Category: ठाणे

Thane news

अमृत महोत्सवानिमित्त जगन्नाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागरी सत्कार

कल्याण : अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या आयुष्यावरील रथ जगन्नाथाचा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर एकाच दिवशी 80 हजारहून अधिक रक्तदान केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डबूक मध्ये नोंद करण्यात आली असून त्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. जगन्नाथ शिंदे केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट महासंघाचे अध्यक्ष आहेत. तुमचा शतकमहोत्सवी सोहळा साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी एवढीच इच्छा याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केली. कोरोना काळात अप्पा शिंदे यांनी केलेलं काम कधीही विसरता येणार नाही. रेमडेसिवीर यांसारखी त्यावेळी दुर्मीळ झालेली औषधे त्यांनी उपलब्ध करून दिली. सर्वसामान्यांच्या जीवन मरणात महत्त्व असलेल्या औषधांचा पुरवठा करूनही त्यांची नाळ कायमच सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे. एका दिवसात ८० हजार बाटल्या रक्त त्यांनी जमा करून दाखवले होते. त्यामुळे आप्पा तुम्ही यापुढेही कायम दवा देत रहा आणि दुवा घेत रहा असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त इंदूराणी जाखड आदींसह इतर अनेक मान्यवर  उपस्थित होते.

अखेर डोंबिवली पश्चिमेकडील पाणी प्रश्नावर निघाला तोडगा

वृन्दावनच्या संप पंपाच्या अडसर दूर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनंतर मनपाने हटवले अतिक्रमण कल्याण :  भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत डोंबिवली पश्चिम भागातील पाणी पुरवठा बाबत चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी चव्हाण यांनी डोंबिवली पश्चिम वृंदावन येथील संपपंपच्या जागी असलेले अतिक्रमण हटवून संपपंपची उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या.  त्याची अंमलबजावणी त्वरित झाली असून आता तो अडसर दूर झाला आहे. चव्हाण यांच्या सूचनानंतर महानगरपालिका प्रशासनाने संप पंपाच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवलेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या संप पंपाचे काम वेगाने सुरू करण्यात आलेले आहे.  वृंदावन येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा व जलवाहिन्यांच्या आराखड्यासाठी आयआयटी मुंबईचे तज्ञ डॉक्टर अनुज कुमार घोरपडे यांनी विकसित केलेल्या शाफ्ट आणि मॅनिफोल्ड टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात येणार असून या टेक्नॉलॉजी मुळे उंच सखल भागात एकसमान दाबाने पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे त्यामुळे राजू नगर व कुंभारखाण पाडा परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारीला संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळण्यात येते. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मान पाळून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सरगम संगीत अकॅडमीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती पनवेल : पनवेल मधील कलाक्षेत्रातील सरगम संगीत अकॅडमीच्या ७ व्या वर्धापन दिन सोहळ्याला शेकापचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी भेट दिली. शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर कार्यक्रम “राग एक-रंग अनेक” याची गाण्यांची खूप सुंदर मैफिल होती. अल्पावधीतच नरेश पाटील यांनी १०० पेक्षा जास्त कलाकारांमधील गायनाचे गुण ओळखून त्यांना एक सुमधुर गायक बनवून आपले चांगले शिष्य निर्माण केले आहे. यावेळी प्रितम म्हात्रे यांच्या सोबत संजीवनी जाधव (सुप्रसिद्ध सिने – नाट्य अभिनेत्री), गणेश पाटील (माजी उपनगराध्यक्ष पनवेल), प्रीती जॉर्ज (माजी नगरसेविका पनवेल), माधुरी गोसावी,  करुणा ढोरे यांच्या सह समस्त विद्यार्थीवृंद उपस्थित होते.

केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा! पनवेल : भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस 600 आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले.याप्रसंगी भाजप नेते वाय.टी.देशमुख,टीआयपीलचे संचालक अमोघ ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर म्हणाले की,केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे.अतिशय मेहनतीने,जिद्दीने ते पक्ष कार्य करत असतात.त्यांनी हे कार्य असेच सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रम शाळेत 600 विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले.त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला.त्यामुळे केदार भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले.यावेळी विशाल सावंत,सुमित दसवते, फिरोझ शेख, राजेंद्र भगत,नितेश भगत,रवी पारचे, संतोष वर्तले,चिन्मय भगत, चेतन म्हसकर,यज्ञेश पाटील,ब्रिजेश बहिरा, जयदीप भगत, संकेत दसवते, अभिषेक भालेकर, निहाल पाटील, शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते.

ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत

यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ राबविली असतानाच, त्यापाठोपाठ आता ठाण्यातील बिल्डरांनीही घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहिण विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाच्या काळात घर खरेदी करणाऱ्या महिलांनी घराची २० टक्के रक्कम भरली तर, त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. तसेच यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये ३० लाखांपासून ते कोटी रुपयांच्या किंमतीची घरे असणार आहेत. ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन ठाण्यात होणाऱ्या मालमत्ता प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष राहुल वोरा, सचिन मिराणी, पदाधिकारी गौरव शर्मा आणि जय वोरा उपस्थित होते. ठाण्यातील एमसीएचआय – क्रेडाई या बिल्डरांच्या संघटनेकडून गेल्या २२ वर्षांपासून शहरात मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यंदाचे प्रदर्शन  ७ ते १० फेब्रुवारी या कालावधीत ढोकाळी येथील हायलँड गार्डन मैदानावर येथे भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तसेच घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या ‘लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाईल, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. या प्रदर्शनात मोफत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मोफत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्टेशनबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून प्रदर्शनस्थळापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले. वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश यंदाच्या प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांतील घरे विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रदर्शनात एका इमारतीबरोबरच प्रशस्त गृहसंकूले आणि परवडणाऱ्या घरांपासून उत्तम जीवनशैलीतील आलिशान घरे, व्हिला, कार्यालयीन जागा, दुकाने असे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल. अनेक गृहसंकूलांमध्ये छोटे वन बीएचकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याला अपेक्षित किंमतीनुसार घरांची निवड करता येतील. तसेच गृहसंकुलातील सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन तुलना करता येईल. तसेच सुरक्षित व सोयीस्कर घराची निवड करता येईल. यामध्ये ३१५ चौरस फुटाची छोटी तर, त्याहून मोठ्या आकाराची घरे उपलब्ध असतील. यामुळे प्रदर्शनात ३० लाखांपासून पुढे कोटी रुपयांच्या घरांचे पर्याय उपलब्ध असतील. कशेळी-काल्हेर भागातील काही घरेही प्रदर्शात विक्रिसाठी असतील, असेही मेहता म्हणाले. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या आणि एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील, असेही ते म्हणाले. प्रदर्शनाची वैशिष्टये सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रदर्शन खुले, ठाणे पूर्व रेल्वे स्टेशबाहेरील आनंद चित्रपटगृहापासून मोफत बससेवा, पूर्वनोंदणी केल्यास रांगेविना प्रवेश, मोफत पार्किंग, वैलेट पार्किंगचाही पर्याय, ८० हून अधिक नामांकित बिल्डरांचे १०० हून अधिक गृह प्रकल्प स्टाॅल, १५ हून अधिक वित्त संस्था, २५ हजारांहून अधिक घरखरेदीदारांची उपस्थिती, वातानुकूलित प्रशस्त मंडप, असे प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहे. याशिवाय, गृहसंकुलांसाठी स्पर्धा ठेवली जाणार असून त्यातील विजेत्यांना दिड लाखांपासून ते ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रस्तावित आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घाला – धर्मराज्य पक्ष

अनिल ठाणेकर ठाणे : हिरानंदानी-वाघबीळ परिसरासह ठाणे शहरातील इतर ठिकाणी असलेले आरएमसी प्लांट, त्वरित बंद करण्यात येऊन, नवीन आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी करुन, याप्रकरणी राज्य शासन आणि ठाणे महापालिका प्रशासनाने ठोस पाऊले न उचलल्यास, ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र जनआंदोलन उभारेल, असा इशारा महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी दिला आहे. गेल्या काही कालावधीपासून ठाणे शहरातील वातावरण प्रदूषित झालेले असून, शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मेट्रो प्रकल्प आणि ठिकठिकाणी सुरु असलेली निवासी प्रकल्पांची बांधकामे, यामुळे ठाण्याची हवा दुषित होऊन, हवेचा स्तर पूर्णपणे घसरलेला दिसून येत आहे. परिणामी, खोकला आणि दम्याच्या आजारात मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईचे धाकटे भावंडं, अशी ठाणे शहराची ओळख गेल्या काही वर्षांत निर्माण झालेली असतानाच, ठाण्याचे नागरीकीकरणही तेवढ्याच प्रचंड प्रमाणात झालेले आहे. ठाणे शहराची वाढती लोकसंख्या ही, वाढत्या वाहतूक कोंडीलादेखील कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, आधीच वायुप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषणामुळे ठाणेकर नागरिक त्रासलेले असतानाच, सध्या ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे, एकेकाळी “तलावांचे शहर” अशी ओळख असणाऱ्या ठाण्याची ओळख आता, ‘प्रदूषित शहर’ अशी निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत ठाणे शहरातील हवेचा दर्जा पूर्णपणे घसरलेला असल्याचे, प्रसिद्धीमाध्यमांतील बातम्यांच्या माध्यमातून स्पष्ट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत, घोडबंदर महामार्गालगत अनेक निवासी संकुले उभी राहिली आहेत आणि आजही मोठमोठ्या निवासी संकुलांची/प्रकल्पांची बांधकामे सुरु आहेत. परिणामी, घोडबंदरचे आता धूळबंदर असे नामांतर झाल्यास, आश्चर्य वाटायला नको. याच पार्श्वभूमीवर, वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, घोडबंदर महामार्गावरील प्रस्तावित आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, हिरानंदानी-वाघबीळ याठिकाणी, गेल्या काही महिन्यांपासून एका मोठ्या गृह प्रकल्पाचे खोदकाम सुरु असून, अनेक जेसीबी मशिन्सच्या माध्यमातून हे काम दिवस-रात्र सुरु असते. या खोदकामामुळे मोठ्याप्रमाणात धुरळा उडून, परिसरातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. असे असतानाही, ठाणे शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच, पर्यावरणमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र लिहून, आरएमसी प्लांटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी मागणी केली आहे. मुंबईच्या हवेचा स्तर वाईट झालेला असल्याकारणाने, तसेच बोरीवली पूर्व आणि भायखळा या परिसरांतील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत गेल्याने, तेथील सर्व बांधकामे बंद करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. ज्या विभागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २००च्या वर जाईल, त्या विभागातील सर्वच बांधकामे बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांद्वारे स्पष्ट झालेले आहे. यासंदर्भात, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव अविनाश ढाकणे आणि ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने १ जानेवारी रोजी, पत्र पाठवून (संदर्भ क्र. धराप/सस-मराप्रनिमंमुं/ मनपाआ-ठामपा/२०२४/७७) वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या, ठाणे शहरातील बांधकाम प्रकल्पांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र, प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच, याअगोदर घोडबंदर महामार्गावरील वृक्षतोडीसंदर्भातही हिरानंदानी या व्यवसायिकाच्या विरोधात लिखित तक्रार करण्यात येऊनही, महापालिका प्रशासनाने आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांनी त्याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले होते. याच पार्श्वभूमीवर, महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी पाठविलेल्या पत्रात प्रशासनाला सूचित केले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर, ठाणे शहरातील वायुप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किंवा ठरु पाहणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कठोर निर्बंध घालण्याबरोबरच, ठाणे शहरातील घोडबंदर महामार्गाच्या हिरानंदानी-वाघबीळ परिसरात, एका आरएमसी प्लांटचे काम प्रस्तावित असून, त्यावर त्वरित बंदी घालण्यात यावी. आरएमसी प्लांटच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती प्रणाली उभारणे, उत्सर्जन कमी होण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, प्लांटमधून ये-जा करणाऱ्या वाहनांची चाके धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारणे, कच्च्या मालाच्या हस्तांतरणाचे क्षेत्र बंदिस्त ठेवणे, अशा बाबींचा समावेश करावा. दरम्यान, हा प्लांट उभारला गेल्यास, इथल्या निवासीक्षेत्राला, सिमेंट निर्मितीद्वारे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा मोठ्याप्रमाणात त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो, असे धर्मराज्य पक्षाचे महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.

दिवा येथे २ फेब्रुवारीला कुणबी समाजाचा स्नेह मेळावा

ठाणे : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड च्या वतीने कुणबी समाजाचा स्नेह मेळावा, हळदीकुंकू समारंभ व दिनदर्शिकेचा वितरण सोहळाचे आयोजन रविवार 2 फेब्रुवारीला  सायंकाळी 4 वाजता दिवा येथील साऊथ इंडियन इंग्लिश स्कुल हॉल, दिवा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक आठ समोर, सुरेश नगर, दिवा (पूर्व) येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी रत्नागिरी खेड तालुक्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, येथील समाज बांधवांनी  व महिलांनी हळदीकुंकू समारंभासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे.अधिक माहितीसाठी 9653391877 या नंबर संपर्क करावा, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेड अध्यक्ष शंकर  बाईत यांनी केले आहे.

ठाणे महोत्सव – भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम – संदीप लेले

अनिल ठाणेकर ठाणे : ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेशोत्सवानिमित्त वंदे मातरम् संघातर्फे ठाणे महोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत. दररोज विविध उद्बोधक,प्रबोधन करणाऱ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेश भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार.रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय राजकिय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार भेट देणार आहेत. यंदा येथील या महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक, निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील वंदे मातरम् संघातर्फे माघी गणेश जयंतीनिमित्त या महोत्सवात १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्यक्रमासोबतच दररोज सायंकाळी भजन – किर्तन होणार आहे. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री ची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर सकाळी १० वाजता सामुहिक अर्थवशीर्ष पठण होईल. रात्रौ ८ वा. ‘गणेश तत्व आणि पुराण’ या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार २ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. एकल प्रस्तुत गायत्री बहुतुले यांचे श्री गणेश कथक नृत्य, सोमवार ३ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.धर्मो रक्षति रक्षित: याविषयावर डॉ. अभिजीत फडणीस धर्मजागरण करतील. मंगळवार ४ फेब्रुवारीला रात्रौ ८ वा. ‘हृदयी वसंत फुलताना’ हा सुप्रसिद्ध कलाकार अशोक बागवे, संतोष राणे, प्रज्ञा पंडित, आणि मनिष पंडित आणि गायक शुभम धनगाव यांचा साहित्य, संगीत, आणि सिनेमा यांचा संगम असलेला कार्यक्रम होईल. बुधवार ५ फेब्रुवारी रात्रौ ८ वा. ॲड. विमल जैन हे “पुनर्विकासातील संभाव्य धोके आणि घ्यावयाची काळजी” या विषयावर उद्बोधक माहिती देतील. गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी रात्रौ ८ वा.समर्थ भक्त, समर्थ रामदास व दासबोधाचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये दासबोधाचे निरूपण करणार असुन ७ फेब्रुवारी रोजी महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणुक निघणार आहे. या महोत्सवात होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबीर होणार असुन गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केले आहे. यावेळी वंदे मातरम संघाचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण,सुशांत मोरे,किशोर भावे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे : ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती…