मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. एससी,एसटी ,ओबीसी यासह कोणत्याही समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही असे नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी वांरवार सांगीतले आहे.तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणा मध्ये मोदी आरक्षण हिरावून घेतील असा खोटा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपची तक्रार निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे रिपाइचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सगीतले आहे. हैदराबाद येथे आयोजित रिपाइंच्या बैठकीत ते बोलत होते.

गेल्या १० वर्षात चांगले काम करुन मोदींनी जनतेचा विश्वास जिंकला आहे.त्यामुळे काँग्रेस आणि विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरले नाहीत.त्यामुळे राहुल गांधी हे मोदींवर धादांत खोटे आरोप करित आहेत.दलित बहुजन जनतेत संभ्रम आणि भिती निमार्ण करण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत.

यांची दखल निवडणुक आयोगाने घ्यावी, ईमेल पाठवून ही तक्रार करणार असल्याचे आठवले यांनी सांगीतले आहे. रिपाइंचे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष रविकुमार पसुला हे वरंगल या अनुसुचित जातीसाठी राखीव लोकसभा मतदार संघात पक्षाच्या वतीने निवडणुक लढत आहेत. तर तेंलगणात १६ जागांवर भाजपला पक्षाचा पाठींबा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *