Category: होम

सुनिता विल्यम्सचे आरोग्य ढासळतेय…

लक्षवेधी शंतनु चिंचाळकर गेले पाच महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर महिलेचे अलीकडेच प्रसिध्द झालेले फोटो चिंताअ वाढवणारे आहेत. चेहरा आणि शरीरयष्टी पाहता कॅलरीजच्या कमतरतेमुळे एकूणच तिचे…

एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी ए अँड ‘बी’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा

 एमआयजी सीसीला जेतेपद; जठार, जैस्वाल चमकले मुंबई:गौरव जठारचे (55 धावा) दमदार अर्धशतक आणि अंकुश जैस्वालच्या (5/11) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनचा (केएसए) चार विकेट राखून पराभव करताना एमआयजी क्रिकेट क्लबने एमसीए प्रेसिडेंट चषक ए आणि बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावले. बीकेसी येथील एमसीए स्टेडियम खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत रविवारी कर्नाटक एसएने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तरी आघाडी फळीने निराशा केली. मात्र, मधल्या फळीतील ऐश्वर्य सुर्वेने 47, अजिंक्य पाटीलने 31 आणि वैभव माळीने 27 धावांची भर घातल्याने त्यांनी 20 षटकांत 9 बाद 147 धावा केल्या. अंकुशने 11 धावांत निम्मा संघ गारद केला. त्याला हर्ष तन्नाची (2/33) चांगली साथ लाभली. एमआयजी क्रिकेट क्लबने 19.1 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले. गौरवने 55 धावा करताना त्यात मोलाचे योगदान दिले. अथर्व अंकोलेकरने नाबाद 29 आणि ओम केशकामतने 25 धावा काढताना विजयाला हातभार लावला. कर्नाटक एसएकडून भव्य अत्रेने 2 विकेट घेतल्या. संक्षिप्त धावफलक – एमसीए प्रेसिडेंट चषक: कर्नाटक एसए – 20 षटकांत 9 बाद 147 (ऐश्वर्य सुर्वे 47, अजिंक्य पाटील 31, वैभव…

शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेला २४ नोव्हेंबरपासून मुंबईत प्रारंभ

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६३ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी (मुंबई केंद्र १) साहित्य संघ मंदिर, गिरगाव, चर्नीरोड येथे सुरू होत आहे. २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यान हि स्पर्धा होईल. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.   सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

 मुलुंडमध्ये पाच वर्षात होणार पाच मोठे प्रकल्प

 मुलुंडचा चेहरामोहरा बदलण्याचा भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांना विश्वास रेल्वे टर्मिनस, पक्षी उद्यान, केबल कार, क्रिडा पार्क आणि डीपी रोड हे पाच प्रकल्प लवकरच होणार मुंबई : पुढच्या काही वर्षात मुलुंडमध्ये पाच माेठे प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे मुलुंड उपनगराचा पूर्ण कायापालट होईल, असा विश्वास स्थानिक आमदार व भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुतीचे मुलुंड विधानसभा उमेदवार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला. या पाच प्रकल्पांमध्ये रेल्वे टर्मिनस, क्रिडा पार्क, पक्षी उद्यान, तीन डीपी रोड आणि रोपवे (केबल कार) प्रकल्पांचा समावेश आहे. यासदंर्भात माहिती देताना आमदार कोटेचा म्हणाले की, मुलुंडमध्ये तीन डीपी रोड मंजूर झाले आहेत. या नव्या रोडमुळे शहरातील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. मुलुंडमध्ये साडेचार एकरावर पक्षी उद्यान होत असून सिंगापूरच्या धर्तीवर होणाऱ्या या पक्षी उद्यानामुळे मुंबईच्या पर्यटनस्थळात नव्या स्थळाची भर पडणार आहे. सरदार प्रतापसिंह गार्डच्या टेकडीवर केबल कार बनवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुलसी तलावाच्या विहंगम दृश्याचा आनंद घेता येणार आहे. मुलुंडला क्रिडा कॉम्प्लेक्स बनवण्यात येत असून सर्व आऊटडोअर खेळांची सुविधा येथे असणार आहे. कोटेचा पुढे म्हणाले की, स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनसच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलुंडच्या या स्वतंत्र टर्मिनसमुळे मध्य रेल्वेचा ताण कमी होईल. तसेच कच्छ, उत्तर प्रदेश आणि कोकणमध्ये जाणाऱ्यांना मुलुंडमधूनच एक्सप्रेस रेल्वेगाड्या पकडता येणार असल्याचे मिहीर कोटेचा यांनी सांगितले. मुलुंडमध्ये आज बहुसंख्येने मॉल्स आहेत. पण, पुढच्या पाच वर्षाच्या आत सदर पाच प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मुलुंड हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनेल. मुलुंडमधील रहिवाशांना विकएंडला दूर जाण्याची गरज लागणार नाही. येथील वाहतुक कोंडी संपुष्टात येईल. स्थानिक खेळाडूंना येथे सुविधा मिळेल आणि येथील पर्यटनाच्या वाढीला चालना मिळेल, असे आमदार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले. आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपच्या पहिल्या यादीत मुलुंडमधून महायुतीची विधानसभा उमेदवारी जाहीर झाली. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत मिहीर कोटेचा यांनी मुलुंडमधून ५६ टक्के मते मिळवत तब्बल ५७ हजार ३४८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. कोटेचा हे भाजपमध्ये तीन दशके सक्रीय असून ते भाजपचे प्रदेश खजिनदार आहेत. मुलुंडमध्ये होणारे ५ प्रकल्प : १. साडेचार एकर क्षेत्रावर सिंगापूरच्या धर्तीवर पक्षी उद्यान. २. सरदार प्रतापसिंह गार्डन पासून रोपवे. ३. मुलुंड पूर्व येथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स. ४. स्वतंत्र मुलुंड रेल्वे टर्मिनस. ५. तीन नवे डीपी रोड.

रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी

मुंबई :रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला असून हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या ग्राहक महत क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘लश्कर – ए – तैयब’चा विशेष कार्यकारी…

५१,७६,००० रुपये किंमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा मिरारोड येथून जप्त

मिरा भाईन्दर : पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार मध्यवर्ती गुन्हे कक्षाने आर्यन या इसमाला ५०० रुपयाच्या बनावट नोटा घेवून जाताना डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ड व प्रेझेन्ट पार्क रोडकडे जाणारे…

पुण्याचे क्यूईस्ट गौरव देशमुख, आरव संचेती बाद फेरीत

मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा मुंबई : पुण्याच्या गौरव देशमुख आणि  आरव संचेती यांनी लीग सामने जिंकताना मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेत बाद फेरी गाठली. मलबार हिल…

आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सुगम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ या दिवशी होईल. त्यासाठी अर्ज पाठवण्याचा शेवटचा दिवस २८ नोव्हेंबर २०२४ असा आ्रहे. हे अर्ज संस्थेच्या फेसबुक आणि dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईट वर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२४३०४१५०.

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल असून काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला असून या संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अनिल चौगुले यांनी पाठिंब्याचे पत्र मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिले आहे. मुंबई शहरात नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे लाखो रहिवासी आहेत, हा समाज काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे चौगुले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल खासदार वर्षा गायकवाड यांनी नाथपंथी डवरी समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.

काँग्रेस व डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या राजनाथसिंह यांनी माफी मागावी

 डॉ. बाबासाहेबांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून भाजपाकडूनच संविधाननिर्मात्यांचा अपमान – वर्षा गायकवाड मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनता पक्ष व आरएसएस यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वात पवित्र ग्रंथ संविधान दिले त्या संविधानाला भाजपा व आरएसएस मानत नाहीत. मनुवादी प्रवृत्तींनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान रामलीला मैदानावर जाळून संविधान व संविधाननिर्माते बाबासाहेब यांचा अपमान केला आहे, असे प्रत्युत्तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षला खोटे बोलण्याचे प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे ते सातत्याने खोटे व अपप्रचार करणारी माहिती पसरवत असतात. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही तेच केले असून काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केल्याचे सांगत आहेत. राजनाथसिंह यांना माहित असायसा हवे की संविधानाला विरोध त्यांच्या मातृसंस्थेनेच केलेला आहे. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची भाषा भाजपा व आरएसएस खुलेआम करत आहे. ४०० पार चा नारा कशासाठी दिला होता, हे देशाची जनता विसरलेली नाही. भाजपाच्या राज्यात आजही दलित व मागासवर्गीय समाजावर सर्वात जास्त अत्याचार होत आहेत. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच आदर व सन्मान केला आहे. तत्कालीन मुंबई प्रांतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी देऊन निवडून आणले व संविधानाची जबाबदारी दिली. पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कायदा मंत्रीपदाची जबाबदारी दिली. राजनाथसिंह सवयीप्रमाणे खोटे बोलले असून काँग्रेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खोटी व माहिती पसरवल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.