Author: bittambatami.com

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीलाच शिवसेनेच्या मालकीची सुनावणी सुप्रीम कोर्टाचे आस्तेकदम पक्ष आणि चिन्हावर आता शुक्रवारी २३ जानेवारीला सुनावणी नवी दिल्ली: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या रक्त आणि घामाने उभा केलेल्या शिवसेना…

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’!

ठाकरे बंधूंच्या युतीचे ‘कल्याण’! मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेला पाठींबा ठाकरेंचे ४ नगरसेवकही फुटले शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार स्वाती घोसाळकर कल्याण : तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती करून कल्याण डोंबिवलीत ५…

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख

पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार – सहर शेख एमआयएमच्या नगरसेविकेचे आव्हाडांना आव्हान ठाणे : पुढील पाच वर्षत संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार एमआयएमचा असेल. असे थेट आव्हान मुंब्य्रातील…

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा

संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबतची युती तोडा भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची  अखेर युती झाली आहे. शिवसेना २५ तर भाजप २७ जागा लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेकडून पालकमंत्री संजय शिरसाट तर भाजपकडून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी घोषणा केली. मात्र, युतीच्या घोषणेनंतर संभाजीनगरमध्ये  राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्यासमोर हात जोडले, तसेच त्यांच्या गाड्याही अडवल्या. साहेब, युती तोडा असे म्हणत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. संभाजीनगरमधील शिवसेना-भाजपची ही युती जिल्ह्यातील केवळ सात तालुक्यात असणार आहे. मात्र, सोयगाव आणि सिल्लोड या दोन तालुक्यातील ११ ठिकाणी युती न करता शिवसेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांचा जसा राडा झाला होता तसाच राडा आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या युतीच्या घोषणेनंतर त्याच ठिकाणी झाला. वैजापूर तालुक्यातील भाजपचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे थेट मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार खासदार यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्यांची गाडीही अडवली. त्यामुळे काही काळ राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला. अखेर, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्री अतुल सावे निघून गेले. वैजापूर तालुक्यातील आठ जागांपैकी केवळ तीन जागा भाजपला मिळाले आहेत. त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला, अनेक वर्षे आम्ही निवडणुकीची तयारी करीत होतो. मात्र, ती जागा शिवसेनेला गेली आणि तिथं भाजप नेत्यांना शिव्या देणारा व्यक्ती उमेदवार असणार आहे. त्यामुळं आता आम्ही त्यांच्यासाठी काम करायचं का? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत पाणी बाणी

मुंबईत पाणी बाणी तब्बल ४४ तास पाणीपुरवठा बंद मुंबई : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा. मेट्रोच्या कामामुळे मुंबईत तब्बल ४४ तास पाणीबाणी असणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे  मुंबईकरांना  पुढील काही दिवस उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी प्यावे लागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘मेट्रो 7अ’ प्रकल्पासाठी ४०० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. परिणामी वळवलेल्या जलवाहिनीला पूर्व विभागाशी जोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी हा पाणीपुरवठ खंडीत होणार आहे. दरम्यान, मंगळवार, २० जानेवारी ते २२ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दादर, प्रभादेवी, माहीम, धारावी, अंधेरी पूर्व, विक्रोळी, भांडुप, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पश्चिमेकडील अनेक भागात हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. बीएमसीच्या जी नॉर्थ, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन विभागातील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार काही भागात पाणीपुरवठा कमी होईल. तर नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळा देखील बदलल्या जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने बाधित भागातील रहिवाशांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व विभागात क्रॉस-कनेक्शनचे काम केले जाईल. हे काम मंगळवार ते गुरुवार एकूण ४४ तास सुरू राहील. या भागात पाणीपुरवठा प्रभावित होईल. असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर

जल,जंगल,जमीनसाठी आदिवासीर रस्त्यावर पालघर : जल,जंगल आणि जमीनीसाठी आदिवासी आता रस्त्यावर उतरली आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न तसेच रोजगार हमी, प्रलंबित वन हक्क दावे, स्मार्ट मीटर संदर्भातील समस्या, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, रेशन, शिक्षण, आरोग्य, रोजगार व पेसा अंतर्गत नोकर भरती सारखे प्रश्न सुटले नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला लॉंग मार्च रुपी आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे यांनी दिला. पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या वाढवण व मुरबे बंदर, सागरी विमानतळ, चौथी मुंबई सारख्या प्रकल्पांमुळे अदानी व मूठभर धनाड्यांचा लाभ होणार असून हजारो शेतकरी मच्छिमार व आदिवासी कुटुंब देशोधडीला लागतील असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉ. अशोक ढवळे यांनी पालघर येथे केले. चारोटी (डहाणू) येथून काल (सोमवारी) दुपारी सुरू झालेला लॉंग मार्च मोर्चा आज सायंकाळी उशिरा आले पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या मोर्चामध्ये ३५ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा उस्फूर्त सहभाग लाभला होता. सन २०१८ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक – मुंबई दरम्यान काढलेल्या लॉंग मार्च प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान सभा सोबत केलेल्या मागण्यांबाबत करारनामा केला होता. मात्र त्यामधील समाविष्ट बहुतांश मागण्यांची अंमलबजावण झाली नसल्याने कम्युनिस्ट पक्षाने वेळोवेळी लढे दिले, मोर्चे व आंदोलनाचे ठिकठिकाणी आयोजन केले होते. मात्र या आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉंग मार्च चे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली.

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट

शिंदेंच्या २९ नगरसेवकांचे हॉटेलमधून चेकआऊट  ४ दिवसांनी घरी परतले ० हॉटेल पॉलिटिक्स संपले ० दिल्ली पॉलिटिक्स सुरु स्वाती घोसाळकर मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील २९ नगरसेवकांचा हॉटेलमधिल मुक्काम आज…

भाजपात आजापासून नबीन पर्व !

भाजपात आजापासून नबीन पर्व ! नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड  नबीन ठरले भाजपाचे सर्वात तरुण अध्यक्ष नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीत आजपासून नबीन पर्व सुरु झाले आहे. भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे ही घोषणा करण्यात आली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मंत्री नितीन गडकरी, जे.पी.नड्डा यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे निवडणूक अधिकारी के लक्ष्मण यांनी अध्यक्षपदासाठी घेतलेल्या निवडणुकीची माहिती सगळ्यांना दिली. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांचा एकमेव अर्ज आल्याचं सांगत त्यांनी नबीन यांच्या नावाची घोषणा करत त्यांना निवडीचं प्रमाणपत्र सोपवले. नितीन नबीन हे मूळ कार्यकर्ते आहे. अगदी लहान वयात ते ५ वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेत. बिहार सरकारमध्ये अनेकदा ते मंत्री होते. राष्ट्रीय युवा मोर्चाचे महासचिव म्हणून त्यांनी देशभरात काम केले. सिक्कीम, छत्तीसगड येथे प्रभारी म्हणून काम केले. संघटनेतील अनुभवासोबत त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी पुढे जाईल असा विश्वासमावळते अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केला. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे रिटनिंग ऑफिसर म्हणून के. लक्ष्मण यांच्याकडे नितीन नबीन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. एकूण नामांकनाचे ३७ संच सादर करण्यात आले ते सर्व अर्ज वैध ठरले. नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २ ते ४ या वेळेत पूर्ण झाली. नामांकन अर्जाच्या ३७ संचांपैकी ३६ संच विविध राज्यातून आले. उरलेला एक संच भाजपा संसदीय मंडळाच्या सदस्यांकडून सादर करण्यात आला. त्यात पंतप्रधान आणि ३७ खासदारांचा समावेश होता. अर्ज परत घेण्याच्या कालावधीनंतर केवळ एकमेव अर्ज नितीन नबीन यांचा राहिला. आतापर्यंतचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? ६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. १९८० ते १९८६ या काळात अटल बिहारी वाजपेयी हे वयाच्या ५५ व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. त्यानंतर १९८६ ते १९९१ या काळात लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व होते. तेव्हा त्यांचे वय ५८ वर्ष होते. त्यानंतर १९९३ ते १९९८, २००४ ते २००५ असे तीन वेळा अडवाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. १९९१ ते ११९३ या काळात वयाच्या ५७ व्या वर्षी मुरली मनोहर जोशी यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. १९९८ ते २००० या काळात कुशाभाऊ ठाकरे, २०००-२००१  बंगारू लक्ष्मण, २००१-२००२ जना कृष्णमूर्ती, २००२-२००४ या काळात व्यंकय्या नायडू, २००५ ते २००९ आणि २०१३-२०१४ या काळात राजनाथ सिंह, २००९ ते २०१३ मध्ये नितीन गडकरी, २०१४ ते २०२० वयाच्या ४९ व्या वर्षी अमित शाह यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. २०२० ते २०२४ या काळात जे.पी. नड्डा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आणि आता नितीन नबीन भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. नबीन माझे…

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी

शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबात आज सुप्रीम सुनावणी नवी दिल्ली : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणीही यावेळी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण…