Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य महापौर शर्मिला पिंपळोलकरांचे वक्तव्य अनिल ठाणेकर ठाणे, तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. संशयित क्षयरुग्णांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात २० आशा वर्कर्संना महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा वर्कर्स आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा वर्कर्सनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी देखील आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.तर प्रास्ताविकपर भाषणात मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कामाचे कौतुक केले. संशय‍ित क्षयरुग्णाच्या नोंदणी  कामात आशांनी सक्रिय सहभागी घेतला. तसेच १० दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्द‍िष्ट दिले असताना हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी त्यांनी केली, त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद महानगर गॅस लिमिटेड यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी ₹१.२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दोन अ‍ॅडव्हान्स सोनोग्राफी मशीन आणि एक २D इको मशीन उपलब्ध करण्यात आली आहे.या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. रेडिओलॉजी विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी या मशीन महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. यावेळी ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्मातील नववे गुरु गुरूतेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाच्या फलकाचे अनावरणही महापौरांच्या हस्ते करण्यात आले. गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. या शताब्दी वर्षानिमित्त आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रात आरोग्‌य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले.

 नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी

नाशिकमध्ये भाजप बंडखोर आणि मनसेला सत्तेची लॉटरी स्थायी समितीत मिळाले स्थान! हरिभाऊ लाखे नाशिक: महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सोमवारी राजकीय पक्ष व आघाडीच्या तौलानिक बळानुसार १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपने महापौर व उपमहापौरपदाच्या स्पर्धेतील काहींना स्थायीवर संधी दिली. अपक्ष विजयी झालेल्या मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आघाडी करीत तर, मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिवसेना शिंदे गटाशी आघाडी करीत स्थायीत प्रवेश मिळवला. महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांच्याबरोबर होता. निकालानंतर मनसे शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी करीत एकप्रकारे सत्तेत सहभागी झाली. तर भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे हे अजित पवार गटाने आधीच दिलेल्या पाठिंब्यामुळे अप्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी झाले. या समीकरणांनी बहुमतात असणाऱ्या भाजपला स्थायीत अधिक बळ मिळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महापौर, उपमहापौरांबरोबर स्थायी समिती व सभापतीला विशेष महत्व आले आहे. सदस्य पदांसाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठी स्पर्धा होती. महापौर व उपमहापौर निवडणूक झाल्यानंतर सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीपदाकडे आहे. २२ सदस्यांच्या पालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. अखेरच्या क्षणी राज्यातील मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला भाजपने उपमहापौरपद देत बरोबर घेतले. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. पालिकेत शिवसेना शिंदे गट (२६), राष्ट्रवादी अजित पवार गट (चार), ठाकरे गट (१५), काँग्रेस (तीन), मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. विविध समित्यामध्ये अधिकतम प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनी समीकरणे जुळवली. महापालिकेत ७२ जागा मिळवणाऱ्या भाजपचे नऊ, शिवसेना शिंदे गट मनसेच्या गटाला चार, शिवसेना ठाकरे गट- काँग्रेस आघाडीला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि् अपक्ष आघाडीच्या एका सदस्याला संधी मिळाली. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडून पक्षनिहाय सदस्यांची नावे जाहीर झाली. भाजपने महापौर पदाच्या स्पर्धेतील माधुरी बोलकर आणि दीपाली कुलकर्णी तसेच उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावे लागलेले मच्छिंद्र सानप यांच्यासह नितीन निगळ, पल्लवी गणोरे, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड यांची स्थायीवर नियुक्ती केली. शिवसेना शिंदे गट-मनसे आघाडीकडून मनसेच्या मयुरी पवार, शिंदे गटाच्या किरणताई गामणे, राहुल दिवे आणि रंजना बोराडे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीच्या भारती ताजनपुरे आणि योगेश गाडेकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष आघाडीचे मुकेश शहाणे यांची अशा एकूण १६ जणांची स्थायी समितीत सदस्य म्हणून नियुक्ती झाली. आघाडी केल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या मुकेश शहाणे यांची लॉटरी लागली. अजित पवार गटाने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेही सत्तेत सहभागी महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्रित लढली होती. ठाकरे गटाला १५ तर मनसेला एक जागा मिळाली. निकालानंतर समीकरणे बदलली. शिवसेना शिंदे गटाने मनसेला सोबत घेऊन पालिकेत गट स्थापन केला. भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला सत्तेत बरोबर घेतले. विलास शिंदे उपमहापौर होऊन शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. दुसरीकडे शिंदे गट आणि मनसेची आघाडी आहे. शिंदे गटाने या पक्षाच्या नगरसेविका मयुरी पवार यांना स्थायीत संधी दिली. या राजकीय समीकरणांनी नाशिक पालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाबरोबर एकप्रकारे मनसेचाही समावेश झाला आहे. एकत्रित निवडणूक लढणाऱ्या ठाकरे गटाने मनसे व काँग्रेसला सोबत घेऊन एकत्रित आघाडी स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मनसेने शिंदे गटासोबत आघाडी केली. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना आधीच माहिती दिल्याचे ठाकरे गटातील पदाधिकारी सांगतात. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन रमेश औताडे मुंबई : राजगुरुनगर येथे कुलस्वामिनी साहित्य परिषद आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक, पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. ढसाळांच्या जयंतीदिनी आयोजन केले होते. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरूवात झाली. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे, संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे, स्वागताध्यक्ष प्रकाश शितोळे, ज्येष्ठ साहित्यिक म.भा.चव्हाण, बाजार समिती सभापती व जि.प.सदस्य ॲड. विजयसिंह शिंदे, काव्यसंमेलनाध्यक्ष अनंत धनसरे, राजगुरुनगर सह बँकेचे मा.अध्यक्ष दिनेश ओसवाल, राजेंद्र सांडभोर, खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील थिगळे , कवयित्री ललिता सबनीस, दिलीपराव माशेरे, संतोष ताम्हाणे, बबनराव काटकर, कनेरसरच्या सरपंच सुनीताताई केदारी,प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे, सुरेश क्षीरसागर, बाळासाहेब खरपुडे, कल्याणी पवार, संदीप म्हसुडगे तसेच साहित्यिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सतत तीन वर्षे नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन आयोजित करून कुलस्वामिनी साहित्य परिषद व निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांच्या कार्याचे कौतुक केले. नामदेवराव ढसाळ यांनी विद्रोही साहित्यातून केलेली निर्मिती अलौकिक असून त्याचा वारसा जतन करून वाचनसंस्कृती जतन ठेवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत व्यक्त केले. संमेलनाचे निमंत्रक अशोकराव टाव्हरे यांनी प्रास्ताविक करताना केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या असून पुढील वर्षी साहित्य संमेलन गडकरींच्या आग्रहास्तव नागपुर येथे होणार असे जाहीर केले. तसेच वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करीत असल्याचे नमुद केले. संमेलनाध्यक्ष कांताराम सोनवणे यांनी नामदेवराव ढसाळ यांचा जीवनपट मांडला. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे, सभापती विजयसिंह शिंदे, साहित्यिक म.भा.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जालिंदरनगर जि.प.शाळेचे दत्तात्रय वारे गुरूजी, अंबिका देवस्थान ट्रस्ट साबळेवाडी, सोनाली पवार, नीलेश घोडके, ॲड समीर गोडसे, बाळासाहेब चौधरी, विजयकुमार दाते, महेश लोखंडे, द्वारका सेवासदन व गुरुकुल व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विविध विषयांवरील कविता राज्यातून आलेल्या कवींनी सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरलीधर मांजरे यांनी केले. आभार कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुरेखा टाव्हरे यांनी मानले.

 शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार

शेवग्याच्या शेंगा विक्रीतून ग्रामीण भागात रोजगार जीवनसत्व,घटकामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी अविनाश उबाळे मुंबई : शेवग्याच्या शेंगाचे यंदा विक्रमी उत्पादन झाले आहे.हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा व पानं व फुलांमध्ये प्रचंड असे…

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव

महाविद्यालयात भाजी, फळे आणि फुलांचा महोत्सव रमेश औताडे मुंबई : वृक्षप्रेमींच्या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित ६३ वा वार्षिक भाजीपाला, फळे आणि फुलांचा सोहळा माटुंगा येथील डी जी रूपारेल कॉलेज च्या…

 महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २५ तसेच शाळा क्रमांक ५४, पातलीपाडा…

 ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट कल्याण : ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. डोंबिवली…

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

दीड वर्षाच्या बलात्कार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल अनिल ठाणेकर ठाणे : समाजाच्या काळ्याकुट्ट बाजूचे दर्शन घडवणारी एक हृदयद्रावक घटना दहिसर रेल्वे स्थानकाजवळ १० फेब्रुवारीच्या…

शस्त्राच्या बळापेक्षा आत्मबळ महत्त्वाचे – डॉ. अवनीश पाटील

शस्त्राच्या बळापेक्षा आत्मबळ महत्त्वाचे – डॉ. अवनीश पाटील ठाणे : बॉम्ब व बंदुकीच्या बळावर मिळवलेला न्याय भीतीवर आधारित असल्याने तो फार काळ टिकत नाही. शस्त्रापेक्षा आत्मबळ महत्वाचे असे मत बीजभाषक…

 मदरसा-मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडवली रहिवाशांची वहिवाट

मदरसा-मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडवली रहिवाशांची वहिवाट पोलिसांकडून तक्रारदारांनाच इशारा अनिल ठाणेकर ठाणे, इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर ३३/३४, मशिदीजवळ वागळे इस्टेट, ठाणे येथे शासकीय भूखंडाबर नवाबी इन्तेजामियाँ…