Category: ठाणे

Thane news

 एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही -राजन विचारे

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी अनिल ठाणेकर ठाणे : एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले.संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू असल्याचे शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी सांगितले. त्यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे,संपर्कप्रमुख नरेश मनेरा, जिल्हाप्रमुख केदार दिघे धर्मराज पक्षाचे राजन राजे, महिला जिल्हा आघाडी प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख ,उपशहर प्रमुख, व इतर शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्टेशन परिसरात असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पवित्र संविधानाची दिंडी काढण्यात आली. या दिंडीत संविधानावर प्रेम करणारे शेकडो जण उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक वेळा संविधानाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. गेल्या पाच वर्षात घटनाबाह्य पद्धतीने कामकाज सुरू असून नियमबाह्य कारभार करून पक्ष चोरणे, पक्षाचे चिन्ह पळवणे तसेच न्यायालयाकडूनही आपल्या मर्जीप्रमाणे निकाल लावणे असे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. मात्र हेच चित्र विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. मतदार याद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. त्यामूळे ही सर्व कृती संविधानाच्या विरोधात केलेली असल्याचे समोर आले आहे.

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे : रविवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्याचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली “खंबीर साथ, त्यांचा त्याग” आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही.मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असे मत दैनिक बित्तंबातमी प्रतिनिधी अशोक गायकवाड यांच्या बरोबर बोलताना सानप यांनी व्यक्त केले.

 पालकांनी पाल्यांना मान्यताप्राप्त शाळेतच प्रवेश घ्यावा

ठामपा शिक्षण विभागाचे आवाहन ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरू झाल्या असून अनेक शाळांतून नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी रस्त्याच्या कडेला जाहिरातीचे फ्लेक्स लावण्यात आले आहे. या जाहिराती पालकांचे लक्ष वेधून घेत असून या माध्यमातून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असून पालिकेच्यावतीने अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीत एकूण 81 शाळा अनधिकृत असून यात मराठी माध्यमाच्या 02, हिंदी माध्यमाच्या 02 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळा आहेत. या शाळांमधून आयसीएसई, सीबीएसई, आयबी तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या  रोजी प्रवेशाचे सत्र सुरू झाले आहे. पालकांची फसवणूक होवू नये यासाठी महापालिकेने दिनांक  30/7/2024 रोजी स्थानिक वृत्तपत्रात शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नव्याने सर्वेक्षण करुन अनधिकृत शाळांचा शोध घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांच्या सहकार्याने अधिकृत शाळेत समायोजन करणे, दिवा परिसरात महापालिका स्तरावरुन मराठी व इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याबाबत  प्रयत्न सुरू आहेत, त्याचप्रमाणे अनधिकृत शाळांवर बालकांचा मोफत  व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये दंडात्मक कारवाई व फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी सदरची शाळा अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी करावी. तसेच शाळेचा युडायस क्रमांक, प्रथम मान्यता, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह आदी आहे किंवा नाही याची खात्री करुनच घ्यावी जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही असे आवाहन पालक नागरिकांना महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पालकांनी मान्यताप्राप्त शाळेतच पाल्यांचे प्रवेश करावेत. तसेच शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास ठाणे महानगरपालिका स्तरावर ठाणे महानगरपालिका, शिक्षण विभाग, विष्णुनगर, नौपाडा या ठिकाणी संपर्क साधवा. पालकांनी त्यांच्या पाल्याचा अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास त्याची जबाबदारी शिक्षण विभागाची राहणार नाही याची नोंद घ्यावी असे शिक्षणधिकारी कमलाकांत मेहेत्रे यांनी नमूद केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

ठाणे : अशोक गायकवाड रविवार, (दि.२६ जानेवारी २०२५) रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात “उत्कृष्ट अधिकारी” म्हणून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांना प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. या यशात माझे सर्व वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी कर्मचारी तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शन, सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.याचबरोबर माझ्या कुटुंबियांची मला आजपर्यंत मिळालेली “खंबीर साथ, त्यांचा त्याग” आणि आपल्या सर्वांचा आशिर्वाद, शुभेच्छा मी कधीही विसरू शकत नाही.मी आपल्या सर्वांचाच कायम ऋणी आहे. असे मत दैनिक बित्तंबातमी प्रतिनिधी अशोक गायकवाड यांच्या बरोबर बोलताना सानप यांनी व्यक्त केले.

सुधागड तालुका आमदार सन्मान चषक

श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघ विजेता ठाणे ः भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व सन्मान फाउंडेशन आयोजित सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आमदार चषक रविवारी कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, चंदनवाडी येथे संपन्न झाली. दिवसभरात 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला. अतितटीच्या लढतीत चिवे – झाप अंतिम गुणफलक नोंदवून चिवे – श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ या संघाने 12-11 असा विजय मिळवला. विजेता संघाला प्रथम पारितोषिक सन्मान चिन्ह व रोख 21000/- रुपये देण्यात आले. द्वितिय पारितोषिक झाप – श्री नाथभैरव क्रीडा मंडळाने पटकावत 15 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह जिंकले. तृतीय क्रमांक पारितोषिक ओम काळभैरव आपटवणे संघ ठरला. त्यांना रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. श्री भैरवनाथ नागशेत क्रीडा मंडळ चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरला. त्यांनाही रोख पारितोषिक 10 हजार रुपये व सन्माचिन्ह देण्यात आले. विजेत्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य राजेश मापारा, पेण सुधागड राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील, शिवसेना नेते प्रकाश देसाई, परिवहन सदस्य विकास पाटील, अनिल भोईर, गणपत डिगे, प्रकाश शिलकर, आयोजक रमेश सागळे, भाजपा ठाणे शहर महिला चिटणीस रेवती सागळे, ज्ञानेश्वर यादव, यांच्यासाह सुधागड वासी मोठया संख्येने उपस्थित होते. वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट पकड झाप संघाचा कल्पेश देशमुख, उत्कृष्ट चढाई ओम काळभैरव आपटवणे संघाचा समाधान मोरे, पबिलक हिरो श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत संघाचा राज बेलोसे, सर्वोत्कृष्ट खेळाडू चिवे संघाचा अमर ठाकूर ठरला. शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक श्री. भैरवनाथ जोगेश्वरी आतोणे सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर, आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उद्योजक अच्युत दामले, पालीचे नगरसेवक पराग मेहता, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, माजी अध्यक्ष गणपत सितापराव, संचालक प्रा. बळीराम निंबाळकर सर, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे सल्लागार चंद्रकांत बेलोसे, उद्योजक गणेश दंत, उद्योजक चारुदत्त सावंत, ज्येष्ठ पत्रकार संतोष उतेकर, ज्येष्ठ नगरसेवक संदीप लेले, ज्येष्ठ संपादक कैलाश म्हापदी, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, उद्योेजक ओमकार साजेकर,  कल्याण-डोंबिवली सुधागड तालुका अध्यक्ष यशवंत कदम, चिवे गावचे सरपंच रोहिदास साजेकर, उद्योजक प्रवीण खाडे, उद्योजक स्वप्नील पायगुडे, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उद्योजक संतोष तोडकर, धीरज साजेकर, सखाराम आंबेकर, सुर्यकांत साळुंखे, भाजपा ठाणे शहर सचिव संतोष साळुंखे, भाजपा ठाणे शहर चिटणीस माधुरीताई मेटांगे, रंजना खाडे, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, शिवाजी दळवी, शिवसेना उपविभागप्रमुख सिद्धु यादव, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष विक्रम भोईर, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, भार्जे गावचे सुभाष मुंडे, सुजित बारस्कर, भाजपा ओबीसी सेलचे कृष्णा भुजबळ, राजेश कवे, पी. आय. संतोष धाडवे, शिवाजी दळवी, निलेश महाडीक, महेश सितापराव, उद्योजक संजय सागळे, नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्यासह ठाणे, रायगड, मुंबई, पुणे जिल्ह्यातून सुधागडवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आयोजक रमेश सागळे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सुनिल तिडके, राकेश थोरवे, अविकांत साळुंके, जयगणेश दळवी, धनंजय खाडे, प्रविण बामणे, ज्ञानेश्वर यादव, अजित सागळे, सुधीर नेमाणे, सखाराम चव्हाण, रविंद्र चव्हाण, सुहास यादव, दत्ता यादव, गजानन केदारी, विजय जाधव, अजय जाधव, चंद्रकांत बेलोसे, दत्ता सागळे, श्याम बगडे, जनार्दन घोंगे, सुरेश शिंदे, अनिल सागळे, दिनेश बुरुमकर, गजानन जंगम, हरिश्चंद्र मालुसरे, मोहन भोईर, राम भोईर भगवान तेलेगे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. केतन म्हस्के व अलंकार मनवी यांच्या उत्कृष्ट सुत्रसंचलनाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. दिवसभरात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बल्लाळेश्वर म्युझिकल ग्रुप आणि रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्यावतीेने मराठी वाद्यवृंदाचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायक नथुराम शिंदे, किशोर शिलकर, समीर दंत, नुतन सावंत, प्रतिक्षा भणगे (शिलकर), ढोलकीपटु तेजस मोरे व बालशाहीर – गायक सौजस मोरे यांनी सुमधूर गायनाने रसिकांची मने जिंकली. गायक किशोर शिलकर यांनी आयोजक रमेश सागळे यांच्या जीवनावर वैयक्तिक तयार केलेले गीत सादर केले व सौजश मोरे यांनी कबड्डडीसाठी तयार केलेले गाणे सादर केले. शेवटी आयोजक रमेश साबळे यांनी उपस्थितीत मान्यवर, सुधागड तालुका रहिवासी, ठाणेकर, खेळाडु, पंच आणि पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

पूर्णपात्रे व  सुखटणकर दुहेरीचे राज्य विजेते

महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप ठाणे : नुकत्याच ठाणे येथे झालेल्या Yonex Sunrise महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024-25 स्पर्धेत मुंबईच्या  मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांनी 65 वर्षे वर्षावरील दुहेरीचे राज्य विजेतेपद पटकाविले.  त्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी मुंबईच्या कुमार हिंदुजा व रमण Venkatkrshanan यांचा 19-21, 21-19 व 21-17  अशा अटीतटीच्या लढतीत पराभव केला़.  या स्पर्धा ठाणे शहर व ठाणे जिल्हा यांनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली  घेण्यात आल्या.   या प्रसंगी  मिलिंद पूर्णपात्रे     यांनी गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने उत्तम कामगिरी केल्या बद्दल तसेच प्रशिक्षक व संघटक म्हणुन जी कामगिरी करून बॅडमिंटन चा प्रसार करण्यास हातभर लावला  त्याबद्दल श्री  श्रीकांत वाड,  महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन चे सेक्रेटरी यांच्या हस्ते  मिलिंद पूर्णपात्रे यांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

‘आरटीई’ प्रवेशासाठी २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे :‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१ हजार ७०४ अर्ज आले आहेत.‌ १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर दि. २ फेब्रुवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.

भांडुप परिमंडलात २२१२ रोहित्र झाले स्वच्छ

प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम; १३३ उपकेंद्र, २६५ कार्यालयांचीही साफसफाई ठाणे : भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परिमंडलातील रोहित्र (डीपी), उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १८९८ कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांनी परिमंडलातील २२१२ रोहित्र, १३३ उपकेंद्र आणि २६५ कार्यालयांची साफसफाई केली. महावितरणच्या या उपक्रमाचे वीज ग्राहकांनी स्वागत व कौतुक केले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आखण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्यासह कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रवीण रहांगदळे, नमिता गझदर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र बागुल यांच्यसासह ३५ जणांनी सक्रिय सहभाग नोंदवत भांडुप परिमंडल कार्यालयाची साफसफाई केली. तर ठाणे मंडल कार्यालयांतर्गत भांडुप, मुलूंड, ठाणे शहर एक आणि दोन, वागळे इस्टेट विभागात ४५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १३८७ रोहित्र, ४७ उपकेंद्र आणि ६१ कार्यालयांची स्वच्छता केली. वाशी मंडल कार्यालयातील नेरुळ, वाशी आणि पनवेल शहर विभागात ५५१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०८ रोहित्र, ४८ उपकेंद्र आणि ५५ कार्यालयांमध्ये साफसफाई केली. पेण मंडल कार्यालयांतर्गत अलिबाग, गोरेगाव, रोहा व पनवेल ग्रामीण विभागातील ८६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ७१५ रोहित्र, ३७ उपकेंद्र आणि १४८ कार्यालयांमध्ये स्वच्छता केली. यात रोहित्रांच्या भोवती वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या आदी हटविण्यात आल्या. याशिवाय वाढलेले गवत रोहित्राच्या सभोवतीचा कचरा साफ करण्यात आला. शहरी भागात विविध सोसायट्यांमधील रोहित्रांच्या स्वच्छतेसोबतच काही ठिकाणी रोहित्र व वितरण पेट्यांना रंगरंगोटीही करण्यात आली. यातून रोहित्र परिसरातील अपघात टाळण्यास व परिसरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मदत मिळेल. मुख्य अभियंता श्री. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते राजाराम माने, संजय पाटील व युवराज मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

शिवसेना उबाठा शिव आरोग्य सेनेच्यावतीने डायलेसीस रुग्णांना औषधे व श्रवणयंत्र वाटप

ठाणे – धर्मवीर आनंद दिघे जयंतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) आणि धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ.प्रशांत…

ठामपाचे रेबीजमुक्त ठाणे अभियान

१० हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य अनिल ठाणेकर ठाणे : महानगरपालिका आणि मिशन रेबीज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका क्षेत्रात ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबविण्यात येत आहे. रेबीजची लागण टाळून मानवी मृत्यू रोखणे तसेच रेबीज विषाणूच्या प्रसाराचे चक्र तोडणे, यासाठी हे अभियान राबिवण्यात येणार आहे. या अभियानात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. गेल्यावर्षी सात हजाराहून अधिक श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात आले होते. या उपक्रमात, ठाणे सीपीसीए, इंडियन सोसायटी फॉर व्हेटनरी ॲनिमल प्रोटेक्शन, सिटीझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, व्हीटीईएएमएस आणि पीएडब्ल्यू आशिया या संस्थाचे सहकार्य मिळणार आहे. भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा मृत्यूचे प्रमाण २०३०पर्यंत शुन्यावर आण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विशेष अभियान राबवून त्यात भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येते. गेल्यावर्षी ठाणे महानगरपालिकेने ७ हजार ४०९ भटक्या श्वानांना रेबीजची लस दिली होती. यंदाच्या वर्षातही पालिकेकडून हे अभियान राबविण्यात येईल. ठाणे महापालिका क्षेत्रात या वर्षी दहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लसीकरणासाठी एकूण २५ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर आणि तीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भटक्या श्वानांकडून चावा घेण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागांची माहिती शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून जमा करण्यात आली असून त्याआधारे विभागवार लसीकरण मोहिमेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर यांनी दिली.