मेघना साने यांची हॅटट्रिक
मुंबई : मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी…
मुंबई : मेघना साने यांना ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चा विशेष पुरस्कार त्यांच्या ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकासाठी घोषित झाला आहे. मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक सोहळ्यात हा पुरस्कार त्यांनी…
डोंबिवली : राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानाला आता काही तास उरले आहेत. त्यातच डोंबिवली येथे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते आणि शहरप्रमुखपदाची…
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची…
मुंबई : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) २०१२ जनजागृती सप्ताहाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पोस्को जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ लिमिटेड…
सिंधुदुर्ग : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली च्या (एन.एल.एस.ए.) कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नेमणूक केली असून…
माथेरान : माथेरान मधून सहा अल्पवयीन युवक साजगाव यात्रेसाठी खोपोली येथे गेले होते. यात्रेवरून परत येत असताना महड जवळ उभ्या असलेल्या टेम्पोला यातील एका स्कुटीने जोरदार धडक दिली. यामध्ये माथेरान…
राज भंडारी ठाणे : जीवनातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रसंगी मिळेल ते काम करत जिद्द, चिकाटी यांच्या जोरावर माथाडी कामगारांचे नेतृत्व करीत युवा वर्गाचे नेतृत्व करणारे सद्दाम शेख यांनी वेगळे विश्व निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याची मुंब्रा शहरात मोठी प्रशंसा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून सद्दाम शेख यांची ख्याती असली तरी मुंब्रा परिसरात त्यांनी अनेक योजना अंमलात आणून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्तम वक्तृत्व असलेला हसतमुख चेहरा सदा हसतमुख, उत्तम वक्तृत्व, शिकण्याची वृत्ती, भविष्याची नवी दृष्टी असणारा, क्रिएटिव्ह माईंड आणि कवीमनाचा माणूस म्हणून हे युवा नेतृत्व सध्या चर्चेत आहे, त्यांचा स्वभाव शांत असा आहे. कोणत्याही पाठबळाविना सद्दाम शेख यांनी घेतलेली भरारी नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांनी तरुणांना कष्टाने पुढे जाण्याचा एक मार्गच दाखविला आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, याचे हे जिवंत उदाहरण म्हणजे सद्दाम शेख हे आहेत. स्वतःच्या क्षमतांवर त्यांना मोठा विश्वास आहे. आपल्या साऱ्या यशाचे श्रेय ते आई-वडिलांचे संस्कार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या व्यक्तीची साथ यांनाच असल्याचे ते सांगतात. यावेळी ते सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला राजकारणात मुस्लिमांचा पक्ष असे संबोधले जात असले तरी मी एक मुस्लिम म्हणून एव्हढेच सांगेन, की जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहताना मी ना हिंदू, ना मुस्लिम, ना बौध्द, ना शीख आहे, त्यांच्या शिकवणीनुसार मी एक भारतीय आहे म्हणून आम्ही देशातील, सर्व प्रांतातील नागरिक हे एक भारतीय म्हणून त्यांच्यासोबत राहत आहोत. आज मुंब्रासारख्या भागात अनेक हिंदूंची, मुस्लिम बांधवांनी तसेच अनेक धर्मांच्या स्नेहबांधवांची प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत ती आमच्यासाठी आदरस्थान असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच आहेत. गेले अनेक वर्षे आम्ही याठिकाणी राहतोय तेही सर्व धर्म समभाव या वृत्तीने राहतोय याचे खरे श्रेय हे आम्ही जितेंद्र आव्हाड यांनाच देत असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर मुंब्र्यासारख्या विभागाला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना उघडे पाडण्याचे काम सद्दाम शेख यांच्या माध्यमातून दिसत आहे. ज्या ठिकाणी सर्व धर्म, प्रांत एकत्र नांदत असतात, त्याठिकाणी जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम जरी राजकीय पक्ष करीत असले तरी स्थानिक नेतृत्व करणारे युवा नेता सद्दाम शेख यांच्यासारखे कार्यकर्ते हे कदापी होवू न देता, आपला परिसर सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष देत असतात. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारे दंगलीचे प्रकार घडविले जातात, त्यातच मुंब्रा हा भाग अती संवेदनशील म्हणून मानला जात असला तरी सद्दाम शेख यांच्यासारख्या युवा नेतृत्वाने या महाभयंकर घटना घडू नये, म्हणून “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्था हमारा” चा नारा दिला असल्याचे आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे सद्दाम शेख या युवा नेतृत्वाला सलाम !!! ००००
मुंबई : बटेंगे तो कटेंगे घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजपा युतीकडून फेक नेरेटीव्ह पसरवले जात आहे. धारावीतील एका मंदिरासंदर्भात खोटे सांप्रदायिक…
सरस्वती मंदिरच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मुंबई: सरस्वती मंदिर, माहीम आयोजित आंतरशालेय खो-खो व लंगडी स्पर्धा सरस्वती मंदिर शाळेच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोठ्या उत्साहात सुरु होत आहेत. या स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धा फेडरेशनच्या नियमांनुसार खेळवली जाईल. स्पर्धा विभाग: मुंबई शहरातील शाळांमधील खो-खो व लंगडी या दोन खेळांसाठी ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, लंगडीसाठी अधिकतम ३५ किलो वजन असलेले विद्यार्थीच भाग घेऊ शकतील याची नोंद घावी. या स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशका देणाऱ्या पहिल्या १२ शाळांचाच समावेश केला जाईल. स्पर्धेची तारीख व वेळ: प्रवेशका देण्याची अंतिम तारीख २२ नोव्हेंबर २०२४ आहे. शाळांच्या क्रीडा प्रमुखांनी प्रवेशकाचे फॉर्म सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत द्यावेत. प्रवेशकासोबत शाळेच्या मुख्याध्यापकांचा शक्का व सही असलेली खेळाडूंची यादी संबंधित जमा करावी. यादीमध्ये खेळाडूंचे नाव, जन्मतारीख, इयत्ता ही माहिती शाळेच्या जी-आर नुसार बिनचुक भरावी. सामन्याची वेळ: दररोज सकाळी ८.०० वाजता सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणावर स्पर्धा होतील. संपर्क: अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख श्री. सिरिल सर (९९२२९३३६४७) किंवा श्री. बंडगर सर (९९६९०३३०६२) यांच्याशी संपर्क साधा.