खऱ्या अर्थाने ‘आयुष्मान’ करायचे तर…
परामर्ष हेमंत देसाई सरकारने अलिकडेच 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्व वृद्धांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेचा लाभ मिळावा,…
परामर्ष हेमंत देसाई सरकारने अलिकडेच 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला. या सर्व वृद्धांना पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विमा कवच योजनेचा लाभ मिळावा,…
हरयाणात जसे जाटांचे प्राबल्य होते तसेच प्राबल्य महाराष्ट्रात मराठ्यांचे आहे. तिथे जाट पंचवीस टक्के आहेत, इथे तीस ते तेहेत्तीस टक्के मराठे आहेत, असे सांगितले जाते. त्यात कुणबी किती व मराठे…
मुंबई : माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषेचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार…
स्वाती घोसाळकर मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी एकला चलो रेचा नारी दिलाय. निवडणूकीत कोणाशीही आघाडी नाही आणि युती करणार नसून येणारी विधानसभा स्वबाळवर लढविणार असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून राज ठाकरेंनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे नेस्कोत आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली. निवडणुकीसाठा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?” “शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?”असा प्रश्नही राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेा विचारला. शरद पवार नास्तिक आहेत “मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.” तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले. ०००००
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, उलवे नोड, खोपोली, कर्जत व वाशिवली / रसायनी या विभागात 40 सर्वसाधारण व 37 वातानुकूलीत अशा एकूण 77 विविध बसमार्गांवर प्रवासी सेवा देण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या “महिला सशक्तीकरण” या अभियानाच्या संकल्पनेतून व महिला सन्मानार्थ नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून महिलांसाठी उपक्रमाच्या बसेसधून प्रवास करतांना तिकीट दरात 50% सवलत देण्याच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक नमुंमपा यांनी मंजूरी दिलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्यानुसार महिलांना नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50% सवलत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात येत आहे. सद्यस्थितीत नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन दोन लाखाहून अधिक प्रवाशी प्रवास करीत असून त्यामध्ये साधारणतः 40% महिला प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या अंदाजित 80,000 महिला प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. तरी महिलांनी या प्रवास सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेले आहे.
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे विधानसभा शाखा क्रमांक १२ च्या विद्यमाने प्रथम ती, जागर स्त्री शक्तीचा! योग नवदुर्गा दर्शनाचा अशा अभिनव सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ शिवसेना सचिव आमदार श्री मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते मागाठाणे बोरिवलीत करण्यात आला. या प्रसंगी उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या सौ संजना घाडी,माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, विधानसभा प्रमख अशोक म्हामुणकर, माजी नगरसेविका सुजाता पाटेकर, संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे, युवा विभाग अधिकारी विजय रांजणे,समन्वयक रोहिणी चोगले, शाखाप्रमुख अशोक परब, अमित मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व मागाठाणे विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे यांनी केले. संयोजन शुभदा शिंदे, सारीका झोरे, सचिन मोरे, शुभदा सावंत, योगेश देसाई, माधुरी खानविलकर यांनी केले. 00000
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई : महाराष्ट्र भर दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमांना दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरवात होत असते. मुंबई जवळील बेलापूरच्या किल्यावर श्री वाघजाई माता सांस्कृतिक क्रिडा मंडळ,प्रभादेवी आणि शिव भक्तांच्या वतीने शिवप्रतिमा,शस्त्र पूजन व शिव मंदिराला दसरातोरण बांधून या कार्याची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही किल्ल्याची झालेली दुरावस्त पाहता किल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असून लवकरच या ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान,शिव प्रारंभ प्रतिष्ठान,मावळे आम्ही स्वराज्याचे,या संस्था व रोहित देशमुख, जयवंत निकम,राज मोरे,अमोल कदम,अजित कारके, किरण भोसले,कुलदीप धुमाळ,सुरज कदम आणि मोठया संख्येने शिव प्रेमी मावळे उपस्थित होते. ००००००००००००००
दहा दिवसांत ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त साठ आरोपींना अटक योगेश चांदेकर पालघरः विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातून होणारी अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ४३ लाख २८ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या दहा दिवसांत ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत सीमावर्ती राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शेजारी जिल्ह्यांतून येणाऱ्या मद्याची वाहतूक, निर्मिती व वाहतूक साठवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय आंतरराज्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज एक लाख वीस हजार सातशे वीस रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे. मद्याचे ७२ बॉक्स संबंधितांकडून ताब्यात घेतले. यांनी केली कारवाई ही कारवाई दादरा नगर हवेलीचे उत्पादन शुल्क निरीक्षक रेहान तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे डहाणू येथील निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, संभाजी फडतरे आदींनी केली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक तारखेपासून दहा दिवसांत उत्पादन शुल्क विभाग भलता सक्रिय झाला असून, अवैध मद्याची वाहतूक, निर्मिती, साठवणूक आदी प्रकरणी या विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दहा दिवसांत या प्रकरणी ७७ गुन्हे दाखल झाले असून ६० जणांना अटक करण्यात आली आहे. सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक काळात जातीने लक्ष उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, कोकण विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, पालघर येथील उत्पादन शुल्क विभागाचे उपाध्यक्ष बी एन भुतकर यांच्या मार्गदर्शकाखाली ही कारवाई करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्य राज्यातून अवैध मद्य, बोगस मद्य मोठ्या प्रमाणात येत असते. विशेषतः दीव-दमणचे मद्य महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात येत असल्याने उत्पादन शुल्क विभाग कारवाईसाठी सज्ज झाला आहे. कोट ‘विधानसभेची निवडणूक, मतदान आणि मतमोजणी या काळात राज्य उत्पादन शुल्क विभाग आंतरराष्ट्रीय कारवाया सुरू ठेवणार आहे. – सुधाकर कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पालघर
रमेश औताडे मुंबई /सर्वोच्च न्यायालयाने अंध विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठ या ठिकाणी त्यांना उपयुक्त असणाऱ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व पॉलिसी केली आहे. मात्र त्याचा विसर शाळा महाविद्यालय व विद्यापीठाला पडला असल्याने अंध विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सरकारने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व संबंधित शिक्षण यंत्रणा विद्यापीठ या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा साठी संबंधित आस्थापना व प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अंध विद्यार्थ्यांनी केली आहे. रेल्वे बस विमानतळ आदी ठिकाणी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत मार्गदर्शक सूचना व मार्गिका यंत्रणा बसवल्या असतात. मात्र अनेक ठिकाणी आर्थिक कारणामुळे त्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात व अपघात होण्याची शक्यता अधिक असते अनेक ठिकाणी अपघातही झालेले आहेत. आर्थिक कारण देत अंध व्यक्तींच्या सोयीसुविधा कडे दुर्लक्ष करणारे सरकार कंत्रांटदाराकडून इतर बिनकामाचा व गरज नसलेला विकास सुरू असताना त्या वेळी कंत्राट दाराला आर्थिक कारण का दिले जात नाही ? असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत. दृष्टी असलेल्या समाजातील अन्यायग्रस्तांनी आंदोलनाचे अस्त्र उपसून आंदोलन सुरू केले आहे. त्यांना सरकार न्याय देऊ शकत नाही. मग आम्ही आंदोलन केले तर आम्हाला सरकार न्याय देईल का ? असा सवाल अंध विद्यार्थी करत आहेत.