Author: bittambatami.com

भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचं इंजिन घेतलं- जयंत पाटील

मुंबई : भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे…

मुख्यमंत्र्यांनीही जोर लावला तरी विजय आमचाच – राजू शेट्टी 

कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. कोल्हापूर हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी कितीही जोर लावला तीर जिंकणार आम्हीच असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. हजारो कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करत राजू शेट्टी…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसात उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा सह अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला…

अन् रोहीत पवारांना अश्रु अनावर झाले

बारामती : पक्ष फुटल्यानंतर टीव्हीवरती बातम्या झळकत होत्या. त्यावेळी टीव्हीसमोर शरद पवार साहेब तसेच आम्ही पाहत होतो. मात्र, त्यांच्या भावना बरंच काही सांगून जात होत्या. मात्र त्यांनी न डगमगता काळजी करू नका, असे सांगितलं होतं. जोपर्यंत लढण्यासाठी नवी…

सलग तिसऱ्या दिवशी नागपूरात भूकंपाचे धक्के

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. महिन्याभरात चौथ्यांदा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागपूर जिल्ह्यातील उमरेड भागात आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात 2.7 रेक्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. काल, 4 एप्रिलला…

‘मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊ आणि मतदानाची टक्केवारी वाढवू’

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन महापालिकेने तयार केलेल्या मॅस्कॉटने दिला मतदानाचा संदेश ठाणे : येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी सकाळी, पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. सोबत, मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कॉट (शुभंकर) ही होता. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांबरे, वृक्ष अधिकारी केदार पाटील कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते. नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

कसाब बिर्याणीबाबत ॲड. निकम यांचा निर्लज्ज खोटेपणा – सुप्रिया श्रीनेत

मुंबईतील सहाही जागांवर मविआ आणि इंडिया आघाडीचाच विजय. मुंबई : ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाती त्यांनीच कबूली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलच्या उड्या मारतोय. एका मुलीला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिलीय. आता कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना निवडून देत मतदार भाजपाला धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य (CWC), सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांची विशेष पत्रकार परिषद मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत माहिती त्यांनी दिलीच पण ४०० ची घोषणा करणाऱ्या भाजपने कॉंग्रेसची सत्ता येतेय हे मान्य केलंय असंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं. मुंबईबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे सागले. एक धादांत खोटं बोलणारा आहे. तर दुसरे उमेदवार पियुष गोयल यांना भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाचा ते अवमान करतात. हे गरीबांच्या विरोधातील लोक आहेत. कोळी माणसाचा वासही सहन न होणाऱ्या गोयल यांना सामान्य माणसं धडा शिकवतील. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनिती उद्धस्त झाली. आता अमेठीत एक सक्रीय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला. मुंबईत इंडिया आघाडीचे सहाही उमेदवार जिंकणारच. देशभरातलं वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होतेय. म्हणूनच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवतायत, असं ठामपणे सांगताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपनेते कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांचाच जप करतायत.

‘आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही’

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेनेच्या गोटात गेल्यामुळे नवी मुंबईत नाराज झालेल्या नाईक समर्थकांनी राजीनामे दिले होते. यावर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्टींकडे पोहोचवण्यासाठी केलेली कृती असल्याचे स्पष्टीकरण नाईक यांनी दिले आहे. तसेच बंड थंडावल्याची चर्चांना उत्तर देताना प्रेमाने दिलेला निरोप अथवा आदेश स्वीकारतो. पण तंबी देणारा जन्मलेला नाही, अशा शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीकरिता माजी खासदार आणि भाजपचे नेते संजीव नाईक यांनी जोरदार तयारी सुरु केली होती. प्रचार आणि पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठीनंतर संजीव नाईक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, असे चित्र तयार झाले होते. दरम्यान, अचानक ही उमेदवारी शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडल्याने राजकारणाला कलाटणी मिळाली. भाजपकडे येणारी उमेदवारी अचानक मित्र पक्षाला मिळाल्याने भाजपच्या ऐरोलीतील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. अनेकांनी नाईकांच्या क्रिस्टल हाऊसवर जाऊन असहकार्याची भूमिका जाहीर करून पदांचे राजीनामेही दिले आहेत. त्यामुळे महायुतीमधील हा बेबनाव उघड होऊ नये, म्हणून नाईक यांचे ठाण्यात नरेश म्हस्के यांच्यासोबत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. त्या चर्चेनंतरच नाईक यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजावण्याची भूमिका जाहीर करावी लागल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. नाराजी दूर करण्याचा पुर्नउच्चार नवी मुंबईत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. आता बरीचशी कमी झाली आहे. आता थोडीफार राहिलेली आहे, ती पण काढून टाकू असेही नाईकांनी स्पष्ट केले. मात्र, आम्ही पक्षाच्या शिस्तीनुसार आम्ही काम करतो. आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो. आपल्याला तंबी देणारा आजपर्यंत जन्मलेला नाही, असा पुनर्उच्चार करत पक्षालाही इशारा दिला आहे.

‘रिक्षावाल्यांच्या मनमानीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बससेवा सुरू करा’

रहिवाश्यांची मागणी मीरारोड – मुंबई अहमदाबाद महार्गावर वाढती गृहसंकुले पाहता मीरारोड रेल्वे स्थानक ते आराध्य हायपार्क  व मीरारोड स्थानक ते ठाणे व्हाया आराध्य हायपार्क अशी बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांनी…

ओला आणि सुका कचरा वेगळा देण्यावर आता ॲपद्वारे लक्ष

२ लाख घरांवर क्युआर कोड लावल्याची मनपाची माहिती मीरारोड – मीरा भाईंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा ह्यासाठी शहरातील ५ हजार पेक्षा जास्त गृहनिर्माण सांस्थाच्या निवासी इमारतीतील…