Category: होम

 जिल्ह्यातला पारा घसरला

 बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद   बदलापूर: सोमवार हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासाकांनी केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापुरात १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर शेजारच्या अंबरनाथमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बदलापूर शहरात १०.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. खाजगी हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद नोंदवली. बदलापूर शहराच्या एका बाजूला टाहुलीची डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उल्हास नदी आहे. शहरात मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे शहरात जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होत असते. यंदा सोमवारी आतापर्यंतच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शेजारच्या अंबरनाथ शहरात ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उल्हासनगर शहरात १२.५ अंश सेल्सिअस, कल्याण शहरात १२.८ अंश सेल्सिअस, डोंबिवली शहरात १२ अंश सेल्सिअस तर ठाणे शहरात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

 कल्याणमध्ये पत्रीपूलजवळ जलवाहिनी फुटली

शेकडो लीटर पाण्याची नासाडी   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेची एक जलवाहिनी सोमवारी सकाळी पत्रीपुलाजवळील ९० फुटी रस्त्यावर फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी वाहून गेले. कल्याण पूर्व भागाला या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी बंद केला. जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर साचले होते. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर जलवाहिनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने वाहन चालकांना या भागातून वाहने चालविताना काळजी घ्यावी लागत होती. अनेक वाहन चालकांनी जलवाहिनीजवळ आपली वाहने उभी करून उडणाऱ्या पाण्याद्वारे आपली वाहने धुऊन घेतली. उल्हास नदी पात्रातून उचललेले पाणी बारावे जलशुध्दीकरणात आणले जाते. तेथून हे पाणी जलवााहिनीव्दारे पत्रीपूल भागात रेल्वे मार्गाखालून कल्याण पूर्व भागात पुरवठा केले जाते. ही जलवाहिनी सोमवारी सकाळी ९० फुटी रस्त्यावरील मोहन सृष्टी येथे फुटली. जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी फुकट गेले. परिसरातील जागरूक नागरिकांनी ही माहिती तात्काळ पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर या जलवाहिनीतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. ही जलवाहिनी फुटल्यामुळे कल्याण पूर्वेतील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. नागरिकांनी घरातील उपलब्ध पाणी एक दिवस जपून वापरण्याचे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले होते. दुपारपर्यंत हे काम पूर्ण करून या जलवाहिनीतील पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. या जलवाहिनीच्या परिसरात राहणारे काही रहिवासी जलवाहिनीतून पाण्याचा ओघ कमी झाल्यानंतर भांडी घेऊन पाणी भरण्यासाठी आले होते. जलवाहिनीतील पाण्याच्या अति उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली असण्याचा प्राथमिक अंदाज अधिकारी वर्तवत आहेत. दुरुस्ती करत असताना जलवाहिनी फुटण्याचे खरे कारण समजून येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. कोट ९० फुटी रस्त्यावर पत्रीपुल भागात जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीवरील पाणी पुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन कल्याण पूर्व भागाचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल. अशोक घोडे (कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग) ०००००

माथेरानमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न

माथेरान : नेहमीच्या शाळेच्या अभ्यास क्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर स्कुल, नगरपालिका प्राथमिक शाळा सेंट झेव्हीयर स्कुल आणि अंगणवाडी शाळेतील मुलांना घेऊन वार्षिक स्नेहसंमेलन…

जगातील पहिले सुवर्ण स्वरमंडल पनवेलमध्ये

पनवेल : शास्त्रीय गायनात स्वरमंडल या झंकार वाद्याला एक परंपरा आणि अनन्य साधारण महत्व आहे. शास्त्रीय संगीतातील गायक या वाद्याचा उपयोग करत असतात. असाच एक स्वरमंडल पनवेलमध्ये दाखल झाला आहे,…

 सिंगापूर विद्यापाठीतील विद्यार्थ्यांची नमुंमपा भेट

शाश्वत भविष्याकरिता माहिती व ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी नवी मुंबई : नॅशनल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली आणि भारतातील एका आधुनिक…

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना संरक्षण द्या – नरेश म्हस्के

नवी दिल्ली : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात विरोधात शिवसेनेचे ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत शून्य प्रहरात जोरदार आवाज उठविला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची मागणी खासदार नरेश…

डॉ. रवींद्र थत्ते यांचे गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित व्याख्यान

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने गीता व ज्ञानेश्वरीवर आधारित डॉ. रवींद्र थत्ते यांचे `तत्वज्ञान सोपे आहे’  हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

 पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू

आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने   अनिल ठाणेकर ठाणे : परभणी येथे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली. परभणी येथे एका समाजकंटकांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती. तसेच, तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर सबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली . पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , पीआरपीच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे , प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, सोमनाथ सुर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे. पोलिसी मारहानीमुळेच सोमनाथ दगावला आहे. याची चौकशी करून पोलीस अधीक्षक,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे; पुतळ्यावर दगडफेक करणार्यामागील मास्टर ऑफ माईंडचा शोध घ्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,  असा इशारा दिला. तर, आबासाहेब चासकर यांनी, सोमनाथ  सुर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जर, सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.

ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महालक्ष्मी सरस’ हे एक उत्तम व्यासपीठ – रुचेश जयवंशी

अशोक गायकवाड नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. महालक्ष्मी सरस २०२४ प्रदर्शन व विक्रीचे भव्य उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई याठिकाणी भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात ‘घे भरारी – मला पंख मिळाले’ या कार्यक्रमात सहभागी उमेद अभियानाच्या महिलांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उमेद अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, श्रीमती मंजिरी टकले तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ग्रामीण महिलांच्या व्यवसायाला अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस हे एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे. ग्रामीण महिला उद्योजकांच्या उत्पादनांना चालना मिळावी, त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा आधार मिळावा, यासाठी हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण महिलांना पाठिंबा द्यावा. असे अवाहान ही जयवंशी यांनी केले.या प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये हातमाग, कलाकुसर, हस्तकला, साड्या, कपडे, मसाले, सजावटीच्या वस्तू, तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचा समावेश आहे.तसेच, महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या अस्सल खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी ७० भव्य स्टॉल्सचे फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी आपल्या कौशल्याने साकारलेल्या उत्पादनांचा विशेष ठसा उमटवला आहे. नवी मुंबईतील नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. महालक्ष्मी सरस २०२४ हे प्रदर्शन फक्त विक्रीसाठी नाही तर ग्रामीण संस्कृतीचा आणि कलेचा अनुभव घेण्यासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण वातानुकूलित व्यवस्थेमुळे खरेदीसाठी अतिशय सुखद वातावरण आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील महिलांनी आपल्या उत्पादनांसह सहभाग घेतला आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि ग्रामीण महिलांच्या यशाला प्रोत्साहन द्यावे.

सारे काही आलबेल नाही…!

सोमवारपासून नागुपरात आणखी एका हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते आहे. पण हे नेहमीसारखे मजेचे आणि हुरडा पार्ट्यांचे, जंगल सफारींचे अधिवेशन नाही. हे थोडे गरम वातावरणात होणारे अधिवेशन आहे. त्यामुळेच सध्या जरी नागपुरात…