Category: होम

 वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या!

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश   मुंबई : हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाच्या रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना ‘सदर्न हेमीस्फिअर क्वॉड्रीवॅलेंट २०२४’ (एसएच२४) ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. ही लस चार प्रकारच्या इन्फ्लूएंझापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. भारतात ऑगस्टपर्यंत १५ हजार जणांना इन्फ्लूएंझाची लागण झाली असून, यातील २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. साधारणपणे इन्फ्लूएंझाचा सर्वाधिक त्रास हा ६५ वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ही लस घेण्याची शिफारस केली आहे. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणू वाढत असल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. लस कधी घ्यावी? इन्फ्लूएंझा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी, असेही डब्ल्यूएचओकडून सांगण्यात आले आहे. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस १८०० ते २००० रुपये नागरिकांना मोजावे लागतात.

 बालदिनी क्रिएटीव्ह टच चित्रकला स्पर्धेचे आयोजन

टच संस्थेच्या वतीने राजेंद्र साळसकर मुंबई : ‘टच'(टर्निंग अपॉर्चुनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाईल्ड हेल्प) ही स्वयंसेवी संस्था १९९३- ९४ पासून ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या विकासासाठी महाराष्ट्रभर कार्यरत आहे. दुर्गम, डोंगराळ,…

विधानसभा निवडणुकीत मद्याचा महापूर

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य तस्करी, मद्यसाठ्याविरोधात मोहीम हाती घेतले होते. यामध्ये अवघ्या २३ दिवसांत पाच हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली असून साडेचार…

विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

डोंबिवली : उन्हाळा, पावसाळा असो सण उत्सव असो डोंबिवलीकर आवाज उठवून उठवून शांत झाले पण रस्त्यांवरील खड्डे काही बुजले नाही. मात्र विधानसभा निवडणूका लागताच अनेक रस्त्यांची कामे एमएमआरडीएने हाती घेत…

ठाणे जिल्ह्यातील ५७८ मुले आली शिक्षणाच्या प्रवाहात

ठाणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ठाणे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाते. यंदाही हे सर्वेक्षण पार पडले…

सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

राज भंडारी पनवेल : करंजाडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातून शेकापचे प्रीतम जे एम म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विविध संघटनांचा, पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला. प्रीतम म्हात्रे हे उरणचे आमदार व्हावे ही काळाची गरज आहे. ते तरुण उमेदवार असल्याने आणि उरणचा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन विनोद साबळे यांनी केले.

नजीब मुल्ला हे नक्कीच निवडून येतील – भाऊ कदम

अनिल ठाणेकर ठाणे : अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना उपनेते दशरथ पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला जिल्हाप्रमुख लता पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, गणेश साळवी, गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. लोकांचे विकासकामे होण्यासाठी लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी  महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला निवडून येणे गरजेचे आहे. नजीब मुल्ला यांच्या विरोधात माजी मंत्री असलेले उमेदवार उभे असले आणि सामना अटीतटीचा असला तरी अजितदादांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्यामुळे बहिणींनी मला ओवाळले. या बहिणींचा उत्साह पाहून अजितदादांनी दिलेले उमेदवार नजीब मुल्ला हे नक्कीच निवडणूक येतील अशीआशा मला वाटते असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी काढले.१४९ – मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे (शिवसेना, भाजपा, आरपीआय – आठवले गट, आरपीआय – कवाडे गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, लोकप्रिय उमेदवार नजीब मुल्ला यांची  गुरुवारी प्रभाग क्रमांक २३, शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. या प्रचार रॅलीत प्रसिद्ध अभिनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारकभाऊ कदम यांची विशेष उपस्थिती होती. नजीब मुल्ला यांची प्रचार रॅली शिवसेना मध्यवर्ती शाखा, कळवा नाका येथून सुरु होऊन मनिषा नगर, सह्याद्री सोसायटी, सुदामा सोसायटी, साईबाबा नगर, गीतांजली सोसायटीमार्गे, गावदेवी मंदिर-शंकर मंदिर, आईनगर, घड्याळ चौक , शिवसेना मध्यवर्ती शाखा,कळवा नाका येथे समारोप करण्यात आला.

पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात अत्यंत मार्गदर्शक – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित रायगड-अलिबाग पूर्वपिठिका-२०२४ निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे कौतुक केले.* यावेळी निवडणूक निरीक्षक संतोष कुमार राय, दुनीचंद राणा, सतीश कुमार एस, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, नवी मुंबई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक रविकिरण कोले यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१० नोव्हेंबरची शिक्षक पात्रता परिक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न- डॉ. भरत बास्टेवाड

अशोक गायकवाड अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत रविवारी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ केंद्रांवर परीक्षा पार पडेल. परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी आढावा घेण्यात आला. रायगड जिल्ह्यात शिक्षक पात्रता परिक्षा पनवेल तालुक्यातील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालय, कळंबोली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व नवीन पनवेल येथील चांगु काना ठाकुर विद्यालय या तीन केंद्रांवर पार पडेल. सदर परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देणेत आलेल्या आहेत. परिक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर परिक्षेसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि तेलगू माध्यमाचे परिक्षार्थी प्रविष्ठ होणार आहेत.गुरुवारी पार पडलेल्या आढावा बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :बुधवार, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे मतदान संपन्न होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी, नौका मालकांनी, नौकेच्या तांडेल, नौकेचे खलाशी, ओली व सुकी मासळी विक्री करणाऱ्या महिला-भगिनी, जाळे विणणारे मच्छिमार, हाताने मासे पकडणारे मच्छिमार, गावातील सर्व मत्स्य संवर्धक व जलाशयात मासेमारी करणारे सर्व मच्छिमारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघवारे, सहायक आयुक्त, मस्त्यव्यवसाय संजय पाटील, तहसीलदार सा.प्र. डॉ. शीतल रसाळ आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्याला १२२ किलोमिटरची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा चांगल्या पर्जन्यमानाचा जिल्हा असल्यामुळे येथे गोड्या पाण्याची तळी, तलाव, जलाशय इत्यादी अस्तित्वात आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान करुनच नौका मासेमारीसाठी समुद्रात नेण्यात यावी, त्याचप्रमाणे सागरी मासेमारी सफरीचे नियोजन करावे. मच्छिमारी हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यात ४ हजार ५०० नौका आहेत. यामुळे २५ हजारपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळत आहे. गावातील सागरी मासेमारीसाठी गेलेल्या नौका मतदानाच्या दिवशी बंदरात आणाव्यात जेणेकरुन त्यावरील तांडेल, खलाशी इत्यादींना मतदान करता येईल. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाही बळकट व्हावी, याकरिता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे. 0000