Author: bittambatami.com

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी आभासी पध्दतीने होणार संविधान मंदिराचे उद्घाटन

ठाणे : कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), ठाणे द्वारा शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व) ४००…

ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी (VVPAT) जनजागृती कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ईव्हीएम (EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ईव्हीएम(EVM) व व्हीव्हीपीएटी(VVPAT) संच जनजागृती कार्यक्रमाचा आज दि.11 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी…

धार्मिक अल्पसंख्यांक शाळांनी अनुदान योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात…

चंद्रपूरच्या आशा बावणे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

आदिवासी क्षेत्रातील सेवा आणि कोविड काळातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार   नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका…

बेघर निराश्रित नागरिकांसाठी नवी मुंबईत घणसोली येथे बेघर निवारा केंद्र कार्यान्वित

नवी मुंबई : शहरातील बेघर, निराश्रित नागरिकांना निवारा मिळावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 15 मार्च 2024 पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले…

पश्चिम रेल्वेचे ‘गो ग्रीन’ मुंबई सेंट्रल परिसरात ५० ठिकाणी सौर पॅनेल, ३.३३ कोटींची बचत

मुंबई :पश्चिम रेल्वेनेमुंबई सेंट्रल स्थानक परिसरात ५० ठिकाणी १३.०८ मेगावॉट क्षमतेचे सौर पॅनेल बसविले आहेत. यासोबतच वडोदरा विभागातील ३५, रतलाम विभागातील ६०, अहमदाबाद विभागातील १६, राजकोट विभागातील ३४ आणि भावनगर…

शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई : मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून १३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण हे १ ऑक्टोबरपासून हाती…

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक

मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५…

महायुती सरकारचा भूखंडावर ताव

लाडक्या मंत्र्यांसाठी योजना मंत्री संजय राठोड, बिल्डरमंत्री लाभार्थी  भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करा- विजय वडेट्टीवार मुंबई : महायुतीच्या मंत्र्यांनी सरकारी तिजोरी फस्त केली. त्यामुळे आता ‘भूखंडावर ताव मारा आणि तृप्त व्हा’ अशी नवी योजना महायुती सरकारने लाडक्या मंत्र्यांसाठी आणली आहे. या योजनेचे लाभार्थी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत. मंत्रीमंडळात असणाऱ्या बिल्डर मंत्र्यांनी देखील सातशे कोटींचा भूखंड जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशनच्या नावाखाली हडप केला आहे. कुलाबा महसूल विभागातील हा मोक्याचा भूखंड खाणारा बिल्डरमंत्री सरकारचा लाडका आहे. कागद पत्रांची हेराफेरी करून भूखंड खाण्याचा उद्योग या हेराफेरी सरकारने  सुरू केला आहे.  नागपूर येथील हिट अँड रन प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाईची मागणी करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर आज हल्लाबोल केला. आपल्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. यावेळी त्यांनी सरकार मधील भ्रष्टाचार कागपत्रांची हेराफेरी समोर आणली. अधिक माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, गोर बंजारा समाजासाठी नवी मुंबईतील बेलापूर येथे दीड एकर भूखंड मिळाला होता. हा पाचशे कोटींचा भूखंड स्वत:च्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हडप करण्याचा पराक्रम मंत्री संजय राठोड यांनी केला असून गोरबंजारा समाजाची त्यांनी फसवणूक केली आहे.मंत्री राठोड यांना भूखंड देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकारकक्षा बाहेर जावून मदत केली आहे. मंत्री राठोड यांच्या खासगी सचिवांच्या पत्रावर कारवाई करून हा भूखंड दिला आहे. यासाठी विहित पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. बेकायदेशीर पत्रावर निर्णय घेऊन हा भूखंड दिला आहे.गोरबंजारा समाजाची यामध्ये फसवणूक झाली आहे. भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर मंत्री राठोड भूखंड परत करण्याची भाषा बोलत आहेत. परंतु आता वेळ निघून गेली आहे. त्यांचा इरादा समाजाच्या लक्षात आला आहे. राठोड यांनी मंत्री म्हणून देखील बेकायदेशीर काम केले आहे. २२०० कोटी बजेट असताना ८००० कोटींची टेंडर काढली आहेत. असेही वडेट्टीवार म्हणाले. सरकारमधील बिल्डर मंत्र्याने तर कहरच केला आहे. जैन इंटरनॅशनल आर्गनायझेशन या खासगी शिक्षण संस्थेच्या नावाखाली ७०० कोटींचा कुलाबा महसूल विभागातील भूखंड हडप केला आहे. याची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली आहे. परंतु हा भ्रष्टाचार उघडकीस येईल या भीतीमुळे अजून शासन निर्णय निर्गमित केला नाही. सरकारने अशी चलाखी जरी केली असली तरी हे प्रकरण उजेडात आले आहे.असे वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर येथील हिट अँन्ड रन प्रकरणाची सरकारने चौकशी करून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लाडक्या मुलावर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केली. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात अजितदादा गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. वरळी येथील अशाच प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याने आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला. आता तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आरोपींना पाठिशी घालत आहेत. नंबर प्लेट काढून, सीसीटीव्ही नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.