दर्जेदार कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची, मौलिक व अप्रकाशित असणे अनिवार्य आहे. तसेच, प्रथम सहभाग नोंदविणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) तसेच साहित्यिक नवनाथ रणखांबे ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार

निलिकॉन कंपनीतील कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ मिळणार कामगारांतर्फे संजय वढावकर यांचा सत्कार अनिल ठाणेकर ठाणे, रायगड जिल्ह्यामधील रोहा येथील निलिकॉन कंपनी व्यवस्थापन आणि  जनरल मजदूर सभेच्या वतीने नुकत्याच झालेल्या वेतन करारानुसार कामगारांना १२ हजार रुपये पगारवाढ व इतर सुविधा मंजूर झालेल्या आहेत. त्यानिमित्ताने कंपनीतील कामगारांनी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर आणि अध्यक्षा संज्योत वढावकर यांचा जाहीर सत्कार केला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. कामगारांना मिळालेल्या भरघोस पगारवाढीमुळे  ठाणे येथील जनरल मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.  आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, कामगारांची एकजूट,  संयम आणि संघटनेवरील विश्वास यामुळेच हा वेतन करार संपन्न झाला. कारखाना टिकला तरच कामगार टिकेल, अशी  स्पष्ट भूमिका मांडून  त्यांनी आपली संघटना ही कामगारांच्या न्याय हक्कासाठी  कायम खंबीरपणे उभी राहील. धाटाव एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यांमध्ये संघटनेने आत्तापर्यंत अनेक यशस्वी वेतनकरार केले असून, टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी नोकऱ्या मिळवून देण्याचे काम केले आहे. संघटनेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर यांनी सांगितले की,  कामगारांनी संघटित राहून  आपल्या न्याय हक्कासाठी लढा दिला पाहिजे,  तरच आपणास न्याय मिळेल. सदर सत्कार सोहळ्यास शामकांत जोशी, जगदीश उपाध्ये, सुहास खरीवले, प्रशांत शेट्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत कोतवाल यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन निलिकॉन कामगार सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले होते. हा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष भरत कोतवाल, उपाध्यक्ष जनार्दन राजीवले, सेक्रेटरी एच.पी. वर्मा तसेच नितीन रटाटे, अनंता ढमाल, चिंतामणी साळस्कर, लक्ष्मण भोकटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर : मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या मिरा-भाईंदर शहराचा रखडलेला विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्याने अनेक विकासकामे रखडली असून, नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित नागरी प्रकल्प लक्षात घेता, महानगरपालिकेचा ‘सुधारीत विकास आराखडा’ (DP) शासन स्तरावर तातडीने अंतिम करावा, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मिरा- ईंदर शहराची मूळ विकास योजना १९९७ आणि २००० मध्ये मंजूर झाली होती. वाढत्या गरजा लक्षात घेऊन १५ ऑक्टोबर २०१५ रोजी सुधारीत आराखड्याचा इरादा घोषित करण्यात आला.…

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला

फुले – आंबेडकर – गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला सुनील कदम यांचे प्रतिपादन अभिनव महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह अरविंद जोशी मिरा – भाईंदर : ‘महात्मा फुले हे त्या काळातील मोठे उद्योजक होते. ते रोड कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी मुंबईतील अनेक इमारती बांधल्या. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त काम फुले यांनी केले. शेतमालाच्या मार्केटिंगचं काम त्यांनी केलं. समाजातील अंधश्रद्दा दूर करण्याचं काम  फुले, संत गाडगे महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं. संत गाडगे महाराजांनी देव दगडात नाही, तर माणसात आहे हे सांगितलं. या महापुरुषांचा विचार आजच्या परिप्रेक्षात समजून घ्यावा लागेल,’ असे प्रतिपादन समान संधी अभियानाचे प्रणेते सुनील कदम यांनी केले. भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता, त्यानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र गीतानंतर पाहुण्यांचा परिचय प्रा. राजेश सोनवणे यांनी करून दिला. त्यानंतर प्रा. वैष्णवी पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी कॅप्टन अजित खेडकर, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष किरण पाटील व प्राचार्य डॉ. ऑल्विन मेनेजिस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास मिडिया विभाग प्रमुख प्रा. उत्तम भगत यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अमोल पाटील, कार्यवाह मंगेश पाटील, सहकार्यवाह प्रकाश पाटील, खजिनदार अशोक पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील तसेच सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ठाण्यात भव्य ‘महिला मेळावा’ संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त ठाणे :- अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात ८ ते १४ एप्रिल…

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कल्याण:  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली मध्ये २०० हुन अधिक सायकलिस्टने भाग घेतला. मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.  १४ एप्रिल ते २० एप्रिल देशभर अग्निशमन सप्ताहाचं आयोजन केले जाते. केडीएमसी अग्निशमन दलाकडून सप्ताह साजरा केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.  रक्तदान शिबीर, सायकल रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना अपघात कसे टाळावे, आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावे याबाबत जनजागृती करण्यात आली. ०००००००

युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग’ची घोषणा!

अनिल ठाणेकर ठाणे: मैदानात उडणारी धूळ, प्रेक्षकांचा चित्कार आणि बॅटमधून सुटलेले ते सणसणीत चौकार-षटकार यांच्या साक्षीत मीरा-भाईंदर शहराच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप  सरनाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मीरा-भाईंदर शहरात क्रिकेटचा आतापर्यंतचा सर्वात भव्य उत्सव रंगणार आहे. प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या तर्फे ‘प्रताप सरनाईक प्रीमिअर लीग (PSPL)’ या ऐतिहासिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर पश्चिम येथे २४ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान पार पडणार असल्याची घोषणा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली. ही स्पर्धा केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, यात संपूर्ण भारताची ‘क्रिकेट क्रेझ’ पाहायला मिळणार आहे. मीरा-भाईंदर शहरात साकार होणारी ही स्पर्धा केवळ खेळ नसून एक उत्सव आहे. एका बाजूला भारतातील कानाकोपऱ्यातून आलेले १६ दिग्गज ऑल इंडिया संघ आपली ताकद दाखवतील, तर दुसऱ्या बाजूला ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील १६ स्थानिक संघ आपल्या मातीतील टॅलेंट सिद्ध करतील. या स्पर्धेत एकूण ३२ संघ आपले कसब पणाला लावणार आहेत. ऑल इंडिया टीम्स च्या विजयी संघाला २१ लाख रुपयांचे परितोषिक, रनरअप संघाला ११ लाख रुपयांचे परितोषिक तसेच मॅन ऑफ दि सिरीजला लॅविश चारचाकी गाडी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला शानदार दुचाकी पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. त्याचप्रकारे ठाणे, मीरा-भाईंदर स्पर्धेतील १६ संघातील विजयी संघाला ५ लाख रुपये पारितोषिक, रनरअपला ३ लाख रुपये पारितोषिक, मॅन ऑफ दि सिरीजला शानदार दुचाकी तर बेस्ट बॅटसमॅन, बेस्ट बॉलर आणि इमर्जिंग प्लेअरला २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे. २४ ते २९ एप्रिल या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान (भाईंदर प.) येथे क्रिकेटचे मैदान ताऱ्यांनी लखलखणार आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड-मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवणार आहेत. यावेळी बोलताना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणतात कि, ‘खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘प्रेसिडेंट कप’ च्या यशानंतर, आता पीएसपीएलच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. ही स्पर्धा मीरा-भाईंदरच्या क्रीडा संस्कृतीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. खेळ रंगणार, रेकॉर्ड हि तुटणार. स्थानिक क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची आणि आपली जादू दाखविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. मीरा-भाईंदरच्या क्रीडा इतिहासात ही स्पर्धा सुवर्णअक्षरांनी लिहिली जाईल” असा विश्वास युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला. क्रिकेट रसिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. ०००००

कळवा येथे १५ एप्रिलला रंगणार ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ विशेष अनुभवयात्रा

राजाराम साळवी गौरव विचारमंच’ आयोजित व्याख्यानमालेत ‘वन्यजीव प्रेमी’ व मान्यवरांची विशेष उपस्थिती ठाणे : ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’ तर्फे आयोजित व्याख्यानमालेचे ‘तिसरे पुष्प’ येत्या बुधवार, १५ एप्रिलला गुंफले जाणार आहे. ‘वन्यजीव – निसर्ग – साहस’ या अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित हा सोहळा मनीषा विद्यालय व जुनिअर कॉलेज, सभागृह , कळवा येथे दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत संपन्न होणार आहे. या तिसऱ्या पुष्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ एक व्याख्यान नसून ती एक संपूर्ण ‘अनुभवयात्रा’ असणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध वनसंपदेचे दर्शन घडविणारे भटकंती छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव अभ्यासकांशी थेट संवाद साधणारा लाईव्ह टॉक शो, थरारक साहसी मोहिमांचा स्लाईड शो आणि वन तज्ञांचे विशेष व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शैलेंद्र पाटील, वन अभ्यासक हे ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर आपले अनुभव मांडतील. प्रदीप भाऊ साळवी (संचालक, एकलव्य रायफल व आर्चरी क्लब, कासणे) हे ‘वन्यप्राणी संवर्धन, निसर्ग साहस व ग्रामीण युवाशक्ती’ या विषयावर संवाद साधतील. सौ. सुरेखा मोरे या टॉक शोच्या माध्यमातून संवादक/मुलाखतकार म्हणून तज्ञांशी संवाद साधतील. सचिन रेपाळे (उपवनसंरक्षक, ठाणे वनविभाग, महाराष्ट्र राज्य) हे वन्यजीव संरक्षण व वन कायद्यांविषयी विशेष मार्गदर्शन करतील.  दा. कृ. सोमण (प्रसिद्ध खगोलशास्त्र अभ्यासक व पंचांगकर्ते) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.  प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी साधना वझे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याचे आयोजन राहुल साळवी (संयोजक अध्यक्ष) आणि  प्रदीप साळवी (कार्याध्यक्ष) यांनी केले आहे. या उपक्रमाला मनीषा एज्युकेशन ट्रस्ट, कळवा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद (ठाणे), शोभा वेल्फेअर असोसिएशन आणि मैत्रिण ग्रुप हे सहआयोजक म्हणून जोडले गेले आहेत.

दिवंगत शारदा चन्ने यांचे निधन

ठाणे : पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी जीवन चन्ने यांच्या पत्नी शारदा जीवन चन्ने यांचे सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले‌.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्ष…