Category: होम

डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा

 मुंबई डबेवाला असोसिएशनची शासन दरबारी याचना मुंबई : करोना काळानंतर मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली असून डबेवाले आर्थिक संकटात सापडले आहेत. झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऑनलाईन ॲपचा फटकाही डबेवाल्यांना बसत आहे. वर्षानुवर्षे मुंबईकरांना कार्यालयात जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या डबेवाल्यांच्या संघटनेने शासनाचा मदतीचा हात मिळावा अशी याचना केली आहे. मुंबई डबेवाला असोसिएशनने डबेवाल्यांसाठी महामंडळ, हक्काची घरे, मेट्रोमध्ये स्वतंत्र मालडब्याची व्यवस्था आदी विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. मुंबईतील डबेवाले विविध समस्यांचा सामना करत पारंपरिक व्यवसाय जपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मदतीची अपेक्षा करत डबेवाल्यांच्या संघटनेने शासनाचे दार ठोठावले आहे. शासन वेगवेगळ्या समाज घटकांसाठी विविध योजना, महामंडळांची घोषणा करत आहे. मात्र, मुंबईच्या डबेवाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे. डबोवाल्यांची सेवा मंदावल्यामुळे घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक डबेवाल्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच, डबेवाल्यांना भक्कम आधार देण्यासाठी शासनाने डबेवाल्यांसाठी महामंडळ तयार करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विविध योजनांमध्ये डबेवाल्यांचा समावेश करावा, त्यांना स्वतंत्र घटक म्हणून ओळख मिळावी. जेणेकरून त्यांना स्वतंत्रपणे योजनांचा लाभ घेता येईल. तसेच, मुंबईत सुरू झालेल्या मेट्रोतून डब्बेवाल्यांना सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. त्यामुळे मेट्रोमध्येही मालडब्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी डबेवाल्यांनी केली आहे. डबेवाल्यांनी मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी गृहनिर्माण प्रकल्पात आरक्षण देण्यात यावे. गिरणी कामगार, माथाडी कामगारांना ज्याप्रमाणे मुंबईत घरे दिली, त्याप्रमाणे डबेवाला कामगाराला मुंबईत घरे द्यावी, यासाठी धोरण आखावे, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनने केली आहे.

कॉ. जे. पी. गावीत यांच्या प्रचारासाठी कळवणमध्ये शरद पवार मैदानात

कळवण : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सात वेळा आमदार राहिलेले कॉम्रेड जे पी गावित यांच्या निवडणूक प्रचारासाठी नुकतीच कळवण विधानसभा मतदारसंघात मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली.  या बैठकीला राजकीय नेते आणि सामान्य जनतेने मोठा प्रतिसाद दिला.या सभेचे प्रमुख वक्ते राष्ट्रवादीचे (शप गट) अध्यक्ष शरद पवार होते. त्यांनी जे पी गावीत यांच्या विजयाचे ठोस आवाहन करत जमावाला संबोधित केले. त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आणि आगामी निवडणुकीत शेतकरी नेते जे.पी.गावित विजयी होणे का गरजेचे आहे हे सांगितले. महाविकास आघाडी सरकार निवडून आल्यास, शेतकऱ्यांचे कल्याण, महिला सुरक्षा, रोजगार हा मुख्य धोरणाच्या अजेंडा असेल,असे शरद पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीतील इतर अनेक प्रमुख नेत्यांनीही सभेला संबोधित केले. सीपीआय(एम) चे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी राज्याची राजकीय व आर्थिक चौकट मजबूत करण्याच्या पक्षाच्या बांधिलकीबद्दल सांगितले. स्थानिक मविआ खासदार भास्कर भगरे, शिवसेना (उबाठा) नेते मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नेते रविबाबा देवरे आणि काँग्रेस नेते शैलेश पवार या सर्वांनी गावित यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीचे ऐक्य आणि राज्यासाठीचे सामायिक धोरण अधोरेखित केले.या मेळाव्यात माकपचे प्रमुख नेते राज्य सचिवमंडळ सदस्य सुनील मालुसरे, सुभाष चौधरी व इतर राज्य समिती सदस्य, मविआ नेते आणि समर्थक उपस्थित होते. या सर्वांनी गावित यांच्यासोबत एकजूट व्यक्त केली. सर्व स्थानिक मतदार आणि प्रादेशिक नेत्यांच्या अतुलनीय पाठिंब्याने, या सभेने निवडणूक प्रचारासाठी जोरदार वातावरण तयार केले. मविआच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील, सुरक्षित आणि समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा स्पष्ट संदेश या सभेने दिला.

कोपरीत शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने

दोन्ही गटाच्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचे वातावरण ठाणे : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील कोपरी येथील अष्टविनायक चौकात दुचाकी रॅलीदरम्यान शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचे चित्र दिसून आले.…

‘प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल’

एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी बदलापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर आपल्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा पालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला तिकीटाला मुकावं लागेल, अशी स्पष्ट कान उघाडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापुरात महायुतीच्या मेळाव्यात केली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी शिंदे बदलापुरात आले होते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दात सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. तुम्ही वामन म्हात्रे यांची कळ काढली असेल तर दुरुस्त करा. तुमच्यातील वाद स्थानिक पातळीवर मिटवा आणि राज्याचा विचार करून महायुतीचा उमेदवार जिंकवा असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना महायुतीतील घटक पक्षांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र मुरबाडमध्ये होते. शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्याविरुद्ध जाहीर आघाडी उघडली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी बदलापुरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना शिंदे यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह वामन म्हात्रे आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कान उघाडणी केली. आपण महायुतीमध्ये काम करत आहोत. असे असताना आपापसातील मतभेद मिटवा. कथोरे आपण म्हात्रे यांची काही कळ काढली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. शिवसेनेच्या तसेच महायुतीतील सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी सोबत काम करा, अशा सूचना शिंदे यांनी यावेळी केल्या. ज्या प्रभागात कथोरे यांना कमी मतं मिळतील, त्या प्रभागातील नगरसेवकाचे पालिका निवडणुकीचे तिकीट कापले जाईल असाही स्पष्ट इशारा यावेळी शिंदे यांनी बोलताना दिला. शिवसेनेच्याच नाही तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवारांचे तिकीटही कापले जाईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच वामन म्हात्रे याच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वक्तव्य करत म्हात्रे यांना अडचणीत आणणाऱ्यांना शिंदे यांनी इशारा दिला. या समेट भाषणानंतर महायुतीचे आणि विशेषतः शिवसेनेचे पदाधिकारी अखेरच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय होतील अशी आशा भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. बेईमानी खपून घेणार नाही तुम्हाला आम्ही मोठे केलं, तुम्हाला सत्ता दिली, तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार दिला असे असताना पण तुम्ही बेइमानी केली. हा एकनाथ शिंदे ही बेइमानी खपवून घेणार नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांचा समाचार घेतला. पवार हे शिवसेनेचे उपजिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली होती.

दिघे साहेबांची प्रतिमा फाडण्याचे धाडस होते कसे ?

 केदार दिघे यांचा सवाल ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे हे निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात काही पत्रके चिटकविण्यात आली होती. या पत्रकांवर आनंद दिघे यांचेसुद्धा छायाचित्र होते. परंतु ही पत्रके फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत. या फाटलेल्या पत्रकांवरून केदार दिघे यांनी संताप व्यक्त केला. दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावलेली होती ती फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचे होते तर माझा फोटो काढायचा होता? निवडणुकीत तुम्हाला दिघे साहेब अडचणीचे ठरू लागले का असा प्रश्न त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून केदार दिघे हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवित आहेत. याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील निवडणूक लढवित आहेत. केदार दिघे यांनी त्यांच्या ‘एक्स’ समाजमाध्यमावरून एक ट्वीट प्रसारित केले आहे. त्यामध्ये त्यांचे पत्रक फाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी एक संदेश देखील त्यामध्ये लिहिला आहे. ‘दिघे साहेबांवरचे प्रेम फक्त चित्रपटापुरतेच का? दिघे साहेबांची प्रतिमा ज्या ठिकाणी लावली आहे. ती प्रतिमा फाडण्याचे धाडस होतेच कसे? जर फाडायचेच होते तर माझा फोटा काढायचा होता. निवडणुकीत तुम्हाला साहेब अडचणीचे ठरू लागलेत का? मिंधे उत्तर द्या.’ असे त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

इथे फक्त डॉ. जितेंद्र आव्हाड यांनाच समर्थन

कौसा येथील सोसायट्यांनी लावले फलक ! अनिल ठाणेकर ठाणे : कौसा येथील निवासी सोसायट्यांनी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ..जितेंद्र आव्हाड यांना आपले समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या सोसायट्यांनी आपल्या आवारात इतर उमेदवारांनी प्रचारासाठी येऊ…

बंडाचे तण माजले जोमाने!

सहा प्रमुख पक्ष, अनेक आघाड्या यामधून महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटलेल्या सगळ्यांना उमेदवारी देणे शक्य नव्हते. त्यातच सहा प्रमुख पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटप करण्याची वेळ आल्याने जागा मर्यादित आणि इच्छुक अमर्यादित असे चित्र तयार…

विद्यार्थ्यांसाठी समाज-माध्यमे घातकच

काहीतरी नवीन… श्याम तारे मुलांच्या हाती मोबाईल देणे हे आता सामान्य झाले असले तरीही त्याचे दुष्परिणाम मुलांवर होतात की नाही यावर सध्या वाद-विवाद सुरु आहेत. काहींच्या मते हे नवे तंत्रज्ञान…

स्वस्त कर्जाची शक्यता मावळली…

ऑक्टोबर 2024 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर सहा टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर भारतीय शेअर बाजारात निराशा आहे तर दुसरीकडे स्वस्त ईएमआयची अपेक्षा मावळली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या सहिष्णुता बँडच्या 6.21…