Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात

भिवंडी:  राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी येत्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत.२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकी काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात  संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल भा.दं.सं.कलम ५०० प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली होती.या प्रकरणात राहुल गांधी यांनी दिलेले जमीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्यात येणार आहे.त्या साठी राहुल गांधी न्यायालयात येत असल्याची माहिती त्यांचे वकील अँड.नारायण अय्यर यांनी दिली आहे.या प्रकरणात राजेश कुंटे यांची सरतपासणी आणि उलटतपणी झालेली आहे.

महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने  घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून  सुरू होत आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून होईल. शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२०६ रोजी आहे. दहावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे आणि राज्यभरातील ५११९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.

अमृता फडणवीसांनी दिला अ‍ॅक्सिस बँकेच्या नोकरीचा राजीनामा

मुंबई : तब्बल २३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून दिली. अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे…

भारतरत्न मास्टरब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी आज पत्नी अंजली यांच्यासह नंदनवन निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन मुलगा अर्जुन याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.

मुंबई विमानतळावर  हिरे, सोनंसह  कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही  कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. हिरे, सोनेसह कोट्यावधींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी, ८ जणांना अटकही करण्यात आलीय. मुंबई कस्टम झोन – ३ (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास १६.७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३८ लाख रुपयांचे हिरे, १५ लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३८.२८ लाख आहे. याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १५.२४ लाख आहे. विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

छत्रपतींची ४००वी शिवजयंती वर्ल्डक्लास करणार – फडणवीस

पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली…

खळबळजनक : ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यूंना अटक

 जेफ्री एपस्टीन प्रकरणात केली अटक ० लहान मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक इंग्लंड : बाल लैंगिक शोषणाच्या विकृतीचा मास्टरमाईंड जेफ्री एपस्टीन याच्याशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य राजपुत्र अँड्र्यू यांना लंडनमध्ये ब्रिटिश पोलिस यांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली…

स्वराज्याचा सूर्योदय झाला…

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय ज्यांच्यामुळे पहाता आला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजन्म सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, फुलांची सजावट आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे भव्य आणि उत्साहपूर्ण…

मराठी व्यावसायिकांनो गुजरात काबीज करा

 पालकमंत्री गणेश नाईक यांचा व्यावसायिकांना सल्ला ०  ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि ‘कोकण सरस’ प्रदर्शनाचे नाईक यांच्या हस्ते उद्‌घाटन योगेश चांदेकर पालघरः मराठी माणूस कुठेही कमी नाही. त्याला प्रोत्साहन दिले तर…

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर

उल्हासनगरात टँकर पॉईंट येथील पिण्याच्या पाण्याचा गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापर उल्हासनगर : एकीकडे उल्हासनगर शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असताना दुसरीकडे टँकर पॉइंट येथील पिण्याच्या पाण्याचा वापर मलनिःसारण सफाईच्या गाडीमधून पिण्याचे पाणी भरून ते चक्क गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ॲड प्रशांत चंदनशिव यांनी उघडकीस आणून याबाबत अभियंता पालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तक्रार केली आहे. ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले उल्हासनगर शहरातील पूर्व परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये दसरा मैदान जवळ टँकर पॉईंट आहे. शहरात ज्या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नाही अशा ठिकाणी या टँकर पॉइंटवरून पिण्याचे पाणी टँकर मध्ये भरून त्या परिसरातील नागरिकांना पुरवले जाते. पण १८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ च्या सुमारास ॲड प्रशांत चंदनशिव हे त्या ठिकाणाहून जात असताना त्या टँकर पॉईंट इथे मलनिःसारण सफाईची गाडी उभी होती. टँकर पॉईंट वरील पिण्याचे पाणी त्या गाडीत भरत असताना दिसून आले. ते पाणी गटारीचे चेंबर साफ करण्यासाठी वापरले जात असल्याचे त्यांना चौकशीत समजले. एकीकडे शहरात काही परिसरात पाण्याची भीषण टंचाई. तर काही ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने. तर काही भागात कमी दबावाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नागरिकांच्या हक्काचे हे टँकर पॉईंट मधील पाणी मलनिःसारण सफाई करण्याकरिता वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडत असताना याकडे संबंधित अधिकाऱ्याचे व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सांगितले या घटनेबाबत ॲड प्रशांत चंदनशिव यांनी तक्रार करण्यासाठी उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ येथील उपविभागीय कार्यालय मध्ये गेले असता अभियंता मिरकुटे यांना या घटनेबाबत त्यांनी तक्रार केली. तसेच पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांना ई-मेल द्वारे तक्रार करून पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील तक्रार केली आहे. आताही अधिकारी मंडळी या घटनेबाबत कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.