Category: ठाणे

Thane news

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश ठाणे: उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.…

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून नावाजले जात आहे. स्मारकाला दररोज मोठया संख्येने नागरिक व पर्यटक भेट देत असतात. तामिळनाडू येथील पेरियार मणियम्मई विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाला भेट देत येथील वैविध्यपूर्ण दालनांचे, त्याच्या मांडणीचे व त्यामध्ये जपलेल्या कलात्मकतेचे मनापासून कौतुक केले. स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अभ्यासकांसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना असून येथील दुर्मीळ छायाचित्र संग्रहालयातील बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहून भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे हे स्मारक अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले, सुव्यवस्थित आकर्षक मांडणी असलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी असल्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, घटनात्मक दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाचे काम करते तसेच वर्तमानातील व भावी पिढ्यांना संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना दिसते. या भेटीदरम्यान कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाविषयीच्या भावना आणि सदिच्छा अंत:करणापासून असल्याचे सांगत यामधून आयुक्तांची दूरदृष्टी आणि समतेची मूल्ये जपण्याची वचनबद्धता दिसून येते असे मत व्यक्त केले. त्यांनी स्मारकासोबत संयुक्त उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि विद्यापीठीय सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली.

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा कल्याण : गंधर्व गुरुकुलचा नेत्र दीपक आठवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.  प्रत्येक सादरीकरणातून शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत आणि तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि रियाज याचा प्रत्यय सर्वांना आला.  ‘श्रीराम’ हा विषय घेऊन सादर करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात श्रीराम हा धर्म नाही तर जीवनाच्या दृष्टिकोन आहे आणि ह्या नामाच्या जपाने होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे पालक आणि मुलांपर्यंत पोहोचवण्यात गंधर्व गुरुकुल यशस्वी झाले. गजानन पंडीत गुरुजी यांच्या वैदिक मंत्रोच्चारात झालेली कार्यक्रमाची सुरुवात, डॉ प्रमोद नांदगावकर यांनी मोजक्या व मुद्देसूद शब्दात सादर केलेली गंधर्व गुरुकुलाची वाटचाल, प्रभू रामचंद्रांचा प्रेरणात्मक विषय घेऊन गंधर्व गुरुकुल शिक्षिका पूर्वा शिंपी यांचे मुद्देसूद व लाघवी सूत्रसंचालन, बैठक व्यवस्था, गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, भरतनाट्यम, कथ्थक, वेस्टन डान्स, बासरी, तबला याचे लाईव्ह परफॉर्मन्स आणि त्याला लाभलेली  वादकांची उत्तम साथ लाभली. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. पालकांनीही कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनामुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला, अशी आणि अशाच अनेक प्रेरणादायी पोहच पावत्या पालकांनी दिल्या.  या कार्यक्रमाला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र घोडविंदे, पाटील, जोशी, शीला नांदगावकर, सुधा जानविलकर, खिसमतराव, संदीप रेडकर, शीतल रेडकर, नितीन नांदगावकर, भूमी नांदगावकर, डॉ सचिन सातपुते, सन्नी नागदेव, डॉ सिद्वेश्वर चामनारू, ऍड. विलास भारती, तुषार शिंपी, दामोदर धोरडे महाराज, प्रशांत दीक्षित, विवेकानंद झरे, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, अमर धनावडे अशा अनेक मान्यवर आणि मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत मुलांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक मयूर सावर्डेकर, सिद्धी सावर्डेकर, ओमकार लवांदे, प्रशांत सावंत, सुनील गोडांबे, कोमल गायकवाड पाटील, कोमल नागावेकर जाधव, अनंता तरणे, पराग वाणी आणि पालकांचे आभार मानून गंधर्व गुरुकुलच्या संचालिका वैदेही नांदगावकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

राज ठाकरे यांचा ठाण्यात झंझावात..!

राज ठाकरे यांचा ठाण्यात झंझावात..! प्रभाग क्र 8 मधील उमेदवारांचा थेट घराणेशाहीवर हल्ला.. ठाणे – (सिद्धेश शिगवण) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखा आणि उमेदवारांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गुरुवारी  ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी ठाण्यातील मनसे उमेदवारांच्या पक्ष कार्यालये व शाखांना भेट दिली.ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदा ठाण्यात महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेकडून २८ मराठी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या या शिलेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे स्वतः ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी ५ वाजल्यापासून त्यांचा दौरा सुरू झाला, विविध पक्ष कार्यालये व शाखांमध्ये त्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ठिकठिकाणी घोषणाबाजी करत, फटाके फोडून व जल्लोष करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राज साहेबांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, निवडणुकीत मनसे ठाण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. चौकट :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी नंतर माजिवडा प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सचिन कुरेल, कोमल वाडेकर, वर्षा पाटील,लॉरेन्स डिसोझा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. तर माध्यमांसमोर बोलताना सचिन कुरेल यांनी सांगितले कि आम्ही घराणेशाही च्या विरोधात प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. विरोधक फक्त घराणेशाही करतात सर्व उमेदवार त्यांच्या घरातले मग 20 वर्षात विकास का नाही झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ महाराष्ट्राला सागरी जलतरण,कबड्डी, सॉकरमध्ये कांस्य दिक्षा यादवला रौप्‍यपदकाची हुलकावणी, कबड्डीत निसटता पराभव, सॉकरमध्ये अपयशी झुंज दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी सागरी जलतरण, कबड्डी व सॉकरमध्येही कांस्यपदकांची लयलुट केली आहे. सागरी जलतरणात साताऱ्याच्‍या दिक्षा यादवचे रौप्‍यपदक  अवघ्या ७ दशांश सेकंदाने हुकले. पुरूषाच्‍या बीच कबड्डीत केवळ ३ गुणांनी महाराष्ट्र उपांत्‍य फेरीत पराभव स्‍वीकारावा लागला. दीवमधील अरबी समुद्रात सकाळच्‍या सत्रात १० कि.मी. सागरी जलतरणाचा थरार रंगला. महिलांच्‍या गटात सुरूवातीपासून महाराष्ट्राच्‍या २० वर्षीय  दिक्षा यादवे मुसंडी मारली होती. दुसऱ्या फेरीत ती मागे पडली. अखेरच्‍या टप्‍प्‍यात २.४८.०४ वेळ नोंदवून तीने कांस्य पदकाचा पल्‍ला गाठला. अवघ्या ७ दशांश सेकंदाने कर्नाटकच्‍या असरा सुधीरने रौप्‍य पदक तर २.४६.३४ वेळेत कर्नाटकच्‍याच अश्मिता चंद्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. गतवर्षी याच प्रकारात दिक्षाने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. साताऱ्यातील दिक्षा ही  पुण्यातील शासनाच्‍या क्रीडा प्रबोधिनीत सराव करते. खेलो इंडिया विद्यीपीठ स्‍पर्धा, खेलो इंडिया युवा स्‍पर्धा तर खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत १६ पदके जिंकण्याचा पराक्रम तीने केला आहे. महाराष्ट्रातील विजेत्‍यांची भेट घेत पथकप्रमुख नवनाथ फडतरे यांनी अभिनंदन केले आहे. घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्‍या बीच सॉकर मैदानात महाराष्ट्राच्‍या मुलांनी साखळी लढतीत चमकदार कामगिरी करत उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य लढतीत बलाढय केरळकडून १६-१  गोलने महाराष्ट्र पराभूत झाला. या कामगिरीमुळे सलग दुसऱ्या वर्षी कांस्य पदकावर महाराष्ट्राला समाधाव मानावे लागले. बीच कबड्डीतील पुरूषांची महाराष्ट्र विरूध्द हरियाणा लढत लक्षवेधी ठरली. पूर्वार्धात अभिषेक गुंगेसह सुरज दूंदळे यशस्‍वी चढाय्या करीत लढतीत चुरस कायम राखली होती. पूर्वार्धात १५ -१७ गुणांनी हरियाणा आघाडीवर होता. हीच आघाडी निर्णायक ठरली. उत्तरार्धात तुल्‍यबळ खेळाचे प्रदर्शन करीत शेवटच्‍या मिनिटापर्यंत ३०-३० बरोबरी करण्यात महाराष्ट्र यशस्‍वी ठरला होता. शेवटच्‍या मिनिटाला हरियाणाने यशस्‍वी चढाई करीत महाराष्ट्राला ३ गुणांनी पराभूत करीत ३३-३० गुणांनी बाजी मारली. महिलांच्‍या उपांत्‍य सामन्‍यात राजस्‍थानकडून महाराष्टाला ५६-२८ गुणांनी पराभूत व्‍हावे लागले. उपांत्‍य फेरीतील अपयशामुळे महाराष्ट्राच्‍या दोन्‍ही संघाला कांस्यपदकावरच खेलो इंडिया मोहिमाचा समारोप करावा लागला आहे.

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठाणे : श्री आनंद भारती समाज आणि महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री आनंद भारती समाजाचे सचिव संदिप कोळी…

 मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम

मतधिकार ॲपच्या प्रचारासाठी नौपाडा प्रभाग समितीची जोरदार मोहीम ठाणे :  लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व्हावी, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या निवडणूक मतधिकार ॲपचा व्यापक…

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला

वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला अनिल ठाणेकर ठाणे, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले “वंदे मातरम” आता व्होट बँक मातरम बनले आहे. काही लोकांकरीता ही व्होट…

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचा टपाली मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद अनिल ठाणेकर ठाणे: राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच दिवशी होत असल्याने निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता…

आज कळवा-मुंब्र्यात सुप्रिया सुळेंची तोफ धडाडणार – मनोज प्रधान

आज कळवा-मुंब्र्यात सुप्रिया सुळेंची तोफ धडाडणार – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून…