Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

क्षण आनंदाचा…अभिमानाचा!

क्षण आनंदाचा…अभिमानाचा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले.

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले

लोकशाहीच्या मंदिरात मंत्रालयात लाच घेताना रंगेहात पकडले रमेश औताडे मुंबई :  लोकशाहीचे मंदिर मानले जाणाऱ्या मंत्रालयात अण्टी करप्शन ब्युरो म्हणजेच एसीबीनं सापळा रचून एका क्लार्कला लाच घेताना रंगेहात पकडले. अन्न व औषध प्रशासन…

‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी

‘राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यासाठी मोर्चेबांधणी भाजपा खासदार निशिकांत दुबेंच खाजगी प्रस्ताव  निवडणूक लढण्यास कायमची बंदी घाला नवी दिल्ली : अमेरिका ट्रेड, मेजर जनरल नरवणेंच्या आत्मचरित्रात चीनची झालेली घुसखोरी आणि एप्स्टिन फाईलमधिल भारतीय राजकारण्यांची आलेली नावे यामुळे संसद दणाणून…

भारताचा नामिबियावर विक्रमी विजय

भारताचा नामिबियावर विक्रमी विजय नवी दिल्ली : इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक अर्धशतकांच्या जोरावर भारताने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकात अनोख्या विक्रमाची नोंद केली. धावांच्या विजयी…

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ?

अजित पवारांच्या विमान प्रवासासाठी ‘फिल्डींग’ लावली गेल्याचा संशय ? राजधानी दिल्लीतून रोहीत पवरांचे खळबळजनक आरोप सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि माध्यम सल्लागर नरेश अरोरांवर संशय अरोरांचे माध्यम सल्लागाराचे कंत्राट दादा रद्द करणार…

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन

आता प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्चून बाल, युवा, महिला साहित्य संमेलन मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम व योजना राबवण्यास सुरुवात केली…

  जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद!

जवाहरबाग अग्निशमन केंद्र पुनर्विकासाच्या कामामुळे बंद! भाजपा नगरसेविका नम्रता कोळी यांनी वेधले लक्ष ठाणे : शहरातील सर्वात जुन्या जवाहरबाग अग्निशमन केंद्राचा कारभार सध्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे बंद करण्यात आला आहे. तर शहरातील महत्त्वाची व गर्दीची ठिकाणे लक्षात घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वात जुने अग्निशमन केंद्र म्हणून जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राची नोंद आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपासून अवघ्या ५०० ते ७०० मीटर अंतरावर केंद्राची जागा आहे. ठाणे रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, ठाणे शहर पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, जुनी बाजारपेठ, जांभळी नाका होलसेल मार्केट, शाळा व महाविद्यालये आहेत. या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास काही मिनिटांतच जवाहरबाग केंद्रातून अग्निशमन दलाची गाडी पोचत होती. त्यामुळे तत्काळ मदत कार्याबरोबरच आगीवर नियंत्रण मिळवता येत होते. दुर्घटनेची व्याप्ती पाहून अग्निशमन दलाचे जवान अन्य केंद्रातूनही कुमक बोलत असत. मात्र, केंद्राच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामामुळे आता जवाहरबाग केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे तत्काळ मदतकार्यात अडचणी येत आहेत, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिका आयुक्त व मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी महागिरीतील दाभोळकरवाडी येथे आग लागल्यानंतर कळवा येथून अग्निशमन दलाला बोलाविण्याची वेळ आली. सुदैवाने आग आटोक्यात आल्यामुळे मोठी हानी टळली. या पार्श्वभूमीवर भविष्यातील आपत्तीतील संभाव्य हानी टाळण्यासाठी जवाहरबाग अग्निशमन केंद्र तात्पुरत्या स्वरुपात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गेट क्र. १ जवळ सुरू ठेवावे. त्याठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या ठेवाव्यात, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

 महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महागिरी कोळीवाडा महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोळी समाजाची संस्कृती व खाद्यपदार्थांची ओळख ठाणे: कोळी समाजाची परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांची ओळख करून देणाऱ्या कोळी महोत्सवाला यंदा सलग १४ व्या वर्षी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात हजारो नागरिकांनी सहभागी होण्याचा आनंद लुटला. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. महागिरी कोळीवाडा कोळी समाजाच्या उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या महोत्सवाला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, भाजपाचे शहर सरचिटणीस डॉ. राजेश मढवी, शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, संजय तरे यांच्यासह मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना कलांचा आविष्कार सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच खवय्यांना कोळी समाजातील पारंपरिक रुचकर खाद्यपदार्थांची मेजवानी मिळाली.

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद

शिवमंदिर स्मशानभूमी पुनर्बांधणीसाठी राहणार बंद कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली (पूर्व) विभागातील दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभुमी (मोक्षधाम) ही जुनी स्मशानभुमी तोडून तेथे आधुनिक पध्दतीच्या नविन स्मशानभूमी प्रकल्पास महापालिकेने मंजुरी देऊन सन २०२४ मध्ये कार्यादेश प्रदान केलेला आहे. या स्मशानभुमीची पुर्नबांधणी करण्यासाठी, जुनी स्मशानभुमी तोडण्याचे काम रविवार १५ फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे. यामुळे शिवमंदिर स्मशानभुमीमध्ये फक्त गॅस शवदाहिनी सुरु राहिल, उर्वरित स्मशानभुमी संपुर्णपणे बंद राहील. तरी नागरीकांनी अंत्यविधीसाठी  डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा स्मशानभुमी, डोंबिवली पूर्वेतील ⁠पाथर्ली स्मशानभुमी, कल्याण रोड, आणि ⁠म्हसोबा चौक स्मशानभुमी, ठाकुर्ली या  स्मशानभुमींचा वापर करुन, महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

  दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष!

३० वे समर्थ खो-खो शिबीर दादरमध्ये पुन्हा घुमणार ‘समर्थ’चा जयघोष! मुंबई: दादरच्या क्रीडांगणावर पुन्हा एकदा जोश, जिद्द आणि जाज्वल्य परंपरेचा संगम रंगणार आहे! भारतातील अग्रगण्य क्रीडा संस्था असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरने शतकोत्तर वर्षात पदार्पण करताना क्रीडाप्रेमींसाठी आणली आहे खास मेजवानी, ३० वे समर्थ खो-खो शिबीर! खो-खोच्या मैदानावर शिस्त, चपळता आणि संघभावनेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी यंदाही खेळाडूंना मिळणार आहे. परंपरेचा वारसा आणि गौरवशाली कामगिरी श्री समर्थ व्यायाम मंदिर ही केवळ संस्था नसून भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी पर्व आहे. खो-खो क्षेत्रातील नामांकित संघ म्हणून समर्थची देशभरात ओळख आहे.  संस्थेतील खेळाडू व प्रशिक्षकांनी पद्मश्री पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, क्रीडा संघटक शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार अशा मानाच्या सन्मानांनी गौरव प्राप्त केला आहे. या तेजस्वी परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खो-खो शिबिराचे आयोजन व वेळापत्रक ३० वे समर्थ खो-खो शिबीर हे मंगळवार १७ ते गुरुवार २६ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. समर्थ क्रीडा भवन पटांगण, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (पश्चिम), मुंबई येथे हे शिबीर सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत शिबिरार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरार्थींना प्रामुख्याने खो खो, लंगडी, शरीरतापन, सूर्यनमस्कार, आसन इत्यादी शिकवले जाणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील समर्थचे अनुभवी खेळाडू शिबिरार्थींना थेट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खो खो सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.