Author: bittambatami.com

२७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन आरटीई’ प्रवेश – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर दि. १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. ०००००

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार –  प्रताप सरनाईक

ठाणे : ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील…

अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात आर्थिक ई क्रांती – सारंग दर्शने

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचे पंतप्रधानपद तीन वेळा भुषविणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये आर्थिक आघाडीवर मोठे काम केले, किंबहुना अटलजींच्या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सारंग दर्शने यांनी केले. ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुल पटांगणात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातुन सुरू असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत सारंग दर्शने यांनी सोमवारी (ता.१३ जाने.) रोजी ‘अटलजींचा वसा आणि वारसा’ हे सहावे पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक, सुहास जावडेकर उपस्थित होते. लेखक दर्शने यांनी, अटलजींच्या चरित्राचे पैलु उलगडताना संघाचे प्रचारक, जनसंघ ते पंतप्रधान पदापर्यतचा प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. १९५० चे दशक ते १९७७ पर्यतचा काळ बिकट होता. समाजात उद्योजकतेला स्थान मिळत नव्हते. जागतीक अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत होती. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बनलेल्या अटलजींनी त्याही वातावरणात देशाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केले. १९८५ – ८६ नंतर भारतीय जनता पक्षामध्ये गांधीवादी समाजवाद मागे पडत गेल्याचे सांगुन दर्शने यांनी, अटलजींच्या प्रतिभाशाली राजकिय कारकिर्दीवर प्रकाश टाकला. १९९६, १९९८ आणि १९९९ असे तीन वेळा अटलजींनी पंतप्रधान पद भुषविले. त्यांच्या कारकिर्दीमध्येच भारताने आर्थिक आघाडीवर मोठे काम केले. कम्युनिकेशनचे खाते स्वतःकडे घेत अटलजींनी कम्युनिकेशनचे ब्रिटीशकालीन कायदे बदलुन दुरसंचार धोरणात आमुलाग्र बदल केले. अटलजींच्या या द्रष्टेपणामुळेच भारतात कम्युनिकेशनची आर्थिक ई क्रांती झाली. ज्यामुळे देशातील १०० कोटी जनता आज ई पेमेंटचा वापर करीत असुन त्याचा पदोपदी प्रत्यय येत असल्याचे दर्शने यांनी सांगितले. नेतृत्वाचा कस लागणारे अनेक निर्णय अटलजींनी घेतले. ज्यात “बुद्ध पुन्हा हसला” या अणुस्फोटाच्या धाडसी निर्णयाचा समावेश आहे. अणुचाचण्यांपासून ते अंतराळ मोहिम आणि शैक्षणिक सुधारणांपर्यंतचे अनेक निर्णय घेतल्याने भारताची महासत्ता बनण्याकडे वाटचालीचा पाया रचला गेला. किमान समान कार्यक्रम राबवताना अटलजींनी पक्षाच्या धोरणांचा कधीच विसर पडु दिला नाही. अटलजींकडे पूर्ण बहुमत असते तर देशात समान नागरी कायदा कधीच पारित झाला असता, असे स्पष्ट करताना दर्शने यांनी अटलजींच्या नेतृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टी विषद केल्या. राजकारणापेक्षा कवी म्हणून चांगली कारकिर्द केली असती, डॉक्टरेट करायची राहुन गेली आणि अध्यापन क्षेत्रात काम करणे राहुन गेल्याची खंत देखील अटलजींनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. अशा कवी, राजकारणी आणि दूरदृष्टी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर भारताच्या वाटचालीवर पुढील किमान ५० वर्षे प्रभाव राहिल. असेही दर्शने यांनी सांगितले. ००००

कार्यवाही न केल्यामुळे जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार यांना २५ हजारांचा दंड

अशोक गायकवाड खालापुर :जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. सदर शास्ती बाबतच्या नोंदी जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे यांच्या सेवाबुकमध्ये नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे असेही सुधीर पाटील यांनी सांगितले आहे. पेण येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा पदाधिकारी सुधीर राजाराम पाटील यांनी पेण तहसील कार्यालय येथे कार्यालयीन माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर जन माहिती अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले होते.प्रथम अपिलीय अधिकारी यांनी आदेश देऊनही कार्यालयीन जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय पेण, यांनी माहिती पुरविली नाही. त्यामुळे कायद्याचे कलम १८/१ अनुसार मा. माहिती आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे पाटील यांनी तक्रार केली होती. (तक्रार क्रमांक ६३५/२०२१). त्या तक्रारीच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी धनंजय कांबळे, निवासी नायब तहसीलदार पेण यांना रुपये २५ हजार एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात आलेला असुन माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. 000000

जी.एस.वैद्य आदरणीय व्यक्तिमत्व : संजय गायतोंडे

मुंबई : १९४६ साली कुर्ला स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत जी.एस.तथा गनाभाऊ  वैद्य यांचा मोलाचा वाट होता. बारीक चणीचा हा हाडाचा क्रिकेटप्रेमी भरतण्याची संधी म्हणजे गेली ६६ वर्षे सुरु असलेली बाळकृष्ण् बापट स्मृती…

कोकण विभागीय लोकशाही दिनी 5 अर्ज प्राप्त

नवी मुंबई : कोंकण विभागीय लोकशाही दिन कोंकण भवनमध्ये अप्पर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी…

‘आप‌’ची कसोटी

दिल्ली विधानसभेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. गेल्या 27 वर्षांपासून दिल्लीत सत्ता मिळवण्याची आस असलेला भाजप, गेल्या एका तपापासून सातत्याने जनाधार गमावत असलेली काँग्रेस आणि मोदी लाटेतही सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी…

तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…..!!

भारतीय संस्कृतीत सणांना अतिशय महत्व आहे. प्रत्येक सण विशिष्ट असा संदेश देत असतो. या सणातून एक वेगळीच प्रेरणा मिळत असते. मकर संक्रात हा त्यापैकीच एक सण. मकर संक्रात हा वर्षातील…