Category: होम

बंदुकीची गोळी लागून अभिनेता गोविंदाला जखमी

मुंबई : अभिनेता गोविंदा यांच्याकडून चुकुन गोळी झाडली गेल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया…

पुण्यात साकरलीय ऐतिहासिक शिवसृष्टी

भोपाळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटनांचे साक्षीदार असणाऱ्या पुणे शहरात भव्य दिव्य अशी शिवसृष्टी साकारली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते या २१ एकरवर ऐतिहासिक शिवसृष्टीचे…

गांधी जयंती दिनी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची पदयात्रा

राज्यातील महिला सुरक्षा व सामाजिक शांततेसाठी पदयात्रा.   मुंबई : भाजपा युती सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईसह राज्यात मुली व महिलांवरील अत्यचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली…

आदित्य माहिमकर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये

रमेश औताडे मुंबई : सामाजिक कार्यकर्ते व युवा से युवा फौंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आदित्य अरुण माहिमकर यांनी मंगळवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राजीव…

‘भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार’

लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची घोषणा   परळी: महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील…तसेच भाऊबीजेची…

पत्रकार नितीन चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

मुंबई: ‘महाराष्ट्र टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (५३) यांचे मंगळवारी पहाटे विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.…

आता महायुती, पण २०२९ला भाजपाचे एकला चलो रे!

 अमित शाहंच्या घोषणेने राजकीय भूकंप स्वाती घोसाळकर   मुंबई: महाराष्ट्रात यंदा सरकार येणार ते भाजपाप्रणीत महायुतीचेच, मात्र राज्यात 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची असा २०२९ चा नारा भाजपचे नेते आणि केंद्रीय…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

 माहिती अधिकार कायद्यात सामान्य माणसाला दक्ष नागरिक घडविण्याची ताकद

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त ठामपातर्फे व्याख्यानाचे आयोजन   ठाणे : शासन व प्रशासन पारदर्शक, जबाबदारीने चालावे हा उद्देश माहिती अधिकार या कायद्याचा आहे. हा कायदा लागू होवून 19 वर्षे झाली असून या कायद्यामुळे गैरप्रकार उघड होण्यास मदत होत आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अभ्यासामुळे व वापरामुळे व्यक्तीचे माहितीगार नागरिकांमध्ये रुपांतर होते. स्वाभिमानी, जबाबदार, प्रामाणिक व सार्वजनिक हितासाठी कटिबद्ध असणारा दक्ष नागरिक घडविण्यांची अंगभूत शक्ती माहिती अधिकारामध्ये असल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नमूद केले. 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सोमवारी (30 सप्टेंबर) कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माहिती अधिकार कायदा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी उपस्थित होते. सामान्य माणसाला त्याच्या नागरिक म्हणून असणाऱ्या शक्तीची जाणीव करुन देणारा व सामान्य माणसाला न्याय देणारा हा कायदा आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. यामध्ये एखादे काम, दस्तऐवज, अभिलेख यांची पाहणी करणे, दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे आदींचा समावेश या अधिकारात असल्याचे . सुभाष बसवेकर यांनी सांगितले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासन लोकाभिमुख करण्यासाठी हा कायदा पारित करण्यात आला आहे. मात्र जनमाहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकारी यांनी हा कायदा गंभीरपणे समजून घेतलेला नाही, त्याची लोकाभिमुखता समजून घेतली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा कायदा गंभीरपणे लक्षात घेतला पाहिजे असे . सुभाष बसवेकर यांनी नमूद केले. माहितीचा अधिकाराचा वापर हा गंभीरपणे वापरल्यास पारदर्शक शासन निर्माण होण्यास मदत होईल. एखाद्या नागरिकाने विचारलेली माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात अभिलेख व्यवस्थापन व्यवस्थित करणे गरजेचे आहे, जेणेकरुन कोणत्याही वर्षातील माहिती देणे सोपे होईल असेही . बसवेकर यांनी सांगितले. 000

डेरवलीतील रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन

पनवेल : उरण मतदार संघात आणि पनवेल तालुक्यात येणाऱ्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यापुर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नांतून मंजूर झाले आहे.…