Category: क्रीडा

नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील उभरत्या खेळाडूंसाठी पहिली मोठी जिल्हास्तरीय लढत

योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील उभरत्या खेळाडूंसाठी पहिली मोठी जिल्हास्तरीय लढत ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित यॉनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग…

 जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात

जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात मुंबई: विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३…

मैदान पेटलं, श्वास रोखले! महाराष्ट्रासह बलाढ्य संघांची दिमाखदार आगेकूच

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान पेटलं, श्वास रोखले! महाराष्ट्रासह बलाढ्य संघांची दिमाखदार आगेकूच काजीपेठ (तेलंगणा): रेल्वे ग्राउंडवर खेळाडू उतरले आणि मैदानावर अक्षरशः आग ओकली गेली! वेग, चपळाई,…

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ दीवच्‍या खेलो इंडिया मैदानात परभणीच्‍या अक्षय कोटलवारांचे कौतुक दीव:  खेलो इंडिया बीच स्‍पर्धा सलग दुसऱ्या वर्षी दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर यशस्‍वी पार पडली. या यशामागे परभणीचा मराठमोळा अक्षय कोटलवारांचे मेहनत दिसून आली. यामुळेच साऱ्या देशभरात कोटलवार यांच्‍या संयोजनाचे कौतुक होत आहे. मूळचे परभणी येथील अक्षय कोटलवार हे सध्या  दीव व दमण शासनामधील युवा क्रीडा अधिकारी आहेत.  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खेलो इंडिया बीच स्‍पर्धेची संकल्‍पना त्‍यांच्‍यासमोर येताच भव्‍य आयोजनात ध्येय पाहिले. आणि ते यशस्‍वी करून दाखवलीही.  कोटलवार हे  राष्ट्रीय टेबलटेनिसचे खेळाडू असून दीव येथे आल्‍यानंतर त्‍यांनी बीच स्‍पर्धेसाठी प्रत्‍यक्ष मैदानात उतरून अनोखे आयोजनाचा अध्याय लिहिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये भारतातील पहिल्या मल्टी-स्पोर्ट्स बीच गेम्ससाठी नोडल अधिकारी म्हणून अक्षय कोटलवार यांनी जबाबदारी यशस्‍वी पेलली. याबाबत बोलताना कोटलवार म्‍हणाले की, पहिल्‍या स्‍पर्धेत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय ठरला.  या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात कार्यक्रमात केल्यामुळे संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला.पहिल्‍सा यशस्वी आयोजनानंतर खेलो इंडिया योजनेअंतर्गत खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली. दुसऱ्या पर्वातही आम्‍ही यशस्‍वी ठरलो. स्‍पर्धा संयोजनाच्‍या प्रवासात नैसर्गिक वाळूवरील खेळ, बदलते हवामान, समुद्रकिनारी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, खेळाडूंची सुरक्षितता आणि लॉजिस्टिक्स यांसारखी अनेक आव्हाने समोर आली. मात्र, टीमवर्क, योग्य नियोजन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे आम्ही ही सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पार केल्‍याचेही सांगून कोटलवार पुढे म्‍हणाले की हा अनुभव केवळ एक प्रशासकीय जबाबदारी नव्हता, तर भारतात बीच स्पोर्ट्सच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. गतवर्षीच्‍या स्‍पर्धेत समरोपाच्‍या आधीच्‍या रात्री भरतीमुळे साऱ्या  मैदानात पाणी भरून आले होते. बीच सॉकरचा अंतिम लढत होणार की नाही असो सवाल उपस्‍थित झाला होता.  तेव्‍हा रात्री २ ते पहाटे ५ पर्यंत उभे राहून पाणी काढण्यासाठी अक्षय कोटलवार यांच्‍या टीमने शर्थीचे प्रयत्‍न करीत नव्‍याने मैदान तयार केले. सॉकर लढत खेळवून स्‍पर्धा यशस्‍वी करून दाखवली होती. यंदाही स्‍पर्धा काळात  महाराष्ट्रसह संपूर्ण देशातून आलेल्‍या खेळाडूंना अक्षय कोटलवार विशेष पाहुणचार देत होते. खेळाडूंची गैरसोय होऊ नये  स्‍वतः  मैदानात उपस्‍थित होते. खेलो इंडिया बीच स्‍पर्धेच्‍या यशानंतर आशियाई बीच स्‍पर्धा दीवमध्ये घेण्यासाठी कोटलवार यांचे प्रयत्‍नशील आहेत.

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६

२ री खेलो इंडिया बीच स्‍पर्धा, दीव २०२६ खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राची पदक अष्टमी, सागरी जलतरणात उपविजेतेपद दीव ः  खेलो इंडिया बीच स्‍पर्धेत महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची लयलटू केली आहे. साताऱ्याच्‍या दीक्षा यादव पदकाचा डबल धमाका केला. दीक्षाच्‍या १ रौप्‍य व १ कांस्य पदकामुळे सागरी जलतरणात महाराष्टाने उपविजेतेपद पटकावले. दीवमधील अरबी समुद्रातील  सागरी जलतरणाचा महाराष्ट्राच्‍या मुलींनी पदकाचा करिश्मा घडविला. साताऱ्याच्‍या दीक्षा यादवे ५ किमी शर्यतीत रौप्‍य तर १० किमी शर्यतीत कांस्य पदक पटकावले. सलग दुसऱ्या वर्षी दीक्षाने दोन्‍ही शर्यतीत पदकाचा पराक्रम केला आहे. या यशामुळे सागरी जलतरणातील महिलांचे  उपविजेतपद महाराष्ट्राने संपादन केले. कर्नाटकला विजेतेपदाची तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा करंडक पथकप्रमुख नवनाथ फरताडे  यांच्‍या हस्‍ते देण्यात आला. दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर  दुसर्‍या खेलो इंडिया बीच स्‍पर्धेचा थरार रंगला.  सागरी जलतरणाच्या जोरावर कर्नाटकाने सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकविला. तामिळनाडूने स्‍पर्धेत दुसरे तर मणिपूरने तिसरे स्थान संपादन केले. या तिन्‍ही संघानी प्रत्‍येकी 3 सुवर्ण, 2 रौप्य पदके जिंकल्‍याने सर्वसाधारण विजेतेपदाचा फैसला कांस्य पदकावर घेण्यात आला. 3 सुवर्ण, 2 रौप्य व 6 कांस्यपदकाची लयलूट करीत कर्नाटकाने  स्‍पर्धेत बाजी मारली. स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ७७ जणांचे पथक सहभागी झाले होते.  या्मध्ये ३१ पुरूष व २८ महिला खेळाडूंचा समावेश होता. स्‍पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण महाराष्ट्राच्‍या खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. महाराष्ट्राने 3 रौप्य,  5 कांस्यपदकांसह 8 पदकांची कमाई केली आहे. बीच पेंचक सिलट स्‍पर्धेत २ रौप्‍य व १ कांस्य पदके महाराष्ट्राच्‍या नावापुढे झळकली. बीच कबड्डी दोन्‍ही संघाना तर बीच सॉकरमध्ये पुरूष संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सर्व पदकविजेत्‍यांचे क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी, उपसंचालक संजय सबनीस यांनी अभिनदंन केले आहे. सर्व पदकविजेत्‍यांचे कौतुक करीत सहसंचालक सुधीर मोरे यांनी सांगितले की खेलो इंडिया बीच स्पर्धा ही खेळाडूंसाठी मोठी पर्वणी ठरली. स्‍पर्धेच्‍या दुसऱ्या पर्वातही महाराष्ट्राची चमकदार कामगिरी केली आहे.

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच

जॉली जिमखाना कॅरम – विश्व् विजेत्यांची आगेकूच विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मुंबई उपनगरच्या विश्व् विजेत्या संदीप दिवेने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढती नंतर मुंबई उपनगरच्या जावेद शेखवर पहिला सेट १९-२० असा गमावल्यानंतर दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे २५-१४ व २५-८ असा जिंकून पाचव्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या सेटमध्ये चौथ्या बोर्डात संदीपने ब्लॅक स्लॅम नोंदवला. दुसरीकडे मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या जाधवचा २५-०, २५-० असा धुव्वा उडवत आगेकूच केली. स्पर्धेच्या चौथ्या फेरी अखेरीस २० व्हाईट स्लॅम व २ ब्लॅक स्लॅमची नोंद करण्यात आली आहे. पुरुष एकेरी चौथ्या फेरीचे निकाल  पुढील प्रमाणे. झैदी अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि अनंत सुर्वे ( मुंबई ) २५-८, २५-६ विकास धारिया ( मुंबई ) वि वि अजगर शेख ( मुंबई उपनगर ) २५-१, २५-१ रवींद्र हांगे ( पुणे ) वि वि मिहीर शेख ( मुंबई ) १९-१३, २५-६ स्वप्नील गोलतकर ( मुंबई ) वि वि जयचंद बेतवंशी ( मुंबई ) २५-१९, २३-१२ संजय मोहिते ( मुंबई ) वि वि  कुणाल राऊत ( मुंबई ) २३-१९, २५-२० महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि हिदायत अन्सारी ( मुंबई ) २०-३, २५-० योगेश परदेशी ( पुणे ) वि वि नरसींग राव सकारी ( मुंबई उपनगर ) २५-१५, २५-४ प्रफुल मोरे ( मुंबई ) वि वि विश्वजीत भावे ( ठाणे ) २५-१०, २५-४ निलांश चिपळूणकर ( मुंबई ) वि वि मंगेश पंडित ( मुंबई उपनगर ) २५-४, २५-१२ संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि अश्रफ खान ( रायगड ) २२-९, २५-७ दिनेश केदार ( मुंबई ) वि वि सुधीर शिंदे ( ठाणे ) २५-०, २१-१० दीपक गनिका ( ठाणे ) वि वि हेमंत पांचाळ ( मुंबई ) ११-२५, १९-१६, १७-१२

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम!

तेलंगणात खो-खोचा रणसंग्राम! ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पहिल्याच दिवशी तेलंगणा, आसाम, मध्यभारत, राजस्थान, हरयाणा व विदर्भाची दमदार विजयी सलामी काझीपेठ, तेलंगणा : रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये आज खेळ, वेग, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त संगम पाहायला मिळाला. भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा खो-खो असोसिएशन आयोजित या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटातील सामन्यांनी चांगलीच रंगत आणली. महिलांमध्ये तेलंगणा व आसाम, तर पुरुषांमध्ये विदर्भ व हरियाणा संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने मात करत आपले वर्चस्व ठसठशीतपणे सिद्ध केले. महिला गट : यजमान तेलंगणाचा जल्लोष : ऑल इंडिया पोलिसवर निर्विवाद विजय यजमान तेलंगणा संघाने महिला गटातील लढतीत ऑल इंडिया पोलिसचा २८–८ असा एक डाव २० गुणांनी सहज पराभव करत गटात पहिला विजय नोंदवला. तेलंगणाकडून अखिला (३.१० मि. संरक्षण व २ गुण) आणि अनुषा के. (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी सलग दमदार कामगिरी नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. तर पोलिस संघाकडून रमणदीप कौर (१.२० मि. संरक्षण, २ गुण) हिने चांगला प्रतिकार केला. महिला गट : आसामची धडाकेबाज सुरुवात : जम्मू-काश्मीरवर एकतर्फी मात महिला गटातील सामन्यात आसामने जम्मू-काश्मीरचा एक डाव २० गुणांनी (२८–८) सहज पराभव केला. आसामकडून रांजणा (३.१० व १.३० मि. संरक्षण, २ गुण) आणि कल्याणी (५.१० मि. संरक्षण) यांनी भक्कम संरक्षण करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली, तर जम्मू-काश्मीरकडून रूची माला (१.२० व १.४० मि. संरक्षण, ४ गुण) हिने झुंजार खेळ केला. मध्यभारतचा झंझावात : बिहारवर मोठ्या फरकाने विजय आणखी एका सामन्यात मध्यभारत संघाने बिहारचा एक डाव ३६ गुणांनी (४०–४) धुव्वा उडवला. मध्यभारतकडून रोहिणी (२.२० व ३.५० मि. संरक्षण, ६ गुण) आणि ईरा भट्ट (४.४० मि. संरक्षण) यांनी अप्रतिम खेळ करत सामन्यावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. पुरुष गट : विदर्भाची गोव्यावर एकतर्फी विजय पुरुष गटात विदर्भ संघाने आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ करत गोव्याचा ३८-४ असा  ३४ गुण व एक डाव राखून धुव्वा उडवला. विदर्भकडून दिलराज सिंग (२.५० मि. संरक्षण व ८ गुण) याने आक्रमणात आघाडी घेतली, तर फैजल खान (३.४० मि. संरक्षण व २ गुण) याने संयमी खेळ करत संघाच्या मोठ्या विजयात भर घातली. तर गोव्याकडून रौश (१ मि. संरक्षण, २ गुण) याने चांगले प्रदर्शन केले. पुरुष गट : हरियाणाची निर्णायक झेप दुसऱ्या पुरुष सामन्यात हरयाणाने हिमाचल प्रदेशचा ३४–२४ असा १० गुणांनी पराभव केला. मध्यंतराला २ गुणांनी पिछाडीवर (१२–१४) असतानाही हरयाणाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करत २२ गुणांची कमाई केली. हरयाणाकडून ध्रुव (१.४२ मि. संरक्षण, १० गुण) आणि गौरव (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी निर्णायक कामगिरी केली, तर हिमाचलकडून शिवम (२ मि. संरक्षण, ६ गुण) आणि ललित (१.२० मि. संरक्षण, ८ गुण) यांनी चांगला खेळ केला. राजस्थानची विजयी घोडदौड : चंदिगडवर मात पुरुष गटात राजस्थानने चंदिगडचा एक डाव ९ गुणांनी (२५–१६) पराभव केला. राजस्थानकडून मनिष (३.१० मि. संरक्षण, २ गुण) आणि हरिष (२.१० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तर चंदिगडसाठी दीपक सिंग (४ गुण) आणि संदीप कुमार (२.२० मि. संरक्षण) यांनी झुंज दिली.

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथील भव्य वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ८ लाखांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. विजेत्याला रोख रुपये १ लाख पन्नास हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार व चषक, चौथ्या क्रमांकासाठी ५० हजार शिवाय उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी प्रत्येकी १० हजार व उपउपांत्यपूर्व फेरी अगोदरच्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूस प्रत्येकी रुपये ५ हजारांचे ईनाम जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस रोख रुपये १ हजारांचे बक्षीस तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस रुपये २ हजार ठेवण्यात आले. आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना विशेष उत्तेजन देण्यासाठी सामना खेळून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १ हजार, तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये २ हजार, चौथ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस ४ हजार, पांचव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रुपये ८ हजार तर सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १५ हजारांचे अतिरिक्त ईनाम जाहिर करण्यात आले आहे. सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वर हे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेली दोन वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून खेळाडूंच्या चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा जरी सर्वांसाठी खुली असली तरीही स्पर्धेत मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भाग घेणाऱ्या राज्यातील इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नावे नोंदविण्यासाठी खेळाडूंनी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन. पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी  चौकजवळ, शिवाजी पार्क, दादर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.

श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ उपांत्यपूर्व फेरीत दाखल.

स्व. उमेश शेणॉय चषक राज्यस्तरीय कुमार कबड्डी स्पर्धा श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ उपांत्यपूर्व फेरीत दाखल. मुंबई : श्री स्वामी समर्थ, सिद्धार्थ मंडळ यांनी अमरहिंद मंडळ आयोजित स्व. उमेश शेणॉय…

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन साताराः भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. शाहू स्टेडियममधील…