Category: होम

 राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडवर

 खोपट बस स्थानकाची केली पाहणी   ठाणे : नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला.प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००

पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज !

माथेरान : शाळांना सुटट्या पडायला लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटक सहकुटूंब पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी रायगड जिल्ह्यातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे माथेरान होय आहे.हिवाळ्यात नाताळच्या सुट्टीमध्ये येणार्‍या…

भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार

ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४  रोजी झाला असून,  या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार आहे.  असे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी…

 ठाण्यात सुमधूर गीतांसह `अटल संध्या’

 अटलबिहारी वाजपेयी जयंतीदिनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आयोजन   ठाणे :  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने ठाण्यात २५ डिसेंबर रोजी बुधवारी अटल संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नौपाड्यातील भगवती शाळेच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सुमधूर गीतांच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली अर्पण केली जाईल. या कार्यक्रमात गायिका मधुरा देशपांडे, गायक सर्वेश मिश्रा, प्रीती निमकर-जोशी आणि अनिल वाजपेयी यांची मराठी-हिंदी गीतांची मैफल रसिकांना अनुभवता येईल. समीरा गुजर-जोशी यांच्याकडून निवेदन केले जाईल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. संपर्क : ९३२११९३७७५ रेल्वे स्टेशनबाहेर रक्तदान शिबीर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्याकडून ठाणे रेल्वे स्टेशनजवळ भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात येते. यंदा १९ व्या वर्षीही शिबिराची परंपरा कायम सुरू राहणार आहे. यंदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सॅटीस प्रकल्पालगत २५ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ९ ते दुपारी दोनपर्यंत शिबीर भरविण्यात येणार आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी पवित्र राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन संजय वाघुले यांनी केले आहे. 000000

‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी

– सहा हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून नवी मुंबई : स्वच्छतेमधील नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा निर्धार करीत 6 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई…

गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

डॉ. रवींद्र थत्ते यांचे २५ डिसेंबरला मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै.…

श्री उद्यानगणेश मंदिर चषक शालेय कबड्डी स्पर्धा १० जानेवारीपासून

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समितीतर्फे मुंबई-ठाणे परिसरातील १७ वर्षाखालील इयत्ता १० वी पर्यंत मुले व मुलींच्या शालेय कबड्डी संघांची श्री उद्यानगणेश मंदिर चषक कबड्डी स्पर्धा १० व ११…

पेरियार यांच्या कर्मभूमीत जादूटोणाविरुद्ध कायदा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – ॲड.मुक्ता दाभोलकर

ठाणे : शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर आणि १८ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा संमत झाला.त्यानंतर कर्नाटक, गोवा आणि याच वर्षी ऑगस्ट महिन्यात भाजपाचे शासन असलेल्या गुजरात मध्ये…

२४ डिसेंबर रोजी ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ – रोहन घुगे

अनिल ठाणेकर ठाणे : २४ डिसेंबर रोजी ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ साजरा होणार आहे.पेसा कायद्याशी संबधित घोष वाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. केंद्र शासनाने २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध(अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस “पेसा दिन” म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढवून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गाव/ग्रामपंचायत पातळीवर मेळावा, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावातील संबंधीत घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीतजास्त उपस्थिती रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमधील १०१ महसूल गाव, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ४० ग्रामपंचायतींमधील ७३ महसूल गाव तर शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील ११० ग्रामंपचायतींमधील २३० महसूल गाव असे एकूण ग्रामपंचायत २०५ तर महसूल गाव‌ ४०४ येथे पेसा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समिती भिवंडी,शहापूर व मुरबाड येथील गट विकास अधिकारी,  अधिनस्त विस्तार अधिकारी (पं), तालुका व्यवस्थापक(पेसा), तालुका प्रशिक्षण समन्वयक (पेसा), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसभा मोबिलायझर व ग्रामस्तरीय कर्मचारी  इ. सर्व यंत्रणेला पेसा दिन अंमलबजावणी उत्कृष्टपणे नियोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे.

४२ वर्षाच्या जनसेवेनंतर रविंद्र नागे सेवानिवृत्त

मंत्रालयाच्या उपहारगृहात बजावली सेवा      मुंबई : रविंद्र यशवंत नागे, पर्यवेक्षक हे मंत्रालय उपहारगृहामध्ये सन १९८२ साली वेटर या पदावर रुजू झाले व सन १९८४ पासून विधान भवन उपहारगृहामध्ये कार्यरत आहेत. विधान भवन दुसरा मजला उपहारगृह व वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे  विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री,  उप मुख्यमंत्री,  मंत्री, राज्यमंत्री,  विधानसभा सदस्य,  विधानपरिषद सदस्य, प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती प्रमुख, सर्व समित्या, विधीमंडळ आणि मंत्रालय अधिकारी, परदेशी शिष्टमंडळे, पिठासीन अधिकारी यांच्या बैठका, मंत्रीमंडळांच्या बैठका, मंत्री महोदयांच्या दालनातील बैठका, अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे राज्यातून विधान भवनामध्ये येणारे अभ्यांगत यांच्यासाठी विधान भवन २ रा मजला उपहारगृहातून खाद्यपदार्थ, पेय, आहार, अल्पोपहाराची सेवा पुरविण्यात येते. विधान भवन उपहारगृहातील सर्व कामे सहकारी कर्मचारी यांच्याकडून खेळीमेळीच्या वातावरणात करुन घेण्याची कला रविंद्र नागे यांना चांगल्याप्रकारे अवगत आहे. अधिवेशन कालावधीत कामाचा कितीही ताण असला तरी पूर्णत्वास नेण्याकरीता श्री. रविंद्र नागे नेहमीच परिश्रम घेत असतात. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये चौरस आहारगृहातर्फे हैद्राबाद हाऊस उपहारगृह, विधान भवन उपहारगृह तसेच राजगृह उपहारगृह चालविण्यात येत असतात. सर्व कामांकडे श्री. रविंद्र नागे बारकाईने लक्ष ठेवून असतात, वेळप्रसंगी प्रत्येक उपहारगृहाला भेट देवून खाद्यपदार्थांचा आढावा घेणे तसेच काही मदत लागल्यास आवर्जून ती पूर्ण करणे हीबाब त्यांची अतिशय उल्लेखनीय अशी आहे. दि. ३१ जुलै, २०२५ रोजी श्री. नागे हे शासकीय सेवेतुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजेच हिवाळी अधिवेशन हे त्यांच्या सेवेचे नागपूरचे शेवटचे अधिवेशन आहे. रविंद्र नागे यांच्या देखरेखीखाली पर्यवेक्षक, आचारी व वेटर हे उकृष्टरित्या तयार झाले असून उपहारगृहाचे कामकाज उत्तरित्या सांभाळण्यास सक्षम झालेले आहेत. रविंद्र नागे यांचे सहकारी मणिलाल मोर्बेकर, जनार्दन मोरे, प्रकाश कोळी, गोपाल पुजारी, सहदेव पवार, किसन मराडे हे सुध्दा सन २०२५ मध्ये शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. उपहारगृहाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रविंद्र नागे व त्यांचे सहकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. 00000