Category: महाराष्ट्र

Maharashtra News

राहुल गांधी, प्रियंकाच्या विदर्भात जाहीर सभा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला…

दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पाडा-एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : अशोक गायकवाड काय करायचे आणि काय करायचे नाही, याबाबत सर्वांनी दक्ष रहावे, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीतील दिलेली जबाबदारी एकमेकांच्या समन्वयाने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली. राजापूर येथील आबासाहेब मराठे ऑर्टस ॲण्ड न्यू कॉमर्स, सायन्स कॉलेज मधील इनडोअर स्पोर्ट स्टेडियममध्ये सिंधुदूर्गमधील विधानसभा मतदार संघनिहाय क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी काल आढावा बैठक घेतली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदूर्गचे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सिंधुदूर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे आदी उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कार्य व जबाबदाऱ्या यात विशेषत: मतदान पूर्व आणि मतदान दिवशीची जबाबदारी यांचा समावेश होता. मतदान केंद्रावर योग्य निवडणूक व्यवस्थापन असल्याची सुनिश्चिती, त्याचबरोबर अश्वासित सुविधांची खात्री करणे, रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसे फर्निचर, योग्य प्रकाश व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रसाधनगृहे, मतदान पूर्व संध्येची जबाबदारी आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, मतदारांना ‘व्होटर इन्फॉरमेशन स्लीप’ अर्थात मतदार चिट्टीचे वाटप बिएलओमार्फत पूर्ण करावे. याचे वाटप झाले की नाही, याबाबतही खातरजमा करावी. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी. दिलेले काम समन्वयाने चोखपणे पूर्ण करण्यासाठी निवडणूक विषयक साहित्याचे वाचन करावे.

भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही-एकनाथ शिंदे

यवतमाळ : राजकारणातील समीकरणे सतत बदलत असतात. त्यामुळे अनेकदा काही निर्णय घ्यावे लागतात. मात्र, आपण कोणावर अन्याय होवू देणार नाही आणि भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ येथे…

रत्नागिरी-सिंधुदुर्गवर नारायण राणेंचा दावा

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट दावा करताना निवडणुकीच्या रिंगणात उतण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, याच ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा निवडणुकीच्या…

नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

 “अजूनही वेळ गेलेली नाही, किती जागा पाहिजे ते सांगा” अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकरजी अजून रस्ते बंद झाली नाहीत. मी पुढाकार…

मुलुख मैदानी तोफ, मिनाक्षीताई हरपली – अजयकुमार सिताराम सर्वगोड

कणकवली : अशोक गायकवाड महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेल्या व शेतकरी कामगार पक्षाची मुलुख मैदानी तोफ असणाऱ्या मिनाक्षीताई पाटील यांचे २९ मार्चला दु:खद निधन झाले आहे. हि बातमी ऐकताच माझे मन हेलावुन गेले मला अतीर्व दु:ख झाले. मिनाक्षी ताई पाटील यांचे आणि माझे जिव्हाळयाचे संबंध १९ फेब्रुवारी १९८६ पासुन होते त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. आजही मला तो दिवस आठवतो. रायगड जिल्हयातील पोलादपुर तालुक्यामधील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणारा कुडपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील यांनी लावली होती. सदर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्या या नात्याने मिनाक्षी ताई यांनी कुडपण आणि पोलादपुर तालुक्यासाठी विकासाचे मुद्दे अगदी आक्रमकपणे सभेत मांडत होत्या सदरचे मुद्दे मांडत असताना मी त्यांचा आक्रोश अणि आक्रमकपणा जवळुन पहिला. उपस्थित लोकांच्या अंगावर त्यांची आक्रमक भाषणे ऐकताना शहारे येत होते, अशी माहिती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी दिली. मिनाक्षीताई यांची जिल्हा परिषद मधील कामगिरी अत्यंत उत्तम होती. म्हणुनच काय त्याची पोहचपावती म्हणून त्यानंतर अलिबाग विधान सभेच्या आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या. मिनाक्षीताई या अंत्यंत हुशार आमदार म्हणून त्यांच नाव लैकिक होते. विशेष म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये त्या त्यांची भुमिका अंत्यंत आग्रहीपणाने व आक्रमणपणे मांडत असत. एक धाडसी नेतृत्व एक धाडसी महिला एक धाडसी आमदार म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये सातत्याने नाव लौकिक होत असे रायगड जिल्हयामध्ये जिल्हयाचा विकास होण्याच्या दृष्टिने त्याचे मोलाचे योगदान आहे. मिनाक्षीताई यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली याचे मी परमभाग्य समजतो. मिनाक्षीाताई यांची सुनबाई चित्राताई कुबल- पाटील चित्राताई या मुळच्या वेंगुर्ले जि.सिंधुदुर्गच्या आहेत. मिनाक्षीताई पाटील यांनी आपल्या सुनेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आणले . तसेच चित्राताई पाटील यांना अर्थ व बांधकाम सभापती पद सुध्दा मिळवून दिले त्या एवढयावरच थांबल्या नाहीत तर बांधकाम व अर्थ विभागाचा कारभार गतीमान व पारदर्शक पणे कसा करायचा ,भाषणे कशी करायची अर्थ संकल्पीय भाषण कसे असले पाहिजे जिल्हयांच्या विकासासाठी कोणकोणत्या बाबी अर्थ संकल्पात प्राधान्याने घेतल्या पाहिजेत हे अंत्यंत बारकाईने समजावून सांगत असे चित्राताई पाटील आणि मिनाक्षीताई आम्ही एकत्र जिल्हा दौरे करीत असत चित्राताईला ते नेहमी म्हणत अजयकुमार सर्वगोड हा जुन्या पिढीतील इंजिनिअर आहे. त्याला माझ्या दादानी (स्वर्गीय प्रभाकर पाटील) यांनी नोकरीला लावले आहे. हा फार हुशार आणि प्रामाणिक इंजिनिअर आहे. याला बरोबर घेतल्याशिवाय तू जिल्हा परिषदेचा कारभार करत जाऊ नको असे चित्राताई पाटील यांना नेहमी सांगत असत तसेच मला सुद्धा नेहमी सांगत माझी सुनबाई ही माझी भाग्यलक्ष्मी आहे. अजकुमार तिला बांधकाम व अर्थ याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत जा, असे मला नेहमी सांगत. मी मिनाक्षीताई यांनी दिलेल्या सुचनाचे तंतोतंत पालन केले. चित्राताई पाटील यांना मी आणि जी.एच.पाटील यांनी त्याच्या कामात मदत केली. विशेष म्हणजे बांधकाम व अर्थ विभागात चित्राताई यांची सभापती म्हणून कामगिरी न भुतो न भविष्य अशी झाली याचे सर्व श्रेय मिनाक्षी ताई पाटील यांना जाते.मला मिनाक्षी ताई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे मी परम भाग्य समजतो मिनाक्षीताई यांनी मला मुलासारखे प्रेम दिले मला त्यांनी खूप आधार दिला. मिनाक्षीताईच्या जाण्याने मला अतिशय दु:ख झाले आहे. मिनाक्षीताई यांच्या जाण्याने संबंध रायगड जिल्हयाचे अतोनात नुकसान झाले आहे. ताईची विधानसभेतील आमदार व राज्यमंत्री म्हणून कारकीर्द वाखण्यासारखी आहे. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य आमदार राज्यमंत्री अत्यंत महत्वाची चोख कामगिरी बजावली. त्यांच्या कार्याचा अलौकिक कामाचा ठसा सुध्दा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याने प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. मिनाक्षी ताई यांच्या कार्याला, विचाराला अणि प्रेरणादायी स्मृतीला माझी भावपुर्ण श्रंध्दाजली व आदरांजली, अशा भावना शेवटी अजयकुमार सिताराम सर्वगोड यांनी व्यक्त केल्या.

उदयनराजे भोसलेंचा प्रचार सुरु

सातारा : भाजपाने जरी तिकीट दिले नसले तरी  खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. उदयनराजे भोसले यांनी आज कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांनी संवाद…

बाबासाहेबांप्रमाणे प्रकाश आंबडेकरांनाही काँग्रेस पराभूत करणार-देवेंद्र फडणवीस

अकोला : इतिहासामध्ये काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडून येऊ दिले नाही. त्याचप्रमाणे अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर यांनाही काँग्रेस निवडून येऊ देत नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे…

अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्या-  आनंदराव अडसूळ

मुंबई : अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्ही लढणारच आणि त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवणार असून त्या सह्यांची निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आणि आपली ताकद दाखवणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये केले. ते पुढे म्हणाले विद्यमान खासदार नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र अगदी भोगत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यावर लवकरच जजमेंट येऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेनुसार तेथील जनता नवनीत राणा यांचे ढोंग माजीला कंटाळली असून त्यांना पुन्हा खासदार करणार नाही तसेच त्यांचे हे ढोंग लवकरच बंद होईल. परंतु शिवसेना भाजप युतीने   त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड नाराज आहे. राणा यांचा प्रभावाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघांमध्ये आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात असून आमच्या युनियनचे अनेक सभासद आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जोमाने कामाला लागले आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा आम्हाला सोडावी ती जागा आम्ही नक्कीच जिंकून दाखवू अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. या बैठकीमध्ये को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉइज  युनियनचे सुनिल साळवी, प्रमोद पारटे, जनार्दन मोरे असंख्य र्कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…