Category: ठाणे

Thane news

 कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा

कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी उल्हासनगर : रविवारी आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी…

 लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध

लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या…

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी कल्याण : कल्याण मध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी…

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र कल्याण: प्रो. डॉ. दिनेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण…

 डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन

डोंबिवलीत प्रथमच पार पडली १२ तास स्टेडियम रन रनर्स क्लॅन फाऊंडेशनचा यशस्वी उपक्रम डोंबिवलीच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय कल्याण : रनर्स क्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने प्रथमच १२ तास स्टेडियम…

  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड टेनिस क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून मुलांचे क्रिकेटर होण्याचं स्वप्न साकार होणार – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे…

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले

बल्याणी येथे उर्स निमित्त लावलेले ठाकरे गटाचे बॅनर फाडले कल्याण: बल्याणी विभागात पीर वली शाह दर्गा ऊर्स २०२६ निमित्त प्रभाग क्र. 4 मध्ये लावण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे केडीएमसीचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांचे अधिकृत बॅनर काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांनी जाणूनबुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर कृत्य अत्यंत निंदनीय असून लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या भावना दुखावणारे आहे. या घटनेमागील दोषींवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असून पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन

मराठीतून विज्ञान प्रसाराचा उपक्रम ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ पुस्तकाचे ठाण्यात प्रकाशन  सिद्धेश शिगवण ठाणे :मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग आणि मराठा मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हेमंत साने लिखित व लोकवाङ्मय गृह प्रकाशित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी मराठा मंडळ हॉल, पाचपाखाडी, ठाणे (प.) येथे होणार आहे. या कार्यक्रमाला ‘जिज्ञासा’ संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, ज्येष्ठ विज्ञान प्रसारक व लेखिका डॉ. मानसी राज्याध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे कार्यवाह प्रा. नामदेव मांडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा मंडळ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश सुर्वे व सरचिटणीस राजेंद्र साळवी यांचीही उपस्थिती राहणार आहे. ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ या पुस्तकात ११८ मूलद्रव्यांची माहिती मराठीत देण्यात आली असून विविध वैज्ञानिक व अभियांत्रिकी संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. अशा स्वरूपाचे हे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच विज्ञानप्रेमी नागरिकांनी या मराठीतून विज्ञान प्रसाराच्या उपक्रमाला उपस्थित राहून पाठबळ द्यावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाचे अध्यक्ष व ज्येष्ठ खगोल अभ्यासक सोमण यांनी केले आहे.

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम

१८ फेब्रुवारी पर्यंत उन्नती मैदान ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम अनिल ठाणेकर ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे कालपासून सुरू झालेल्या “मालवणी महोत्सव- २०२६” चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजित पवार महोत्सव नगरीमध्ये करण्यात आले आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव असणार आहे. महोत्सवाचे यंदा २७ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह वेंगुर्लेकरांचे दशावतारी नाटक, डबलबारी,गणपतीचे अथर्वशीर्ष, राज्यस्तरीय स्तोत्रपठण स्पर्धा आणि दररोज पवित्र अग्निहोत्र आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा तसेच दोन दिवसीय साहित्य संमेलन, काव्यलेखन स्पर्धा स्वर्गीय कवीवर्य मंगेश पाडगावकर दालनात होणार असुन रिल स्पर्धाही आयोजित केली आहे. तर, महिलावर्गासाठी “खेळ पैठणीचा”मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी महोत्सवात मिळणार आहे. अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.कोकणातील शेतकरी, व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, मालवणी कला – संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या हेतुने नगरसेवक सीताराम राणे गेली २७ वर्षे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे भव्य आयोजन करतात. सलग ११ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार,वनमंत्री गणेश नाईक, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रविण दरेकर, आ. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत. चौकट – रामती येथे नुकतेच अपघाती दुःखद निधन झालेले राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणुन कोकण ग्रामविकास मंडळाच्या ठाण्यातील उन्नती गार्डन मैदानातील मालवणी महोत्सवासाठी स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरी उभारण्यात आली आहे. या मालवणी महोत्सवात एकुण ७५ च्या आसपास व्यावासायिकांचे स्टॉल्स आहेत. प्रवेशद्वारावर कोकणस्थ रेखीव मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन भाविक आणि खवय्यांना घेता येणार असुन या मंदिरात दररोज भजन आणि मालवणी पद्धतीतील आरती केली जाणार आहे.तसेच, श्री स्वामी समर्थाची महती विषद करणारे विशेष भजन कणकवली वाघेरी येथील भजनी मंडळ सादर करणार आहे. चौकट – मालवणी महोत्सवात ११ दिवस दररोज अग्निहोत्र विधी होणार असुन विविध लोककलांचा जागर आणि कथा – कविता आदी साहित्यरूची वाढवणारे रंगतदार कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. महिलावर्गासाठी खेळ पैठणीचा, डबलबारी भजनाची जुगलबंदी आणि वेंगुर्ला येथील दशावतारी नाट्यप्रयोग आदी कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय, मालवणी महोत्सवात दररोज स्थानिक बालगोपाळांचे कार्यक्रम व स्पर्धा सादर होणार असुन राज्यस्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा व काव्यलेखन स्पर्धा होणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता होईल. तरी, खेळ पैठणीचा व विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे नोंदवावीत.असे आवाहन मालवणी महोत्सवाचे आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे.

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात

योगदान फाउंडेशन ट्रस्टकडून ‘माझा रुपया निसर्गासाठी’ उपक्रमाची सुरुवात कल्याण: उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई, वाढते तापमान आणि त्यामुळे पक्षी व इतर व जीवसृष्टीसमोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, योगदान फाउंडेशन ट्रस्टतर्फे माझा रूपया  निसर्गासाठी’ या लोकसहभाग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त एक रुपया योगदान देऊन निसर्ग संवर्धनासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात निसर्ग संरक्षणासाठी मोठ्या देणग्यांपेक्षा सामूहिक सहभाग अधिक प्रभावी ठरतो या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येकासाठी सहज शक्य असलेले एक रुपये  योगदान हे या मोहिमेचे वैशिष्ट्य असून, कोणताही आर्थिक बोजा न पडता प्रत्येक नागरिकाला निसर्गासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. या उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या योगदानातून पक्ष्यांसाठी पाणपोई उभारणे, वृक्षरोपण करणे, पक्ष्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे, तसेच निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात पाण्याअभावी होणारे पक्ष्यांचे हाल कमी करण्यावर या मोहिमेचा भर राहणार आहे. योगदान फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी सांगितले की, “₹1 ही केवळ रक्कम नसून निसर्गासाठी दिलेला सहभाग आहे. मोठ्या योगदानाची अपेक्षा न ठेवता, सामान्य माणसालाच या चळवळीच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.” या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन ही केवळ संस्था किंवा शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी या लोकसहभाग उपक्रमात सहभागी होऊन *‘माझा ₹1 निसर्गासाठी’* या संकल्पनेला पाठबळ द्यावे, असे आवाहन योगदान फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.