Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उल्हासनगर : उल्हासनगर आगरी सेना ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय विठ्ठलजी तुकाराम जोशी यांच्या सातवे पुण्यस्मरण दिनानिमित्त ठाणे जिल्हा आगरी सेना नेते विजय जोशी यांनी किर्तन व प्रवचन कार्यक्रमासह मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेले या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोतीबिंदू निदान, व निवडक रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया ठेवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम माणेरेगाव येथील सोमेश्वर पॅलेस या ठिकाणी शुक्रवारी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. तसेच ह. भ. प राजेश महाराज देसाई यांचे कीर्तन व प्रवचन ठेवण्यात आले होते. नागरिकांनी कीर्तन व प्रवचनला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती भाजप जिल्हा प्रमुख नंदू परब , शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, नगरसेवक महेशजी पाटील, निलेशजी शिंदे, नवीनजी गवळी, आगरी सेना कार्यअध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी ठाणकर, संघर्ष समितीचे सुमित वजे, संजय फुलोरे ,नगरसेविका पूजा गायकवाड, कविता म्हात्रे , सरोज रॉय, इंदिरा तरे, हेमलता पावशे आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती उल्हासनगर आगरी सेना तालुकाप्रमुख जितेंद्र जोशी यांनी दिली.

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू

साबेगाव खाडी परिसरात विसर्जन व दशक्रिया घाटासाठी पाठपुरावा सुरू खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना नगरसेविका अर्चना पाटील यांच्याकडून निवेदन आरती परब दिवा: साबेगाव खाडी परिसरात दिवा शहरासाठी स्वतंत्र व भव्य गणेश विसर्जन घाट तसेच दशक्रिया विधीसाठी घाट उभारण्याची मागणी पुढे आली असून, यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांची नगरसेविका अर्चना पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सागरी महामंडळ यांची परवानगी मिळविण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. दिवा शहरातील वाढती लोकवस्ती आणि मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सध्या शहराबाहेर जावे लागत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातच योग्य व सुरक्षित विसर्जन व्यवस्था उभी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी या प्रकल्पाची सविस्तर संकल्पना खासदारांना समजावून सांगितली. या संकल्पनेचे कौतुक करत “ही चांगली आणि उपयुक्त योजना आहे,” असे मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संबंधित विभागाला याबाबत पत्र पाठवून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. माजी उपमहापौर तथा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठपुरावा सुरू असल्याचे नगरसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील आणि विभाग प्रमुख नीलेश पाटील हेही उपस्थित होते. या प्रस्तावित घाटामुळे दिवा शहरातील नागरिकांना गणेश विसर्जन व दशक्रिया विधींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि स्थानिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कल्याणमधिल भूमाफियांविरूध्द ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत २७ गावातील द्वारली येथे बेकायदा इमारत उभारणाऱ्या तीन भूमाफियांच्या विरूध्द आय प्रभागाच्या अधीक्षकांनी वरिष्ठांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्याने (एमआरटीपी) कलमाने तक्रार केली आहे.…

विदर्भाचे ज्येष्ठ नेते  दत्ता मेघे यांचे निधन

  नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सुमारे चार दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय राहून…

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस

मुंबई : राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी पुरवठा करण्यात येणार असल्याची…

रेल्वेच्या खांबावर चढून अज्ञात युवकाचा धिंगाणा

 करंट लागून खाली पडला ० रेल्वेसेवा विस्कळीत कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात एक अज्ञात व्यक्तीने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून धिंगाणा घातल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला, तो जवळपास दोन तास त्या खांबावरच…

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांची थर्ड डिग्री

दिवसा तारे आठवले ० शक्ती गेल्याचा आलाप ० चेहरा लपवला नाशिक : भोंदूगिरीच्या जोरावर महाराष्ट्रातील महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या कॅप्टन उर्फ अशोक खरातला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली. अटकेनंतरही तोऱ्यात चालणाऱ्या अशोक खरातला स्वताच्या पायावरही…

नाबाद८९३१ दिवस !

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासनातील नवा विक्रम स्थापित केला आहे. तब्बल सलग ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी…

आसाममध्ये भाजपाचा प्रवास ५ जागांपासून ७५ पर्यंतचा  भाग पहिला

राजू रावल पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होताच देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली…

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय रत्नागिरी : (अशोक गायकवाड )–जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता १ कोटी ९८ लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.