Category: होम

भारताकडे २५ दिवसच पुरेल इतका इंधनसाठा!

भारताकडे २५ दिवसच पुरेल इतका इंधनसाठा! नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभुमिवर सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. भारतात सध्या…

पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी

पंतप्रधान मोदींची फोन डिप्लोमसी आखाती देशातील ८ नेत्यांना फोन युद्धजन्य परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता नवी दिल्ली :  इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्ष दिवसागणित अधिक चिघळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखातातील ८ नेत्यांना फोन करून या संघर्षाबाबत चर्चा केली आणि…

इथे मृत्यू ओशाळला…

इथे मृत्यू ओशाळला… इस्त्रालयने इराणमधील मुलींच्या शाळेवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या १५३ विद्यार्थिनींच्या अंत्ययात्रेत हजारोंनी सहभाग घेतला. तेहरान : इराणमधील होर्मोज्गान प्रांतातील मिनाब प्रायमरी स्कूलवर शनिवारी अमेरिका-इस्रायली हवाई व क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला.…

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई

एकनाथ शिंदेंचे मिशन दुबई दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी दोन खाजगी विमान व्यवस्थांची व्यवस्था दुबईच्या फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअर दोन विमानाव्दारे केली व्यवस्था   मुंबई: इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे आखाती देशातील विमानवाहतूकसेवा पुर्णता…

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा

रंगांची उधळण… आठवणींचा ठेवा अन् भयमुक्तीचा चेहरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी नैसर्गिक रंगांसहीत सहकुटुंब धुळीवंदन करीत महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीचे रंग सदैव खुलत राहो अशा शुभेच्छा दिल्या…तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण

माईणकरांच्या ‘कटाक्ष’ लेखसंग्रहाचे ५ मार्च रोजी दिमाखदार लोकार्पण मुंबई : परखड, अभ्यासू आणि थेट भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ राजकीय पत्रकार जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या पहिल्याच लेखसंग्रहाचे लोकार्पण गुरुवार,…

 कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल

कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केडीएमसीने केले गुन्हे दाखल ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून विनायक कॉलनी येथे कारवाई कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत विनायक कॉलनी परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या परिसरात घंटागाडी नियमितपणे जाऊनही काही नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा न करता सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच काही ठिकाणी कचरा साठवून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन याबाबत उपायुक्त रामदास कोकरे कडक भूमिका घेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याशी समन्वय साधून कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या सहकार्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपआयुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड व उदय निकुंभ, स्वच्छता निरीक्षक सचिन सूर्वे, हितेश सोळंकी व अमित भालेराव, मुकादम किशोर जाधव, सानु वर्गीस, साहिल साठे, महेश बनकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एकूण १३ समजपत्रे देण्यात आली तसेच जागेवर एन.सी. नोंदी करण्यात आल्या. गंभीर स्वरूपाच्या उल्लंघनांबाबत भारतीय न्याय संहिता, २०२३ अनुषंगाने २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे. महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक नागरिकाने ओला व सुका कचरा वेगळा करून निश्चित वेळेत घंटागाडीतच देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, जाळणे किंवा साचू देणे हे कायद्याने दंडनीय असून संबंधितांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत अभियान व स्थानिक स्वच्छता नियमांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असूनही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर

कल्याण धावणार डबल डेकर कॉरिडॉरवर खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच…

पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत

पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत ठाणे: राज्यामध्ये दिवाळी मोसमात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटने मार्फत मदत म्हणून मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेने आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करत संघटनेने १ लाख २५ हजार रुपयांचा निधी नैसर्गिक आपत्ती करिता (महापूर) निधी म्हणून सरकाकडे जमा केला आहे.सदर निधीचा धनादेश २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय येथे सहाय्यक संचालक वित्त विभागाचे प्रमुख धनावडे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला आहे.यावेळी मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सचिव निलेश मोरे,सल्लागार ज्ञानेश्वर सांडभोर सदस्य मुकेश उबाळे,प्रवीण गटकुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तांत्रिकऐवजी गैर तांत्रिक कामाचा अतिरिक्त ताण

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर तांत्रिकऐवजी गैर तांत्रिक कामाचा अतिरिक्त ताण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तुच्छतेची वागणूक दिली जात असल्याचा आरोप योगेश चांदेकर पालघरः राज्यातील पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय तांत्रिक कामे करण्यासाठी आवश्यक वेळ न देता त्यांना गैरतांत्रिक कामात गुंतवून ठेवले जाते. त्याचा परिणाम राज्यातील पशुवैद्यकीय सेवेवर होत असून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यक्षमता कमी असल्याचे दाखवून तुच्छतेची वागणूक दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उद्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पशुवैद्यक राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल गडाख व सरचिटणीस डॉक्टर किरण देवकाते,डॉ राहुल संखे, महाराष्ट्र राज्य राजपात्रित पशुवैद्यकीय संघटना पालघर यांनी याबाबत राज्य सरकारला इशारा देणारे निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली असून महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागातील राजपत्रित अधिकारी संघटनेने म्हटले आहे, की पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्या लागतात. पशु आरोग्यसेवा, उपचार, मार्गदर्शन, शिबिरे, लसीकरण, रोग नियंत्रण करण्यासाठी आवश्यक वेळ व संधी दिली जात नाही. त्याऐवजी त्यांच्याकडून वारंवार विविध ऑनलाइन नोंदी ‘एनडीएलएम’ पोर्टल वरील डेटा नोंद अहवाल व कागदपत्रांची पूर्तता यासारखी पूर्णपणे लिपिक वर्गीयाची डेटा एन्ट्री स्वरूपाची कामे करून घेतली जात आहेत. त्याचा परिणाम पशुवैद्यक विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर होत आहे. प्रशासनाची वागणूक अन्यायकारक या परिस्थितीत काम कमी केले, कार्यक्षमता कमी झाली, अशा कारणावरून संबंधित अधिकाऱ्यांना तुच्छतापूर्ण वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. राज्य सरकारची ही वागणूक अन्यायकारक व मनोबल खच्ची करणारी आहे, असे संघटनेने म्हटले आहे. वास्तविक पाहता तांत्रिक काम करण्यासाठी आवश्यक वेळ प्रशासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही. आणि उलट गैरतांत्रिक कामांचा अतिरेक करून घेतला जातो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे. संघटनेचे आक्षेप संघटनेने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनानुसार पशुसंवर्धन विभागाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून केवळ तांत्रिक स्वरूपाचे कामे करून घेण्यात यावीत व अनावश्यक ऑनलाईन लिपिकिय कामाचा भार कमी करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांशी सन्मानपूर्वक न्याय्य वर्तणूक ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय प्रशासनावर संघटनेने अनेक आक्षेप घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यल्प मनुष्यबळावर अनेक गावांचा कारभार, रात्री- अपरात्री तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा, वैयक्तिक मोबाईलवर शासकीय कामांचा ताण, सतत ऑनलाईन अहवाल व अपडेट, विनाकारण दवाखान्याच्या वेळामध्ये बदल, जिओ फेस बायोमेट्रिक उपस्थिती सक्तीची, अधिकारी २४ तास उपलब्ध असावेत अशी अवाजवी अपेक्षा, ‘एफएमडी’, ‘एसओपी’ नुसार काम करून घेणे खात्याची पुनर्रचना होऊनदेखील प्रशासकीय बाबी व मूलभूत सुविधांची वाणवा, तांत्रिक अधिकाऱ्यांना अतांत्रिक कामे करण्यास प्रवृत्त करणे अशा आक्षेपांचा समावेश आहे. पशु वैद्यकीय दवाखान्याची वेळ अडचणीची राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार पशुवैद्यकीय दवाखान्याची वेळ सकाळी आठ ते दुपारी दीड व दुपारी तीन ते सायंकाळी पाच अशी करण्यात आली असून, त्याचबरोबर गाव भेटी, ग्रामसभा उपस्थिती, प्रशिक्षण, साप्ताहिक अहवाल व २४ तास आपत्कालीन सेवा देण्याची जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यासाठी बायोमेट्रिक ऑनलाइन उपस्थिती नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. संघटनेच्या मते कमी मनुष्यबळात या सक्तीच्या अटी लादण्यात आल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर दररोज १२ ते १६ तास अपेक्षा जास्त काळ कामाचा अतिरिक्त ताण येत असल्यामुळे हे अधिकारी मानसिक तणावाखाली आले आहेत. या निर्णयाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यात आपत्कालीन उपचार उशिरा मिळणे, लसीकरण मोहिमा बाधित होणे, कृत्रिम वेतन व गर्भ तपासणी कमी होणे, दूध उत्पादनात घट, रोग नियंत्रणात विलंब, पशुधन मृत्यू वाढण्याची शक्यता, गर्भ तपासणी व शस्त्रक्रियांमध्ये घट आधी बाबींचा समावेश आहे. आंदोलनाचे टप्पे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने शासनाच्या व्हाट्सअपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक मोबाईल व इंटरनेटचा वापर शासकीय कामासाठी करण्याचे बंद केले आहे. बुधवारी राज्यभर काळ्याफिती लावून प्रतिकात्मक निषेध करण्यात येणार आहे, तर गुरुवारी पशुवैद्यकीय अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमून निवेदन देणार आहेत. शुक्रवारी शासकीय अहवाल सादर करणे बंद करणार आहेत, तर नऊ तारखेला विविध मागण्यांसाठी पशुवैद्यकीय संघटना राज्यभर एक दिवशीय साखळी उपोषण करणार आहे. आंदोलनाची ही रुपरेषा संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल गडाख व सरचिटणीस डॉ. किरण देवकाते डॉ राहुल संखे, महाराष्ट्र राज्य राजपात्रित पशुवैद्यकीय संघटना पालघर यांनी दिली.