Author: bittambatami.com

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

रमेश औताडे मुंबई : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते. झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपयांत दिली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. २८ फेब्रुवारी १९९३ रोजी या धर्मशाळेचे भूमिपूजन झाले. सात वर्षांनी इमारतरूपी ही धर्मशाळा उभी झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याच्या सोयीवर लक्ष केंद्रित असूनही त्यांना भोजन देणे, दूध आणि फळे देणे, महाग औषधे असतील तर त्यासाठी काही दात्यांचा शोध घेणे, वैद्यकीय शिबिरे भरवणे, भुकेलेल्यांना अन्नदान करणे अशा अनेक उपक्रमांतून धर्मशाळेचा अखंड प्रवास सुरू आहे. परळ येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत दिवसाला १०० लोक राहण्याची सोय आहे. या धर्मशाळेत १६ रूम असून, वर्षाला जवळपास साडेतीन हजार रुग्णांची सोय केली जाते. कर्करोगग्रस्त लहान मुलांना अनेक महिने इथेच राहावे लागते. त्यांचे आई-वडील अनेकदा त्यांना पदपथावर झोपवतात. केईएम, वाडिया आणि टाटा या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांतील रुग्णांसाठी ही धर्मशाळा खरंच आधार बनली आहे. मुलांना मनोरंजन म्हणून टीव्हीचीदेखील सोय आहे. या वास्तूची निर्मिती गुणवंतराव चराटे यांनी केली. स्वच्छतेवर भर देत आजही पंढरपूरच्या दिंडीत जवळपास ४०० ते ५०० स्वच्छता कर्मचारी सहभागी होतात. तिथला संपूर्ण परिसर स्वच्छ करतात, असेही सामंत यांनी सांगितले. 00000

मुलुंडमधील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलुंडमध्ये नुकताच ममता दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेच्या   शाखा क्रं १०८ व  फँमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई  तर्फे महिलां पुरुषांसाठी…

कोकणी-मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही

सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.

१९७२ साली अकरावी उत्तीर्ण झालेल्यांची आदिवासी शाळांमध्ये घसघशीत मदत

– सत्तरी गाठलेल्या ‘मुली मुलां’चा उत्साह कौतुकास्पद ठाणे, दि. (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथील दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय येथे १९७२ साली अकरावी (जुनी) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी समाज माध्यमाद्वारे एकत्र येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात सुमारे सहा शाळांना भेट दिली आणि तेथील मुली, मुले आणि शिक्षक तसेच शाळांना घसघशीत सहाय्य केले. सत्तरी ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांच्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमावर ‘आम्ही १९७२चे विद्यार्थी’ असा समूह काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. या माध्यमातून १९७२ साली जुनी अकरावी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५४ मुली आणि मुलांनी (आज मितीस सत्तरीत असलेल्या) एकत्र येऊन काही विधायक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अंदाड येथे भेट दिली. ‌विशेष म्हणजे दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेचीच शाखा अंदाड येथे असून सौ. दीपिका विशे या मुख्याध्यापिका आहेत.   त्यानंतर अंदाड येथे प्रवीण शिर्के मुख्याध्यापक असलेल्या  शाळेला भेट दिली. यानंतर  हीव, सपाटपाडा, मानिचा पाडा येथील शाळांना भेटी दिल्या. या ठिकाणी मडके, कुंदे, चौधरी, हुलावळे, पाटील असे शिक्षक आदिवासी मुले मुलींना आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पाटी, पेन्सिल, कंपॉस, वह्या, चित्रकला वह्या, रंग, खोडरबर, शाळेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू, सतरंजी पट्ट्या, रोख रक्कम अशाप्रकारे सहाय्य करण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षिका, शिक्षक, कर्मचारी, गणवेशातील मुली, मुले यांनी अतीशय शिस्तबद्ध पद्धतीने या सत्तरीतल्या मुली मुलांचे प्रेमादराने स्वागत केले. रमेश कुर्जेकर, भारती सातघरे, भारती चव्हाण, ज्योती तावडे, सिद्धार्थ पुराणिक, सरोजिनी राणे, नीलांबरी गुप्ते, प्रतिभा धर्माधिकारी, प्रकाश मावळणकर, रत्नाकर कोर्डे, अनघा पोतनीस, संजीव पोतनीस, विजय औटी, दिगंबर वेर्णेकर यांचा या १९७२ च्या तुकडीत समावेश होता. भारती सातघरे, रत्नाकर कोरडे, सिद्धार्थ पुराणिक यांनी या तुकडीचे नेतृत्व करतांना मुंबईहून सर्व शालोपयोगी साहित्य आणण्यासाठी परिश्रम घेतले. उद्योजक (व विद्यार्थी) विश्वनाथ पनवेलकर यांनी ही सहकार्य केले.

देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठीचा सुगंध दरवळेल ! शरद पवार

दिल्ली येथे पार पडणाऱ्या ‘९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा स्वागताध्यक्ष म्हणून मराठी साहित्यकांशी आज संवाद साधला. गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे दौरे, भाषणं सुरु होते. त्यातील सातत्यपूर्ण संबोधनामुळे माझा घसा बसला…

बिघडलेली ‌‘इंडिया‌’ आघाडी

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांमध्ये ‌‘इंडिया‌’ आघाडीमध्ये बिघाडी सुरू झाली आहे. विरोधक कोण आणि मित्र कोण याचे भान ‌‘इंडिया‌’ आघाडीतील घटक पक्ष गमावून बसले आहेत. आता एकमेकांना संपवण्याची भाषा सुरू…

आजची युवा पिढी व सद्यस्थिती

जगातील सर्वात तरुण जन देश जर कोणता असेल तर तो आपला भारत देश आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या १४४ कोटी इतकी आहे. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या ही…

देवाच्या दारी आणखी किती बळी?

भाविकांची हुल्लडबाजी आणि बालाजी मंदिर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तिरुमल्ला येथे सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्येक शहरांमध्ये प्रति बालाजी मंदिरे असताना इतक्या गर्दीच्यावेळी जाऊन जीव धोक्यात घालण्याची…

मुंडे विरोधातील मोहिमेला भाजपाचे बळ ?

महाविकास आघाडीच्या नव्या सरकारची स्थापना सरत्या वर्षी 5 डिसेंबरला झाली. सरकारचा शपथविधी झाला आणि 17 डिसेंबरला सरकारमध्ये मंत्री मंडळातील सर्व 42 जागा एकाच फटक्यात भरल्या गेल्या. त्या मंत्र्यांना खाते वाटप…