Author: bittambatami.com

ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई : उकाड्याने हैराण ठाणेकरांसाठी आजची दुपार सुखद ठरली. ठाण्यासह राज्यात ठिकठिकाणी मान्सुनपुर्व पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सून…

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश

मुंबई :  मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी  पत्रकार परिषद घेत आचारसंहिता भंग केल्याच्या भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. भाजप…

मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवाली ग्रामस्थांचाच विरोध

जालना : ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला, ज्या गावातून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला, ज्या गावकऱ्यांच्या ताकदीमुळे मनोज जरांगे यांच्या पाठिशी महाराष्ट्रातील मराठा समाज एकटवला, ज्या गावात मनोज जरांगे यांनी…

सहावर्षानंतर एसटी कर्मचारींना गणवेश

मुंबई : पगाराची अनियमितता. तटपुंजा पगार यावर कसे बसे आपले घर चाविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आता गणवेशापोटी तब्बल सहावर्षानंतर नवेकोरे कापड मिळणार आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप सुरू केले आहे. मुंबईतील विविध आगारांतील चालक, वाहकांसह ९३२…

…तर दाल मे कुछ काला हो सकता है!-वडेट्टीवार 

नागपूर : देशभरात जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप असून तो मतांमधून दिसून आला आहे. मात्र, असे असतानाही जर निकाल विरोधात लागले तर दाल मे कुछ काला हो सकता है, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

काही उमेदवारांच्या ‘निवडीचा’ महायुतीला फटका – महाजन

जळगाव : एक्झिट पोलमध्ये देशात मोदींच्या भाजपाला घवघवीत यश मिळत असले तरी महाराष्ट्रात मात्र भाजपाप्रणित महायुतीला बसलेला फटका हा प्रामुख्याने काही ठिकाणी उमेदवार न बदलल्यामुळेच आहे अशी स्पष्ट कबुली गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात…

आवाज कुणाचा ? आज फैसला !

मुंबई : देशाच्या १८ व्या लोकसभेत आवाज कुणाचा असणार याचा फैसला आज मंगळवारी ४ जूनला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हिएम मशिनची…

निवडणूक संपली; दरवाढ सुरू !

वाचा आणि शांत बसा ! स्वाती घोसाळकर मुंबई : अवघा देश आज लोकसभेच्या मतमोजणीसाठी आकड्यांच्या खेळात दंग असताना इकडे सरकारने हळूच दरवाढीस सुरवात केलीय. मतदान होताच जनतेला पहिला झटका अमुल दूध दरवाढीचा तर…

निवडणूक मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळाची सरमिसळ संपन्न

संजीव कुमार झा, कमलेश कुमार अवस्थी आणि किशन जावळे यांच्या उपस्थितीत अशोक गायकवाड रायगड:रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी उद्या दि.०४ जून रोजी स.८ वाजेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा मतमोजणी निरीक्षक कमलेश कुमार अवस्थी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली. यामध्ये मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक यांचा समावेश होता. नेहुली येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये पार पडलेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा सूचना अधिकारी निलेश लांडगे यांसह विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी असे एकूण १ हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीची रंगीत तालीम संपन्न.आज नेहुली येथील क्रीडा संकुलात मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी यांनी घ्यावयाची दक्षता, कामाकाजाचा प्रोटोकॉल यांसह सर्व आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आणि सराव यावेळी करण्यात आला. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्वजण अतिशय प्रामाणिक पणे कार्यरत आहात. एकूणच जिल्हा प्रशासनाने चांगली तयारी केली असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशप्रमाणे सर्व कार्यवाही करावी असे निवडणूक निरीक्षक संजीव कुमार झा यांनी सांगितले. तसेच सर्वाना शुभेच्छा दिल्या. मोबाईल नेण्यास मनाई मतमोजणी केंद्रात मोबाईलसह प्रतिबंधीत वस्तू आणण्यास मनाई निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

राज्यातील विद्यार्थ्यांना जपानमध्ये ‘ऑन द जॉब’ कौशल्य प्रशिक्षण-कॉन्सल जनरल यागी कोजी

अशोक गायकवाड मुंबई:जपान महाराष्ट्राला २०१७ पासून कौशल्य शिक्षण सहकार्य देत असून जपान सरकारच्या टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांकरिता जपान मध्ये ऑन द जॉब कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येत्या जून महिन्यात जपानला जाणार असल्याची माहिती जपानचे मुंबईतील नवनियुक्त कॉन्सल जनरल यागी कोजी यांनी येथे दिली. गेल्या महिन्यात मुंबईतील वाणिज्यदूतावासाच्या कार्यभार स्वीकारल्यानंतर यागी कोजी यांनी शुक्रवारी (दि. ३१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर देखील उपस्थित होते. जपान – भारत व्यापार संबंधांची सुरुवात १८९३ साली झाली व जपानच्या कंपन्या मुंबईशी कापसाचा व्यापार करीत असे सांगून आज भारत – जपान संबंध अतिशय व्यापक झाले असून दोन्ही देश परस्परांचे नैसर्गिक भागीदार झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जपान भारताला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ‘अटल सेतू’, अंडरग्राऊंड मेट्रो लाईन तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाला आर्थिक सहयोग करीत असून राज्याच्या विकासात जपानचा वाटा असेल असे कोजी योगी यांनी सांगितले. पुणे व ओकायामा मैत्रीचे प्रतीक असलेले पुणे ओकायामा मैत्री उद्यान पुणे येथे तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत व जपान सांस्कृतिक संबंधांचा मोठा इतिहास असून बुद्ध धर्मामुळे जपान व भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. गेल्या दशकात भारत – जपान संबंध वेगळ्या उंचीवर गेले आहेत. जपानच्या लोकसंख्येत वरिष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे तर भारतात युवकांची संख्या जगात मोठी आहे. जपानने कौशल्य विकास व कौशल्य वर्धन या क्षेत्रात विद्यापीठ स्तरावर सहकार्य केल्यास त्याचा उभय देशांना लाभ होईल असे राज्यपालांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सर्वात तेजीने वाढत असून योग्य वेळी व योग्य ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल राज्यपालांनी यागी कोजी यांचे अभिनंदन केले.