Category: होम

वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करू लागले आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या महिलांच्या डब्यातून पुरूष प्रवास करू लागले आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित आणि लोकल प्रवासातील गैरसोय टाळण्यासाठी महिलांसाठी काही डबे राखीव ठेवले आहेत. तसेच वातानुकूलित लोकलचे काही डबे राखीव ठेवण्यात आले आहेत. वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडले असल्याने, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येते. महिलांचा डबा जोडून असल्याने त्यात पुरुष प्रवासी ये-जा करीत असतात. महिलांचा डबा हा प्रथम डबा असल्याने अनेक पुरुष प्रवासी त्यातन बसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सामान्य लोकलच्या महिला डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे घुसखोरी करून सामग्रीची विक्री करतात. अनेक वेळा तीन ते चार पुरुष विक्रेते एकत्र येतात. त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण असते. आता वातानुकूलित लोकलच्या डब्यात पुरुष प्रवासी येत असल्याने, यावर अंकुश लावणे आवश्यक आहे. यात रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, आरपीएफ प्रशासन यांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत एका महिलेने व्यक्त केले.

रक्त संकलनाला निवडणूक आचारसंहितेचा फटका

मुंबई : राज्य रक्त संक्रमण परिषदेने उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी फेब्रुवारीपासूनच कंबर कसली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने एप्रिल आणि मेमध्ये पुरेसे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकारण्यांनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनातून हात आखडता घेतला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांसमोर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग रक्तदानासाठी महत्त्वाचा स्राोत आहे. मात्र मार्चमध्ये शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिल आणि मेमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात. अनेक नागरिक गावाला किंवा फिरण्यासाठी बाहेर गावी जातात. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असते. तसेच अनेक रक्तदातेही बाहेरगावी जातात. रक्तदात्यांच्या अभावामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे प्रमाण कमी होते. परिणामी, दरवर्षी एप्रिल – मे या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने फेब्रुवारीपासून नियोजन सुरू केले होते. स्थानक, गृहसंकुलांत संकलन शासकीय रक्तपेढ्यांनी रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये रक्त संकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असला तरी राज्यभरामध्ये दररोज साधारण पाच हजार युनिट रक्ताची आवश्यकता भासते. त्याच वेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक, धार्मिक संस्थांना साद घालण्याची वेळ राज्य रक्त संक्रमण परिषदेवर आली आहे. या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरातून रक्त संकलन केले जाईल. राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे घेतात. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी रक्तदान शिबिरांच्या आयोजनात आखडता हात घेतला आहे.

उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई

ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच ठाणे : वृक्षांवरील विद्युत रोषणाईबाबत मुंबई उच्च् न्यायालयाने फटकारले असतानाही ठाणे, मिरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरूच असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेकडून प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविली जात असताना ठाणे जिल्ह्यामध्ये याकडे डोळे झाक होत असल्याची टीका पर्यावरणवादी कार्यकर्ते करत आहेत. मुंबई, ठाणे आणि महानगर क्षेत्रात सण- उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. परिसर आकर्षित दिसावा म्हणून रस्त्यालगत असलेल्या वृक्षांच्या खोडांवर आणि फाद्यांवरही रोषणाई केली जात आहे. हा प्रकार मागील काही वर्षांपासून वाढू लागला आहे. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. अनेकदा तारांमध्ये बिघाड होऊन वृक्षांना आगी लागतात. वृक्षांवर सूक्ष्म, मोठ्या आकाराचे किटक असतात. त्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो. ठाणे जिल्ह्यात स्थलांतरीत पक्षी येत असतात. या पक्ष्यांना रोषणाईमुळे दिवस आणि रात्रीचा फरक कळत नाही. असे असतानाही ठाणे, नवी मुंबई, मुंबई, मिरा भाईंदर भागात वृक्षांवर विद्युत रोषणाई सुरू होती. याबाबत काही महिन्यांपूर्वी ठाणे स्थित पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहीत जोशी यांनी वकील रोनिता भट्टाचार्य यांच्या मार्फत जनहीत याचिका दाखल केली होती. ही बाब जनहित याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत महापालिकांना फटकारले होते. तसेच राज्य सरकारसह मुंबई, ठाणे, आणि मिरा भाईंदर महापालिकेला नोटीस बजावली होती. उच्च न्यायालयाने नोटीस बजावूनही ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा भाईंदर महापालिका ढिम्म असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील तलावपाली भागात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तलावपाली परिसरात वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्यात दिवाळी, दसरा किंवा सण-उत्सवांच्या कालावधीत तलावपाली, उपवन भागात वृक्षांवर रोषणाईचे प्रकार सुरूच असतो. मिरा भाईंदर येथेही चैत्र नवरात्रौत्सवा निमित्ताने वृक्षांवर रोषणाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काही उपाहारगृह, ढाबे परिसरात व्यवसायिकांनी वृक्षांना प्रकाश रोषणाई करून विद्रुपीकरण केले आहे.

महाराष्ट्रत आणि सर्वत्र उष्णतेचा पारा चढत आहे हवामान खात्याने पुढील दिवसात पारा अजून चढणार असल्याचे वर्तवले आहे. ठाणे शहरात देखील सूर्य आग ओकताना दिसतोय त्यामुळे नागरिक हैराण झाले असून तहानेने जीव व्याकूळ होत आहे म्हणून लोक उन्हातून चालताना डोक्यावर ओढणी कपडा आणि पाणी पिताना दिसत आहे.. फोटो प्रफुल गांगुर्डे

मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती ठाणे : लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ठाणे जिल्हा कोर्ट परिसरात मतदान जनजागृती होर्डिंग्ज लावण्यात आले होते. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असा संदेश स्वीप टीमने सर्व वकिलांना दिला. वकिलांनी आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला व येणाऱ्या अशिलाना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन उपस्थित वकिलांना स्वीप पथकाच्या वतीने करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रम १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नियोजनाखाली आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

मतदानासाठी जनजागृती करण्याचा गृहनिर्माण सोसायट्याच्या अध्यक्ष, सचिवांचा निर्धार

ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सर्व अध्यक्ष व सचिव मतदारदूत’ म्हणून आमची भूमिका बजवणार असून प्रत्येक सोसायटीत १०० टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्नशिल राहून मतदान जनजागृती मध्ये सहभागी होऊ, असा निर्धार ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी केला. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघातर्फे स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा अशा सूचना मतदार नोंदणी अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार व अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन भवन येथे केले होते. कार्यशाळेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम ७९ अन्वये सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना केंद्रस्तरीय स्वयंसेवक घोषित केले असल्याची माहिती अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिव यांना दिली. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे असून सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या माध्यमातून जास्तीतजास्त मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्ष व सचिव यांचे सक्रिय सहकार्य घेऊन मतदानाचा टक्का वाढविणे हे आपले ध्येय आहे. विशेष म्हणजे मतदान टक्केवारी वाढविण्याचे काम करणाऱ्या सोसायटीच्या वार्षिक लेखा अहवालामध्ये या कामाची नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. या कामामध्ये अध्यक्ष व सचिवांनी चांगले सहकार्य करून मतदार टक्का कसा वाढेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. मतदान जनजागृती संबंधित वेगवेगळे उपक्रम राबवून नवीन मतदारांची नोंदणी कशी वाढवता येईल हे पहावे. मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवावे, असे आवाहन अतिरिक्त सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संसारे यांनी केले. या कार्यशाळेत सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांनी विचारलेल्या प्रश्न व शंकाचे त्वरित निरासन करण्यात आले. या कार्यशाळेत स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक व स्वीप पथकामधील सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेला सोसायटी पॅनलचे अध्यक्ष सीताराम राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रत्येक भावात राम

रामनवमी विशेष उर्मिला राजोपाध्येे रामनवमीच्या यंदाच्या उत्सवाला रामजन्मभूमीवर अतिशय देखणे मंदिर उभे राहण्याची आणि रामलल्ला आपल्या मूळ स्थानी विराजमान झाल्याच्या मंगलमय प्रसंगाची पार्श्वभूमी आहे. राम भारताच्या मातीमध्ये सामावलेला आहेच, पण…

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे-काय करू नये याची माहिती

राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनेनुसार उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी…

वाहनांवर नियंत्रण आणायला हवे

विशेष श्याम ठाणेदार साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी जोरदार वाहनांची खरेदी केल्याचे समोर आले आहे. गुढीाडव्याच्या दिवशी ७ हजार ३३६ इंधनावरील वाहने, १३७ इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्याची नोंद…