सीएनजीच्या दरात वाढीची शक्यता
येत्या काही दिवसांमध्ये सीएनजीचे दर वाढू शकतात. याचे कारण गॅस कंपन्यांना घरगुती कोट्यातील गॅसचा पुरवठा एक महिन्याच्या कालावधीत कमी करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सरकारने आधी 16 ऑक्टोबर रोजी कपात केली…
येत्या काही दिवसांमध्ये सीएनजीचे दर वाढू शकतात. याचे कारण गॅस कंपन्यांना घरगुती कोट्यातील गॅसचा पुरवठा एक महिन्याच्या कालावधीत कमी करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सरकारने आधी 16 ऑक्टोबर रोजी कपात केली…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे हरियाणा निकालाची पुनरावृत्ती आहे, असे प्रारंभी म्हणावे लागेल. सर्व मान्यवरांचे, अभ्यासकांचे तर्क-वितर्क हरियाणामध्येही काँग्रेसचे सरकार येण्याचे चित्र मांडत असताना प्रत्यक्षात भाजपाने बाजी मारली. अगदी त्याचप्रमाणे…
प्रताप सरनाईक हे १ लाख ९ हजार ११६ मताधिक्यांनी विजयी अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयामुळे ओवळा माजिवडा मतदारसंघातील त्यांची लोकप्रियता आणि शिवसेनेचा स्थानिक प्रभाव पुन्हा अधोरेखित झालेला दिसून आला. ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी आपल्या मागील १५ वर्षाचा कार्यकाळात ओवळा माजिवडा मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे त्यांचा जनाधार अधिक बळकट झाला आहे. कॅशलेस हॉस्पिटल, ग्रंथालय, संगीत गुरुकुल, तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र, टोगो वॅन, मेट्रो प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा स्थानिक जनतेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्या आहेत. शिवाय, कोविड-१९ च्या काळात गरजूंना दिलेल्या मदतीमुळे त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढला. यावेळी सरनाईक यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर १ लाख ९ हजार ११६ मतांनी लीड घेत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या प्रचारादरम्यान, त्यांनी मतदारांसमोर विकासकामांबाबतचा अहवाल मांडला आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त केला. विजयानंतर सरनाईक यांनी मतदारांचे आभार मानले आणि सांगितले की, “हा विजय सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे, तसेच यापुढे सुद्धा ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध असणार आहे.” आगामी काळात नवीन रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, ट्रॅफिक समस्या आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर त्यांचा भर राहणार आहे. प्रताप सरनाईक यांचा हा विजय ठाण्यातील राजकारणातील त्यांची ताकद अधोरेखित करणारा आहे. चौथ्यांदा निवडून येणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा आणि जनतेशी असलेल्या दृढ नात्याचा विजय मानला जात आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा दणदणीत माताधिक्य घेऊन विजय झाला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्रात एकूण १३७९११ इतके एकूण मतदान झाले असून,…
मुंबई : महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. २०० हून अधिक जागा महायुतीने जिंकल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मोहीत कंबोज यांनी उचलून घेतलं होतं. तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून…
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मुंबईत बानरवाजीला उत येण्याची शक्यता आहे.…
चेंबूरमध्ये तुकाराम कातेंचा विजयी मुंबई: मतमोजणीत अखेरपर्यंत चुरस असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) तुकाराम काते विजयी झाले आणि त्यांना आव्हान देणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर यांची हेट्रिक हुकली. तुकाराम काते यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्येकर्त्यांनी चेंबूर परिसरात मोठा जल्लोष केला. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये चेंबूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) प्रकाश फातर्पेकर विजयी झाले होते. यावेळी पक्षाने त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिले. त्यांच्यासमोर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) माजी आमदार तुकाराम काते यांना उमेदवारी दिली. यापूर्वी तुकाराम काते अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. चेंबूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. मात्र भाजपचे बळ मिळाल्यामुळे तुकाराम काते यांना मोठी मदत झाली. मतमोजणी दरम्यान काते आणि फातर्पेकर यांच्यात मोठी चुरस सुरू होती. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये तुकाराम काते पिछाडीवर होते. मात्र सातव्या फेरीनंतर काते यांनी आघाडी घेत फातर्पेकर यांना मागे टाकले. अखेर २१ व्या फेरीअंती काते यांचा १० हजार ८२२ मतांनी विजय झाला. काते यांना एकूण ६२ हजार ९९१ मते मिळाली, तर प्रकाश फातर्पेकर यांना ५२ हजार १६९ मते मिळाली. ०००००
मुंबई : मातोश्रीच्या अंगणात अर्थात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील तिरंगी आणि अतितटीच्या लढाईत अखेर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवाराने वरुण सरदेसाई यांनी अखेर बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) झिशान सिद्दिकी…
मालेगाव : मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री दादा भुसे यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय झाला आहे. अपक्ष बंडूकाका बच्छाव यांचा भुसे यांनी १ लाख ६…
मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे. आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील. लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील “लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी” या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे. लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत. शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही. लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे. विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.