Category: होम

आवक घटल्याने टोमॅटो, मटारच्या दरात वाढ

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो आणि मटारची आवक कमी होत असून दर वधारले आहेत. मागील एक महिन्यापासून टोमॅटो दर आवाक्यात होते परंतु टोमॅटोच्या दराने पुन्हा उसळी…

झिका रुग्णांच्या उपचरासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात ३० बेडचा अद्यावत कक्ष !

मुंबई: पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया अशा साथजन्य आजारांनी राज्यात डोकं वर काढत असताना आता हिवाळ्यात झिका व्हायरस आजाराने भीतीचे वातावरण आहे. मात्र  ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांशी लढण्यासाठी विशेष खबरदारी घेत,  आरोग्य प्रशासनाने ठाणे…

नववर्षात पुणेमुंबई प्रवास सुसाट

 ठाणे खाडी पूल तीनच्या दुसऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण   मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून पुणे – नवी मुंबई, मुंबई प्रवास सुसाट होण्याची शक्यता आहे. ठाणे खाडी पूल ओलांडून मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला येण्यासाठी दोन खाडी पूल सध्या सेवेत दाखल आहेत. ठाणे खाडी पूल १ आणि २ वरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेत ठाणे खाडी पूल – २ वरील वाहनांची संख्या अधिक असून या पुलावरील भार वाढत आहे. या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. तसेच वाहनांना कोंडीत अडकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल ३ चे काम हाती घेतले आहे. १.८३७ किमी लांबीच्या आणि ठाणे खाडी पूल-२ ला समांतर तीन-तीन मार्गिका असलेल्या या खाडी पूल ३ च्या प्रत्यक्ष कामाला २०२० मध्ये सुरुवात झाली. याविषयी एमएसआरडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता दक्षिणेकडील मार्गिकेचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी २०२५ उजाडणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ही मार्गिका सेवेत दाखल करण्यात येईल. असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे-नवी मुंबई, मुंबई प्रवास खाडी पूल ३ वरून करण्यासाठी वाहनचालक-प्रवाशांना फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे विलंब आतापर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम सुरू झाल्याबरोबर आलेले करोना काळ आणि तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला. मागील एक-दीड वर्षांपासून एमएसआरडीसीने कामास वेग देऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेच्या उत्तरेकडील मार्गिकेचे काम पूर्ण केले आणि ही मार्गिका ऑक्टोबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल केली. मुंबई – नवी मुंबई, पुणे प्रवास अतिवेगवान झाला आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडील, पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी मार्गिका केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा वाहनचालक-प्रवाशांना आहे. 0000

स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या !

 ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांचे ठामपा आयुक्त सौरव राव यांना पत्र   ठाणे : स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ठाणे शहरातून रोज लाखो टन कचरा, शहराच्या विविध प्रभागांतून गोळा केला जातो. ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत याचे नियोजन केले जाते. सद्यस्थितीत ठाणे शहरातील स्वच्छतेसंदर्भात, समाधानकारक परिस्थिती असली तरी, ज्या वाहनांतून कचरा गोळा केला जातो किंवा वाहून नेला जातो, त्या वाहनांच्या स्वच्छतेबाबत मात्र, ‘आनंदी-आनंद’ असून, ठामपाच्या कचरा गोळा करणाऱ्या वाहनांची अत्यंत दुरवस्था झालेली पहावयास मिळत आहे. यातील बहुतांश वाहने अस्वच्छ असतात आणि या वाहनांतून कचरा टाकून दिल्यानंतरही, त्यामध्ये कचरा तसाच चिकटलेला दिसून येतो. परिणामी, गाडी कचऱ्याने भरलेली असो वा नसो, अस्वच्छतेमुळे या वाहनांतून कायमस्वरुपी दुर्गंधी येतच असते. याचा विपरीत परिणाम हा, अशा कचरावेचक वाहनांवर कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या आरोग्यावर होत असतो. “कचरा गोळा करणारे कामगार हे, डॉक्टरांप्रमाणेच काम करीत असतात; कारण, ते स्वच्छतारक्षकाच्या भूमिकेतून, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवत असतात!” अशाप्रकारचे विधान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते, याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून, ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या वाहनांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे शहरातील कचरा गोळा करुन, शहर स्वच्छ ठेवणाऱ्यांच्या वाहनांची झालेली दुरवस्था तर, ठामपाचे आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची वाहने टापटीप असणे, हा विरोधाभास ठाण्यासारख्या सुसंस्कृत नगरीला नक्कीच भूषणावह नाही, याची आपण प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी उपहासात्मक टिपणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे. दरम्यान, दिल्लीतील वाढते जीवघेणे प्रदूषण पाहाता, ठाणे महानगरपालिका प्रशासनाने, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा, भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा बोजा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही पंडित यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. ठाणेकर नागरिक हे ‘करदाते’ आहेत, ठाणेकरांच्या पैशातूनच शहरातील सोयी-सुविधा जनतेला पुरविल्या जातात. त्याचप्रमाणे, कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणे हीदेखील एक महत्त्वाची सुविधा असून, अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त वाहने शहरात फिरणे, त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे, हा ठाणेकर करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे लक्षात घेऊन, यापुढे ठाणे शहरातील कचरा गोळा करणाऱ्या आणि तो वाहून नेणाऱ्या वाहनांची स्वच्छता राखणेकामी, महापालिका प्रशासनाला आपण योग्य त्या सूचना देऊन, स्वच्छतारक्षकांच्या आरोग्यासोबतच, सर्वसामान्य ठाणेकर नागरिकांच्याही आरोग्याची प्राधान्याने काळजी घ्यावी, अशी मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ००००

युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी भूषण साळुंखे

पनवेल : दैनिक भास्करचे रायगड जिल्हा प्रतिनिधी भूषण साळुंखे यांची युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार…

ईव्हीएमविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपतींना पाठवली १० हजार पोस्टकार्ड

१- बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची केली विनंती ! ईव्हीएममधील मतदानामध्ये तफावत, मशीनमध्ये छेडछाड, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय – डॉ.जितेंद्र आव्हाड अनिल ठाणेकर ठाणे : ईव्हीएम हटाओ-लोकशाही बचाओ, असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे १० हजार पोस्टकार्ड पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती करण्यात आली आहे. गेल्या काही निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएममधील मतदान यामध्ये तफावत असल्याचीही काही प्रकरणे उघडकीस आली आहेत. ही बाब गंभीर असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विधानमंडळ गटनेते, आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केला. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.  या ठिकाणी कोरे पोस्टकार्ड ठेवून ईव्हीएम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच, नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी स्वाक्षरी मोहिमेसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी मिलिंद साळवी, अपर्णा साळवी, रचना वैद्य, राजेश साटम, राजेश कदम, मिलिंद बनकर, राजु चापले, गजानन चौधरी, जतिन कोठारे, दिलीप नाईक, माधुरी सोनार, कैलास हावळे, ज्योती निंबर्गी, सुनीता मोकाशी, सुनील कुऱ्हाडे , अजित मोरे, आशिष खाडे, शेखर भालेराव, संजीव दत्ता, संदीप ढकोलिया, विक्रम सिंह, मकसुद खान, जग्गत सिंग, प्रदीप साटम आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सामान्य भारतीय नागरिकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशय अधिकाधिक गडद होत असल्याने भावी काळात लोक मतदानापासून दूर जाण्याची शक्यता असल्याने ईव्हीएमवर बंदी आणून जगभरात ज्या पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेतले जात आहे. त्याच पद्धतीने भारतात मतपत्रिकेचा वापर करावा”, अशा आशयाचा मजकूर या पोस्टकार्डवर लिहिण्यात आला होता. ही सर्व पोस्टकार्ड मुख्य डाक कार्यालयातील पत्रपेटीमध्ये डॉ.जितेंद्र आव्हाड यांनीच टाकली. डॉ.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, इव्हीएम हॅक केले असा आमचा आरोप नाही. मात्र, इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली, असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. १७ सी चा फाॅर्म आणि झालेले मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काही तरी घोटाळा आहे. पाच वाजता ५२ % मतदान होते. नंतर ते ६५-६८ % टक्के झाले. ही आकडेवारी कशी वाढली? एकदम १३ % वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चतुर्थांश मतदान अवघ्या तासाभरात होऊ शकते का? ही वाढ कुठून झाली?  यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही. टाकलेली मते आणि मोजलेली मते यामध्ये यामध्ये फरक येतोय. इव्हीएममध्ये जर संगणकप्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी काढण्यासाठी असे कुठले मोठे राॅकेट सायन्स आणावे लागतेय. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळ आहे. त्यामुळेच आता जनआंदोलन सबंध भारतभर उभे राहिल. कारण, जर असेच घडत राहिले तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे. जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले आहे, हे.मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे, असे डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 0000

 देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने भाजपाचा ठाण्यात आनंदोत्सव

 महाराष्ट्राची प्रगती कायम राहील : संजय वाघुले   ठाणे : भाजपाच्या विधीमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्षकार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला. भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकताच, भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विकासात २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे, हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखी आर्थिक बळ मिळेल, असे संजय वाघुले यांनी सांगितले. 00000

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीपर रॅलीचे आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राव्दारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे…

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल…

माथेरान मध्ये दिव्यांग दिन उत्साहात साजरा

माथेरान : माथेरान मध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दिव्यांग दिनानिमित्त माथेरान नगर परिषदेतर्फे  दिनांक बांधवांना आर्थिक सहाय्य वाटप बुधवारी कम्युनिटी सेंटर येथे सायंकाळी ०४-०० वाजता कार्यक्षम मुख्याधिकारी…