मुंबई विभागाचे घवघवीत यश
आंतर शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या…
Maharashtra News
आंतर शालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत मुंबई : बोरीवली (पश्चिम) येथे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या…
पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम…
नवी दिल्ली : गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याच्या स्थायी समितीची बैठक आज संसदभवन, दिल्ली येथे संपन्न झाली. यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय निधीचे योग्य नियोजन करणे, विकासकामांवर देखरेख…
हरिभाऊ लाखे नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत काहीसा बाजूला पडलेला शहरातील खड्ड्यांचा विषय मनसेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. पावसाळा संपुष्टात येऊन एक, दीड महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची दुर्दशा दूर…
शिंदे ठाण्यात, अजित पवार दिल्लीत स्वाती घोसाळकर मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेत एतिहासिक विजय मिळवून १० दिवस उलटल्यानंतरही महायुती अजूनही सत्ता स्थापन करू शकलेले नाही. आधी मुख्यमंत्रीपदावरून आणि आता गृह खात्यावरून महायुतीत कलह…
अकोला : वंचित बहुजन आघाडीनेही आता इव्हीएमविरोधात राज्यभरात एल्गार पुकारला आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात…
सोलापूर: माळशिरसमधील मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आज, सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आले आहेत. असे असले तरी ईव्हिएमचा झोल उघड करण्यासाठी मतदानपत्रिकेवर प्रतिकात्मक मतदान मारकवाडीत घेतले जाणार असल्याचे गावकऱ्यांनी…
पुणे : कॅप्टन साहिल कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली, MG स्पोर्ट्स क्लबने पुणे टुर्नामेंटमध्ये अपूर्व कामगिरी केली आणि उपविजेते म्हणून स्पर्धा संपवली, ज्यामध्ये त्यांच्या चिकाटी आणि कौशल्याचे दर्शन झाले. टुर्नामेंटमध्ये एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू होता शिवम ठोम्बरे, ज्याला सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच्या अत्युत्तम ऑलराऊंड योगदानामुळे तो डोक्यावर ठरला. गोलंदाज म्हणून, शिवमच्या गोलंदाजीचे स्पेल्स महत्त्वपूर्ण क्षणांत निर्णायक ठरले, कारण त्याने सातत्याने ब्रेकथ्रू दिले जेव्हा टीमला त्यांची गरज होती. मैदानावर देखील त्याचे प्रदर्शन उल्लेखनीय होते, एक शानदार कॅच घेतल्याने एका सामन्याचा कल बदलला आणि टीमला मोठा गती मिळवून दिला. शिवमचे दबावाच्या परिस्थितीत बॉल आणि क्षेत्ररक्षणात यशस्वी योगदान MGSC च्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. त्याच्या फलंदाजीतील योगदान देखील महत्त्वाचे होते, कारण त्याने टुर्नामेंटच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये मोलाचे धावा दिल्या. त्याच्या सर्वांगीण कौशल्यामुळे आणि खेळाकडे त्याच्या परिपक्व दृष्टिकोनामुळे तो MG स्पोर्ट्स क्लबसाठी एक अत्यंत प्रभावशाली खेळाडू ठरला आणि त्याला योग्य प्रमाणात मान्यता मिळाली. रौनित सिंग हा दुसरा प्रमुख खेळाडू होता, जो टीमचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून उभा राहिला. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि तणावाच्या परिस्थितीत सामन्याचा भाग्य बदलण्याची क्षमता त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणून सन्मानित करण्यात आली. रौनितने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या, ज्यामुळे MGSC ला फायनलपर्यंत पोहोचायला मदत झाली, आणि त्याची फलंदाजी आणि शांतता त्याला टीमच्या फलंदाजीच्या रचनेतील कणा बनवून ठेवली. माझ खान देखील MGSC च्या फायनलपर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. त्याची स्थिर फलंदाजी, विशेषतः महत्त्वपूर्ण क्षणांत, टीमला आवश्यक ती आधार देत होती, ज्यामुळे टीम महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य मार्गावर राहिली. टीमचे गोलंदाज, ज्यात रामलखन राजभर आणि निशांत पिल्लाई यांचा समावेश आहे, हे देखील महत्त्वपूर्ण होते, कारण त्यांनी महत्त्वाच्या वेळी विकेट्स घेतल्या आणि विरोधकावर दबाव ठेवला. फायनलमध्ये, अनेक खेळाडूंनी, ज्यात विगनेश गवडे, शिवम शर्मा, अर्णव सापकाल, धैर्य अश्तेकर, वेदांत राजिवले, अनिकेत धावले, भाविक सोनी आणि अहमद खान यांचा समावेश आहे, मोठे योगदान दिले. MG स्पोर्ट्स क्लबचा फायनलपर्यंतचा प्रवास त्यांच्या सामूहिक कौशल्य आणि निर्धाराचे प्रतीक होता, आणि त्यांनी टुर्नामेंट गर्वाने आणि भविष्याच्या आशा भरण्यासह संपवला.
अनिल ठाणेकर नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये मीनाताई ठाकरे स्टेडियमवर ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ या दरम्यान महाराष्ट्र राज्यस्तरीय खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत, नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उत्तम माने यांनी ६५+ वर्षावरील गटात सहभागी होऊन १ सुवर्ण पदक व ३ रौप्यपदक संपादन केली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे ८३० खेळाडू सहभागी झाले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. उत्तम माने हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोंदी या गावचे रहिवासी असून ते नवी मुंबईत सानपाडा येथे स्थायिक झाले आहेत. उत्तम माने यांचे सद्या ७० वय असून तरुणांना लाजवेल अशी त्यांनी कामगिरी केली आहे. उत्तम माने यांनी हातोडा फेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे तर भालाफेक मध्ये रौप्यपदक आणि थाळी फेक मध्ये रौप्यपदक तसेच ४ x १०० मीटर रिले स्पर्धेत ही रौप्यपदक जिंकले आहे. नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांचे हस्ते पारितोषिक वितरण व स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडली हरिभाऊ लाखे नाशिक : नियोजनासाठी दरवेळी आव्हानात्मक ठरणारा नाशिकचा सिंहस्थ अवघ्या २२ महिन्यांवर आला असून, जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर दर मंगळवारी नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. एव्हाना सिंहस्थ नियोजनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन होऊन तेथे पूर्णवेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाइल सरकारदरबारी पडून असल्याने नियोजनाला गती येण्यास अवधी लागणार आहे. नाशिकचा सिंहस्थ पावसाळ्यात होत असल्याने त्याचे नियोजन करणे आव्हानात्मक काम असते. साधू-महंतांसह लाखोंच्या संख्येने शाही स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करताना प्रशासनाचा कस लागतो. त्युामुळे १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्याचे किमान दोन ते तीन वर्ष आधी नियोजन सुरू करावे लागते. सन २०१५ नंतर आता सन २०२६-२०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. आता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सिंहस्थाची दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन बैठका झाल्या असून, स्वतंत्र सिंहस्थ कक्ष सुरू होणे आवश्यक आहे. आगामी सिंहस्थात ५० लाख साधू-महंत आणि पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. सर्व विभागांची कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी व जिल्हास्तरावर यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष तातडीने स्थापन करणे आवश्यक आहे. सिंहस्थाचे नियोजन अनेक यंत्रणांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र कक्षाची आवश्यकता आहे. परंतु, या कक्ष स्थापनेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या कक्षात ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक व अन्य कर्मचाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासंदर्भातही जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, तो अद्याप धूळ खात पडला आहे.