Author: bittambatami.com

हाच नियम भारतात सुध्दा लागु व्हायला हवा

स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल व टिव्ही पाहण्यास बंदी! हाच नियम भारतात सुध्दा लागु व्हायला हवा आज फक्त स्वीडनमध्येच नाही तर संपूर्ण जगात टिव्ही आणि मोबाईलच्या अती वापरामुळे दुष्परिणामाला सुरूवात…

 महाडमध्ये आज होणार हुतात्म्यांचे स्मरण

 स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, रायगड जि. प.च्या वतीने हुतात्मादिनाचे आयोजन महाड : ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा एल्गार झालेला असतानाच महाडमध्येदेखील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली १० सप्टेंबर १९४२ ला ब्रिटिशांना चले जाव करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या किसान मोर्चावर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. या दिवसाचे स्मरण करण्याकरिता आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी महाडमध्ये १० सप्टेंबरला हुतात्मादिन साजरा करण्यात येतो. यावर्षीही ८२ व्या हुतात्मादिनाचे आज आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाड शहरात स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद, रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या हुतात्मादिनाचे आयोजन करण्यात येते. महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिल्यानंतर त्याचे पडसाद महाडमध्येही उमटले. १० सप्टेंबर १९४२ ला महाडमध्ये महाड तहसील कचेरी ताब्यात घेण्यासाठी किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर शहरातील पिंपळपार या ठिकाणी तात्कालीन इंग्रज सरकारने अंधाधुंद असा गोळीबार केला. या बेछूट गोळीबारामध्ये कमलाकर दांडेकर या विद्यार्थ्यासह वसंत दाते, अर्जुन भोई कडू, विठ्ठल बिरवाडकर, नथू टेकावले या भारत मातेच्या पाच वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या स्मृती पुढील पिढीला स्मरणात रहाव्यात या उद्देशाने स्वातंत्र्यसैनिक स्मृती समिती, महाड नगर परिषद रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या दिनाचे आयोजन केले जाते. हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली मंगळवार सकाळी ८.३० वाजता शाळा क्रमांक चार येथे या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्म्यांच्या तसबिरीला पुष्पमालिका व श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे. या कार्यक्रमाला महाडचे आमदार भरत गोगावले, म्हाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांसह विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांतील आप्तगण, तसेच महाडमधील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शाळा क्रमांक चार येथून मुख्य बाजारपेठेतील विविध चौकांमध्ये असलेल्या हुतात्म्यांच्या नामफलकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण केल्या जातील. या कार्यक्रमाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक येथे होणार असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.    

 दरडींच्या ठिकाणी पालिका बांधणार संरक्षक भिंती

 ११५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी, मालाड येथील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून, त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडुपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील पाच ठिकाणे, देवनार परिसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत. ९,६०० झोपड्यांचे होणार स्थलांतर मुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी नऊ हजार ६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे.

श्री गणपतीची साडेतीन शक्तिपीठे मोरगाव-प्रथम पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर अनेकांना देवीची साडेतीन शक्तिपीठे माहित आहेत. सर्वसाधारणपणे लोकांन अष्टविनायक माहित आहेत.महाराष्ट्रातील ही अष्टविनायकाची क्षेत्रे म्हणजे सर्व गणेशभक्तांची श्रद्धास्थानं. अष्टविनायक म्हणजे मोरगावचा श्रीमोरेश्वर, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, पालीचा श्रीबल्लाळेश्वर, महडचा…

 दीड दिवसांच्या 10672 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन

     इकोफ्रेंडली गणेशोत्सवाला प्रतिसाद देत 2175 शाडूच्या गणेशमूर्तींचे विसर्जन  पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत 2766 गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव 2024 ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त’ साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. 7 सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील 10672 श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळे अशा 158 विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या 10672 श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, चोख व्यवस्था केली होती. आठही विभाग कार्यालयांमार्फत संबधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली त्या त्या विभागातील विसर्जन स्थळांवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी संबधित अधिकारी, कर्मचारी व  स्वयंसेवक तत्पर होते. ठिकठिकाणच्या नागरिकांनी उत्तम विसर्जन व्यवस्था ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त करीत महानगरपालिकेची प्रशंसा केली. त्यास अनुसरुन 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 7895 घरगुती तसेच 11 सार्वजनिक मंडळांच्या 7906 श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 136 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2761 घरगुती तसेच 5 सार्वजनिक मंडळांच्या 2766 श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे 10656 घरगुती व 16 सार्वजनिक मंडळांच्या एकूण 10672 श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या 2174 मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात 5 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 2035 घरगुतीव 04 सार्वजनिक तसेच 19 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 374 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरुळ विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1119 घरगुती तसेच 26 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 372 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्नझाले. वाशी विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 745 घरगुती व 02 सार्वजनिक तसेच 16 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 433 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तुर्भे विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 472 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 17 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 443 घरगुती व 3 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन झाले. कोपरखैरणे विभागात 2 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 901 घरगुती तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 419 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. घणसोली विभागात 4 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1343 घरगुती व 01 सार्वजनिक तसेच 15 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 208 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ऐरोली विभागात 3 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर 1220 घरगुती व 03 सार्वजनिक तसेच 18 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 383 घरगुती व 1 सार्वजनिक श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले. दिघा विभागात 1 नैसर्गिक विसर्जन स्थळावर 59 घरगुती तसेच 11 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 129 घरगुती श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन संपन्न झाले.…

पुन्हा झुंडशाही

गेल्या आठवड्यात पुण्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी झुंडशाहीविरोधात वक्तव्य केले. सर्वोच्च न्यायालयानेही कायदा हातात घेण्याविरोधात टिप्पणी केली. त्यानंतर लगेच कायदा हातात घेण्याच्या आणखी काही घटना घडल्या. सरकारने केलेल्या…

मुख्यमंत्री शिंदेनीच केला ‘दादां’चा करेक्ट कार्यक्रम !

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून चक्क मुख्यमंत्र्यांनाच बगल देणाऱ्या राष्ट्रवादीच्या जाहीरातीमुळे दादा आणि भाईंचे (एकनाथ शिंदे) नेते आणि कार्यकर्ते आमने सामने ठाकले होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्याय नेत्यांनीही याबाबत जोरदार आक्षेप नोंदवूनही…

गणेशोत्सव मंडपात शासकीय योजनांची प्रसिध्दी

विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाचा आदर्श उपक्रम ठाणे : शासकीय योजनांची प्रसिध्दी व्हावी, गरजूंना त्यांचा लाभ मिळावा, यासाठी ठाणे येथील विहंग गार्डन सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ यांनी उभारलेल्या गणेशोत्सव मंडपात जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहकार्याने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या प्रसिध्दीचे बॅनर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी अनेक भक्त दर्शनासाठी येत असून या प्रसिध्दी बॅनर्सच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजय बाऱ्हाटे, सचिव भूपेंद्र मिस्त्री, खजिनदार डॉ.विजय पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले. विहंग गार्डन सार्वजनिक  गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला आणि बालविकास विभागाने यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या उपक्रमाचे इतर सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनीही अनुकरण करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

केडीएमसी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दक्षता गुणनियंत्रण विभागातील अधिकारी संजय सोमवंशी एका कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची पुष्टी अद्याप झालेली नाही. महापालिकेच्या दक्षता गुण नियंत्रण विभागात एक प्रयोगशाळा…