Category: होम

एमजेएससी कॅरम स्पर्धेत रेहान शेख विजेता 

मुंबई : माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित माहीम ज्युवेनाईल चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सी फेस म्युनिसिपल स्कूलचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक फटकेबाज खेळासह…

क्षयरोग नियंत्रणाकरिता नमुंमपा आरोग्य विभागाची व्यापक जनजागृती

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये क्षयरोग आजाराचा प्रसार रोखणेसाठी, मा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाने, आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन केले असता सदर शिबीरांकरीता नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. भेटी दिलेल्या…

 शिवसेना महाविजय संवाद महाराष्ट्र दौऱ्या’ला आजपासून प्रारंभ

युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारने केलेली विकास कामे तसेच विविध लोककल्याणकारी योजना राज्यातील खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवसेना महाविजय संवाद दौऱ्या’चे आयोजन २८ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबतची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी  दिली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सोशल मीडिया राज्यप्रमपुख राहुल कनाल, महिला आघाडी संघटना अध्यक्षा मीना कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून सुरुवात होत आहे. दररोज सहा विधानसभांला भेट देणार आहोत. पहिला टप्पात मुंबईतील विधानसभांना भेट देणार आहोत.  यामध्ये बैठका,मेळावे आणि शाखाभेट आदींचा समावेश असणार आहे, सदर दौरा तीन टप्प्यात होणार आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई, मुंबई उपनगरमधील विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात येणार आहे तर १३ ऑक्टोबर ते  १६ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, २० ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान कोकण विभागात हा दौरा होणार आहे. या दौऱ्यांतर्गंत युवकांशी संवाद साधून युवा संघटन मजबूत करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत ती सर्व कामे लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीच्या वतीने मीना कांबळी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व दौरे करण्यात येतील. लाडकी बहीण संपर्क अभियान दरम्यान गाठीभेटी, मेळावे, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,अन्नपूर्णा योजना याचा आढावा घेण्यात येईल. सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली सोशल मीडिया, वॉररुम आदींचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली. ०००००

जागतिक रेबीज दिनानिमित्त २८ सप्टेंबर रोजी अँटी रेबीज लसीकरण शिबीर-रोहन घुगे

ठाणे : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखान्यात २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा सीमाभागातील नाक्यावर होणार तपासणी – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हा प्रशासनाने आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय आयोजित आंतर जिल्हा बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी कायमस्वरुपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्टची स्थापना करणे आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यानी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असे यावेळी निश्चित करण्यात आले. निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाया वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले.सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. 0000

ठाण्यात नवरात्री पूर्वीच ‘हालो रे’ प्री नवरात्री 24 मध्ये गरबा रंगला

ठाणे : सगळ्याच दांडिया, गरबा प्रेमींनी आता नवरात्रोत्सव चे वेध लागले असतानाच ठाण्यात चार दिवसांपूर्वीच मोठ्या जल्लोषात गरबा रंगला. अवघा एनकेटी कॉलेजचा सभागृह दणाणून गेला होता. कारण होते ठाणेकर असलेला…

पनवेलच्या ऋषिकेश पेणकर यांनी सुवर्ण पदकासह पटकाविला मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब

पनवेल : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला. त्याबद्दल त्यांचे पनवेल महानगरपालिकेचे…

प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीन विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली होत आहे. त्यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुमारे 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विकासकामांचा…

परतीच्या पावसाने महामुंबईला झोडपले

 शहापूर, मुरबाडला वीज कोसळून दोघांचा मृत्यू   ठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. ठाणे शहरात सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तर सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत ३१.७५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेसहापर्यंत ५०.८० मिमी पाऊस पडला. ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूरमध्येही जोरदार पाऊस बरसला. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी चिंतित आहे. शहापूर तालुक्यातील शेद्रुंणजवळ वीज पडून दिनेश जाधव (३०) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुरबाड तालुक्यात चिखले शिरगाव येथील परसू पवार या शेतकऱ्यावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला. झेनिथ धबधब्यात तरुणी गेली वाहून रायगड जिल्ह्यात बुधवारी हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ दिला होता. सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यात खोपोली व पालीत ढगफुटीसारखा पाऊस झाला. खोपोलीत बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे झेनिथ धबधब्यावरून परतणारे सहाजण पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. स्वप्नाली क्षीरसागर (२२) ही नदीमध्ये वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाला वेग होता. क्षीरसागर कुटुंबीय धबधब्यापर्यंत जाऊ शकले नाही; परंतु नदीच्या प्रवाहामध्ये ते अडकले. पाचच्या सुमारास झेनिथ धबधब्यात सहाजण अडकल्याची माहिती मिळताच त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी गेले. त्यांनी आयेशा शेख, मोनिका क्षीरसागरची सुटका केली. धनंजय क्षीरसागर (भाऊ) हा बॅरिकेड्सला धरून स्वप्नालीसोबत  होता; मात्र स्वप्नालीचा हात सुटला आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. नवी मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले नवी मुंबईला बुधवारी दुपारपासून पुन्हा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली, तर सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्याने  ठाणे-बेलापूर रोडवर लोकमत प्रेस बाहेरील मार्गावर पाणी साचले होते. तुर्भे-महापे रोडवरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी या मार्गांवर वाहतूककोंडी झाल्याने तुर्भे ते शीळफाटापर्यंत वाहतूक मंदावली होती. तसेच सायन-पनवेल महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाऊस असाच सुरू झाला तर बाजार समितीच्या आवक-जावक व्यवहारांवर आज, गुरुवारी परिणाम होण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये पावसाचा दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ पालघर जिल्ह्यात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाणगाव रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ बाधित झाली. जिल्ह्यात सरासरी ४९ मिलिमीटर इतका पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस वसई तालुक्यात ८२.६० मिलिमीटर तर सर्वात कमी पाऊस जव्हार तालुक्यात १२ मिलिमीटर इतका पडला आहे. बुधवारी पहाटेपासून जोरदार सुरुवात केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाणगाव स्थानकात रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत उशिराने सुरू होती. त्यामुळे लांब पल्ल्याच्या अप व डाऊन मार्गावरील गाड्यांसह डहाणू-चर्चगेटपर्यंतच्या लोकलही उशिराने धावत होत्या. त्यामुळे हजारो वीज वितरण ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. 0000

आमचे पैसे परत द्या!

वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी   मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यातील एका वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, तर अतिरिक्त रेक उपलब्ध नसल्याने वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसी लोकलच्या सुमारे १० फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसी लोकलचे महागडे तिकीट विकत घेऊनही साधारण लोकलमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यामुळे एसी लोकल जितके दिवशी रद्द केल्या जातील, त्या दिवसांचे पैसे परत करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत. सामान्य लोकलच्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट दर अधिक आहेत. या लोकलच्या वेळेत सामान्य लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी अधिक पैसे मोजून तिकीट अथवा पास घेत आहेत, परंतु त्यांना सामान्य लोकलमधून प्रवासा करावा लागत आहे. प्रवाशांनी एसी लोकलची मागणी केली नव्हती. तरीही एसी लोकल चालवण्यात आली. त्यानंतर या लोकलमध्ये गर्दी वाढू लागली. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांचा प्रवास योग्यरित्या करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. मात्र, थेट लोकल रद्द करण्यात येते. एसी लोकल चालवता येणे शक्य नसल्यास, हार्बर, ट्रान्स हार्बरप्रमाणे मुख्य मार्गावरील एसी लोकल पूर्णत: रद्द कराव्यात, असे मत उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वेळा वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. दररोज प्रवाशांकडून अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, असे असले तरी रेल्वे प्रशासन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करीतच आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारकांना त्यांचे पैसे परत देणे आवश्यक आहे. तसेच वातानुकूलित लोकलचे रेक वाढविणे आवश्यक आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांचे म्हणणे आहे. रद्द मालिका : १३ सप्टेंबर रोजी ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या, १४ सप्टेंबर रोजी ९ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १६ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवरील मुंब्रा – दिवादरम्यान दादर – बदलापूर वातानुकूलित लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तर, वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने २१ सप्टेंबर, २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 00000