Month: January 2026

भाजपाचा ठाणे महापौरपदावरही दावा

दोन वर्ष महापौर पद अन्यथा भाजपा विरोधात बसणार ०  मुंबई महापौरपदवरून तिढा कायम सिध्देश शिगवण ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने एकहाती बहुमत मिळवले असतानाही भाजपाने ठाणे महापौर पदावर दावा ठोकल्याने नवा…

‘लाल वादळ’ आज पालघरमध्ये थडकणार !

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंचा लाँग मार्च० मागण्यांसाठी अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलन अनिल ठाणेकर ठाणे : आपल्या न्याय मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ आज पालघरमध्ये थडकणार आहे. आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या लाखो लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार.

मुंबईतील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार. मुबई : महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे २४ नगरसेवक विजयी झाले आहेत. या नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाबाजूला धनशक्ती होती, प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यात आले, विरोधी पक्षाला धमक्या देण्यात आल्या. सर्व यंत्रणा सत्ताधारी पक्षासाठी काम करत होती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती होती. जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत २४ नगरसेवक निवडून दिले आहेत. अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या निर्धाराने लढले आहेत. आमची संख्या कमी असली तरी मुंबईकरांच्या प्रश्नावर महापालिकेत आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतील. मुंबईकरांना चांगले रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहतुक कोंडीतून सुटका, बेस्ट बसची चांगली सुविधा, प्रदुषणमुक्त मुंबई करायची आहे. महापालिकांच्या विविध संस्थांमध्ये खाजगीकरणाचा सपाटचा सुरु आहे त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम केले जाईल. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावही अंकुश ठेवण्याचे कामही या नगरसेवकांच्या माध्यमातून केले जाईल, असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपात हुकूमशाही आहे तर काँग्रेसमध्ये लोकशाही आहे, आमच्या पक्षात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणी टिका केली असेल तर पक्ष त्यावर निर्णय घेईल. पक्षाने मला मुंबईच्या अध्यक्षपदाची संधी दिली आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळात मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम आम्ही करणार आहोत असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. “आमच्या नगरसेवकांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे त्यांना कोणत्या हाॅटेलमध्ये ठेवण्याची गरज वाटत नाही”, असा टोलाही खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.

मिरा-भाईंदरमध्ये फेब्रुवारीत मेट्रो धावणार – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदरमध्ये फेब्रुवारीत मेट्रो धावणार – प्रताप सरनाईक मिराभाईंदर, शहराच्या वाहतूक कोंडीपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंतच्या २५ विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. चेना रिव्हर वॉटर फ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा…

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान प्रचार वाहनांवरील झेंडे व फलकांवर निर्बंध जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आदेश अशोक गायकवाड रायगड-अलिबाग :जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवरील पक्ष प्रचाराचे झेंडे व कापडी फलक याबाबत जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी निर्बंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारत निवडणूक आयोगाने १३ जानेवारीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यात गुरुवार, ५ फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू असून तिची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. आदेशानुसार, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा वाहनाच्या डाव्या बाजूस विंडस्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो वाहनाच्या छतापासून २ फुटांपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक हे वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावयचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलकसंबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश आचारसंहितेच्या कालावधीत, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. हा आदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे शक्य नसल्याने पोलीस विभागामार्फत ध्वनीक्षेपकावर जाहीर करून त्याची व्यापक प्रसिद्धी देण्याचेही आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

भाजपच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह? 

भाजपच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह? मिरा – भाईंदरमध्ये मनसेचा बॅनर वाद मिरा -भाईंदर :  मिरा – भाईंदरमध्ये मनसेने लावलेल्या बॅनरची चर्चा सुरू आहे. त्यात लिहिले आहे की, “भाजप जिंकला, पण मीरा-भाईंदर हरला.” हे बॅनर कालच लावण्यात आले. स्थानिक निवडणुकांनंतर मनसे समर्थकांनी बॅनर लावून म्हटले आहे की, ज्यात भाजपने महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या असल्या तरी, खऱ्या मुद्द्यांवर आणि विकासावर त्यांचा पराभव झाला आहे. मिरा -भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवला, ९५ पैकी ७८ जागा जिंकल्या, तर शिवसेनेने तीन, काँग्रेसने १३ आणि एका अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली. हा निकाल येथील शहरात भाजपचा वाढता प्रभाव किंवा प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात होणारा घोटाळा दाखवतो. मनसेच्या या बॅनरवर सोशल मीडियावर असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आहेत. समर्थकांचे म्हणणे आहे की भाजपचा विजय हा जनतेवरचा अन्याय आहे. हे बॅनर आणि ही विधाने निवडणूक निकालांचा परिणाम दाखवून देतात.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे विनामूल्य आरोग्य शिबीर संपन्न ठाणे, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी ठाणे व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वावे येथे विनामूल्य आरोग्य…

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून  मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये महानगर निवडणूक मध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, आणि शिवसेनेने आपले नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवल्याने याबाबत अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. मात्र या सर्व शंकाकुशंकांना पूर्णविराम देत मुंबित महायुतीचाच महापौर होईल असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने महायुती म्हणून सेना – भाजपला मतदान केले असून त्यांच्या मतांशी प्रतारणा करून कोणताही वेगळा निर्णय शिवसेना घेणार नाही. नागरिकांनी याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले. यासोबतच ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजप हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अन्य काही राजकीय समीकरणे तयार होत असल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसून मुंबईत शिवसेना भाजप रिपाइं महायुतीचा महापौर होईल असे त्यांनी सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार अशोक गायकवाड नवी मुंबई : मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलेल्या व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमासाठी देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ नवी दिल्ली येथे १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत आज महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला. महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांनी स्कॉच डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या हस्ते स्विकारला. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा देशपातळीवर दखल घेत झालेला गौरव आहे. करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले अभिनंदन आणि मानले आभार ! नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेला राष्ट्रीय प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ हा नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. या माध्यमातून सुशासन, पारदर्शकता, तंत्रज्ञानाधारित करप्रणाली आणि उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या निकषांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाचा उल्लेख करावा लागेल, कारण हा प्रकल्प म्हणजे केवळ तांत्रिक बदल नसून नागरिकांचा विश्वास निर्माण करणारा आणि शहराच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मजबूत पाया आहे. त्यामुळे करभरणा करून शहर विकासात हातभार लावणा-या नागरिकांचे सर्वात मोठे योगदान असल्याबदद्ल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून आभार व्यक्त केले आहेत. मालमत्ता कर व्यवस्थेत आमुलाग्र व संरचनात्मक सुधारणा नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्वीच्या हस्तलिखित, त्रुटीपूर्ण व अर्धवार्षिक कर आकारणी प्रणालीऐवजी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णतः नव्याने सूत्रबध्द व सुनियोजित रचना केलेली मालमत्ता कर प्रणाली अंमलात आणली. या प्रणालीअंतर्गत एकच निश्चित वार्षिक करबिल, शासकीय दरांवर आधारित स्वयंचलित करआकारणी, पारदर्शक व न्याय्य मूल्यांकन, नागरिकांना समजेल अशी सोपी कररचना यांची अंमलबजावणी करण्यात आली. नागरिकांचा सहभाग केंद्रस्थानी ठेवून राबवलेली डिजिटल प्रणाली मालमत्ता कर प्रणालीतील सुधारणांमध्ये सर्वसमावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात आले. नागरिकांसाठी एकाच वेळी ऑफलाईन व ऑनलाईन विविध माध्यमांतून कर भरण्याची सुविधा, क्यूआर कोडद्वारे सुलभ कर भरणा सुविधा देण्यात आली. महानगरपालिकेची www.nmmc.gov.in वेबसाईट, My NMMC ॲप, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड तसेच जीपे, फोनपे, पेटीएम अशा सर्व युपीआय सुविधा आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट अशा विविध प्रकारच्या करभरणा सेवा, जनजागृती मोहिमा व माहिती – आधारित थकबाकी वसूली मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे कर भरण्याबाबत नागरिकांचा विश्वास वाढून स्वयंस्फूर्त सहभाग लक्षणीयरित्या वाढला. भौगोलिक नोंदणी व माहिती शुद्धीकरणामुळे अचूकता मालमत्तांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी मालमत्तांचे भौगोलिक स्थान नोंदविणे, पत्त्यांची पडताळणी व अद्ययावत नोंद, संपर्क क्रमांकांची खात्री, उच्च कर क्षमतेच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रित कारवाई करण्यात आली. यामुळे करआकारणी व संकलनात अचूकता आणि पारदर्शकता वाढली. कर संकलनात ऐतिहासिक वाढ मालमत्ता कर सुधारणा उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये एकूण ४७८.३५ कोटींचे मालमत्ता कर संकलन नोंदविण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ५९ हजार ४२५ मालमत्तांकडून कर भरणा, चालू कर संकलन ४२७.२० कोटी, थकबाकी कर संकलन ५१.१५ कोटी, ऑनलाइन कर भरण्यात सुमारे चारपट वाढ, अशी उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे. शहराच्या विकासासाठी स्थिर आर्थिक पाया या सुधारणा प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा आर्थिक प्रवाह स्थिर झाला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत विश्वास निर्माण होऊन तक्रारी व वादांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मालमत्ता कर भरणा प्रक्रियेत राबविलेल्या विविधांगी व्यापक सुधारणा व नागरिक-केंद्रित डिजिटल प्रशासन उपक्रमांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५ – सिल्व्हर’ प्रदान करून गौरविण्यात आले असून याव्दारे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…!

सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…! आरोग्य मंत्री आबिटकर यांचे उप-संचालकांना आदेश..! सावंतवाडी/राजन चव्हाण सावंतवाडी  उप -जिल्हा रुंग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’, ‘आय.सी.यु’, ‘रक्तपेढी’, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदी समस्या तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य उप-संचालक डॉ. दिलीप माने यांना दिले. सावंतवाडी उप – जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड,रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग चे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ऍड. नंदन वेंगुर्लेकर,संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने आबिटकर यांची आज त्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेतली. अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी उप- जिल्हा रुग्णालय प्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,इथल्या दुरावस्थेमुळे, गोवा-बांबुळी येथे पाठवले जाणारे पेशंट, रखडलेले मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यासंदर्भात निमंत्रक ओगले यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.कृती समितीच्या वतीने आबिटकर  यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.  सावंतवाडीत उप -जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्ना संदर्भात येत्या २६ जानेवारीला उप -जिल्हा रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा  इशाराही समितीने दिला आहे.