Category: महाराष्ट्र

Maharashtra News

‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद

विश्वनाथ स्पोर्ट मीट – २०२६ ‘एमआयटी-एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालय दुसरे, तर एम.ई.एस. गरवारे महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर पुणे: आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मीट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी-एडीटी), विश्वराजबाग, पुणेच्या खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत तब्बल १० सुवर्ण व २४ रौप्यपदकांसह पदकतालिकेत वर्चस्व राखत स्पर्धेचे विजेतेपद कायम ठेवले. एमआयटी-एडीटी विद्यापीठानंतर मुंबईतील बी.के. बिर्ला रात्र महाविद्यालयाच्या संघाने एकूण ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह दुसरा क्रमांक पटकाविला, तर पुण्यातील एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने ५ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह तिसरा क्रमांक मिळविला. एमआयटी-एडीटी विद्यापीठाने गतवर्षीही विजेतेपद पटकाविले होते. भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या प्रचारासाठी क्रीडा भारती व बँक ऑफ इंडिया यांच्या प्रमुख सहयोगाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. तब्बल १५ क्रीडा प्रकारांत, १५०हून अधिक शिक्षण संस्थांमधील ६,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने झालेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमधील आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम), ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे, तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत रोख पारितोषिके, पदके व करंडक प्रदान करण्यात आले. बॅडमिंटन पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात डी.वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा ३–२ असा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. महिला गटात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा २–१ अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदक जिंकले. बुद्धिबळ पुरुष गटात पार्थ बढेकरच्या कामगिरीच्या जोरावर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांतही एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने यजमान संघाचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. बास्केटबॉल पुरुषांच्या अंतिम सामन्यात एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या संघाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा, तर महिलांत एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संघाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरीची नोंद केली. फुटबॉल स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात स्पायसर विद्यापीठाने नेस वाडिया महाविद्यालय, पुणे यांचा ३–२ असा पराभव केला. महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाने एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा ३–१ असा पराभव केला. यामध्ये अंजली कामठे हिला सर्वोत्तम खेळाडू घोषित करण्यात आले. कबड्डी पुरुष गटात भारती विद्यापीठाने एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा, तर महिलांत सरहद महाविद्यालयाने एमआयटी-एडीटी संघाचा पराभव करत सुवर्ण कामगिरी केली. विश्वजीत सरवले व ज्ञानेश्वर खळदकर हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. अत्यंत रोमांचक ठरलेल्या महिला खो-खो अंतिम सामन्यात एम.ई.एस. गरवारे महाविद्यालयाने डी.वाय. पाटील विद्यापीठ, अंबी यांचा, तर पुरुष गटात एमआयटी-एडीटी विद्यापीठाने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, निगडी यांचा पराभव केला. श्वेता नवले व निखिल परांदे हे सर्वोत्तम खेळाडू ठरले. टेनिसच्या दोन्ही गटांत एनडीए, खडकवासला व एमआयटी-एडीटी विद्यापीठाने विजेतेपद पटकाविले, तर व्हॉलीबॉलमध्ये भारती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाने सुवर्ण कामगिरीची नोंद केली. वॉटर पोलो प्रकारात पुरुष गटात मुंबई विद्यापीठ, तर महिलांत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे वर्चस्व राहिले.…

 कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा!

कोश्यारींचा ‘पद्मभूषण’ परत घ्या आणि महाजनांना बडतर्फ करा! नाशिकमध्ये ४ फेब्रुवारीला जनआक्रोश मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक – प्रजासत्ताक दिन सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ चार फेब्रुवारी रोजी शिव-फुले-शाहू आणि आंबेडकरी विचारांच्या नागरिकांच्यावतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी येथील पोलीस कवायत मैदानावरील कार्यक्रमात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता. यावर वनरक्षक माधवी जाधव यांनी जाहीर आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. संविधान निर्माण करणाऱ्यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कसे विसरलात, असा प्रश्न जाधव यांनी करीत महाजन यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनवधानाने नाव राहिल्याबद्दल मंत्री महाजन यांनी दिलगिरीही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, शिव-फुले-शाहू आणि आंबेडकर विचारांच्या…

हा निव्वळ अपघात, राजकारण नको- शरद पवार

हा निव्वळ अपघात, राजकारण नको– शरद पवार बारामती : “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ…

दादा गेले

दादा गेले विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू अपघातात ५ जणांचा मृत्यू ० महाराष्ट्रावर शोककळा बारामती : अवघ्या महाराष्ट्राचे धडाडीचे नेते… लाडक्या बहीणींचा लाडका दादा… महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात…

 भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा  

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते भारतीय तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. यानिमित्ताने मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की भारतीय संविधान देशातील सर्व प्रकारच्या जनतेस जगण्याचे – अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हक्क व अधिकार प्रदान करते. त्यामुळे सर्वांना विकासाची समान संधी देखील प्राप्त होते. याचा लाभ घेत असतांना आपण सर्वांनी आपली कर्तव्ये देखील प्रामाणिकपणे व मेहनतीने पूर्ण केली पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या शिक्षणक्रमांची माहिती देखील दिली. त्यात प्रामुख्याने नवीन कौशल्याधारित व रोजगाराभिमुख, कृषी विज्ञान केंद्राचे व नवीन तंत्रज्ञानावर आधारित असलेले शिक्षणक्रम यांचा समावेश होता. मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली सुरु असलेला महाज्ञानदीप प्रकल्प, वाढवन बंदर साठी कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या हेतूने सुरु झालेले शिक्षण – प्रशिक्षणाचे काम, शेतकरी वर्गास एआय तंत्रज्ञान आधारित दिले जात असलेले शिक्षण, सामाजिक बांधिलकी म्हणून बंदिवान, तृतीयपंथी तसेच नक्षलग्रस्त भागातील युवक युवती यांच्या शिक्षणासाठी विद्यापीठातर्फे सुरु असलेले विशेष उपक्रम यांची देखील त्यांनी माहिती दिली. सन २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करुया असे आवाहन मा. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन,  विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक संयोजक, दैनंदिन वेतन व सुरक्षा कर्मचारी, विद्यार्थी, शेतमजूर आदी उपस्थित होते.

 मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…!

मतदानाअगोदरच बिनविरोध निवडीचा महायुतीचा राणे पॅटर्न…! जिल्हा परिषद आणि ६ पंचायत समिती उमेदवार बिनविरोध ऊबाठा सेनेला धक्का! सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे मतदान होण्यापूर्वीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्याची मुदत असली तरी त्यापूर्वीच ५ जिल्हा परिषद गण आणि ६ पंचायत समिती गटातील महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वात आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मतदार संघात उभाटाच आपले अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या घटनेमुळे पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या उभा ठाक सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडे झालेल्या जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुका भाजप आणि दोन्ही शिवसेना पक्षाने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत अतिशय चुरशीने लढवल्या होत्या. याही निवडणुकीत हेच चित्र पुन्हा पाहायला मिळेल असे वाटत असताना भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना एकत्र आणत जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ तयार केला आणि तो तिन्ही पक्षांच्या गळी उतरवला. हा ‘फॉर्म्युला ‘जाहीर होताच त्यावरून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षात वाद आणि कुरबुरी सुरू झाली आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली. बंडखोरी  थोपवण्याचे काम सुरू असून तिन्ही घटक पक्षांचे नेते दररोज बैठका घेऊन ही बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला उद्यापर्यंत निश्चित यश येईल अशी खात्री नेतेमंडळींना वाटत आहे. एका बाजूला हे काम सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढण्याच्या दृष्टीने महायुतीतील नेते कामाला लागले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात घेण्याचे सत्र महायुतीतील भाजपा आणि शिंदे सेनेने सुरू ठेवले आहे. प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचे आणि निवडणूक एकतर्फी कशी होईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान महायुतीतील बंडखोरी हे शिंदे सेनेपेक्षा भाजपा समोर मोठे आव्हान आहे.जिल्ह्यात राणे म्हणतील ठरवतील ते घडतं ही परंपरा असतांना बंडखोरीनं अचानकपणे डोकं कसं वर काढलं? त्यातही कुडाळ – मालवण तसंच जिल्ह्यात काही ठराविक भागातच बंडखोरी कशी उफाळून आली? त्यांचा बोलविता धनी भाजपामध्ये कोणी आहे का? याचा शोध राणेंच्या गोटात सुरू आहे.खासदार राणे,पालकमंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे तर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत गेले काही दिवस पक्षांतर्गत बंड थोपवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.उद्या या बंडखोरांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही तर ही बंडखोरी कशी मोडून काढायची याचाही ‘फॉर्म्युला ‘ तयार असल्याचे बोलले जात आहे. हे ठरले बिनविरोध जि. प. गट: प्रमोद कामत (बांदा-भाजपा), प्राची इस्वलकर(खारेपाटण-भाजपा), रुहीता तांबे (जानवली,शिंदेसेना), सुयोगी घाडी (पडेल-भाजपा), अवनी तेली (बापर्डे-भाजपा) पंचायत समिती गण: संजय राणे (बिडवाडी), सोनू उर्फ राजेश सावंत (वरवडे), अंकुश ठुकरूल (पडेल),गणेश राणे (ना डण), संजय लाड (बापर्डे), साधना नकाशे (कोकिसरे)–सर्व भाजपा.

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे अनिल ठाणेकर सांगली: सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे. निर्भय आणि निपक्षपाती निवडणुका या लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचे आहेत.लोकशाहीच्या या उत्सावास करणी, जादूटोण्याचे अशा अंधश्रद्धाचा आधार घेतला जात आहे ही निषेधार्य बाब आहे. अशा घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारे आहेत. करणी आणि जादूटोणा किंवा तत्सम अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्या तातडीने कारवाई झाली पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे. नुकताच विटा येथे एका पुढाऱ्यांचा घरासमोर असे अंधश्रद्धेचे, करणी चे प्रकार करणाऱ्यास रंगेहात पकडले, संबंधित व्यक्तीला पोलिसाच्या हवाली केले. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी  अशा प्रवृत्तींना वेळी रोखले पाहिजे, संबंधित जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही असे अनेक करणी, जादूटोणाचे अघोरी प्रकार केल्याचे उघडकीस आले होते,त्या त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून लोकांच्या जनजागृती केली होती. विशेषता उमेदवार किंवा नेत्यांच्या घराजवळ असे प्रकार केले गेले होते. आष्टा, इस्लामपूर,कामेरी आदी ठिकाणी संघटनेने प्रबोधन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले होते. काही दिवसापूर्वी येलूर गावातही  हयात नसलेल्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचे उघडकीस आले होते. असे प्रकार करणाऱ्या मांत्रिक,तांत्रिक,बुवाबाबांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, पोलिसांनी या बाबतील सोमोटो गुन्ह्ये दाखल करावेत. आवश्यकता असेल तिथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मदत करतील गावोगाव जाऊन प्रबोधन करतील. पोलीस खात्याने काही  महिन्यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कक्ष करण्याचा आदेश पारित केला होता मात्र अद्याप सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये असा कक्ष झाल्याचा ऐकिवात नाही. महाराष्ट्राला संत आणि सुधारकांचा बलदंड वारसा आहे. आपल्या संत सुधारकांचा वारसा समजून न घेतल्यामुळे अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याची वेळ आपल्या येत आहे. करणी,जादूटोणा  या बाबी पूर्णपणे भ्रामक आहेत, अवैज्ञानिक आहेत. करणी जादूटोणा किंवा देव घालून कुणाचं चांगलं किंवा वाईट करता येत नाही याची आम्ही खात्री देतो. करणी जादूटोणा किंवा देव घालण्याचे कुणाच्या कडे सामर्थ्य असेल तर त्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान आहे.अशा कोणत्याही  चमत्कारिक गोष्टी सिद्ध करणाऱ्यास समितीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस आहे.आज अखेर ही आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. जादूटोणा किंवा करणी करून कुणाचं बरं वाईट करता येत असते तर  भारताच्या सीमेवरील सैनिकाच्या ऐवजी हे तंत्र मंत्र करणारे लोकच ठेवले असते.निवडून येण्यासाठी उमेदवार काय काय करतात हे आपल्याला ज्ञात आहे, नैतिकतेचा ऱ्हास होताना निवडणुकीत दिसत आहे त्यात अशा अंधश्रद्धांचा आधार ही बाब सुद्धा चिंताजनक आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धाचा आधार घेणे हा ज्ञानाचा विज्ञानाचा माणुसकीचा पराभव आहे. महाराष्ट्राचा सुद्धा निर्मूलन समिती गेली ३६ वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रभावी काम करीत आहे. प्रबोधनाच्या पातळीवर आम्ही नेहमीच सज्ज आहोत,लोकांच्या जागृतीसाठी आम्ही कार्यकर्ते तत्पर आहोत.

अंतराळवीर शुभांशू शुक्लांना अशोक चक्र

  नवी दिल्ली : आतंरराष्ट्रीय अवकाश केंद्राला भेट देणाऱ्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी भारत सरकारकडून अशोक चक्र जाहीर करण्यात आलं आहे. शांतता काळातील हा सर्वोच्च सैन्य सन्मान पुरस्कार…

अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ हरिभाऊ लाखे नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘संवाद’ पत्रिकेच्या वतीने विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘अनोखी कल्पक जाहिरात निर्मिती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि सृजनशीलतेला वाव देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून येत्या दिनांक २३ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येईल. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेसाठी ‘ज्ञानगंगा घरोघरी – यशवाणी कानोकानी’, ‘मुक्त विद्यापीठातील शिक्षण – विकासाचे लक्षण’, ‘प्लास्टिक हटवा – पर्यावरण वाचवा’ व ‘मुक्त विद्यापीठ – ‘संवाद’ पत्रिका’ असे चार विषय आहेत. त्यापैकी एका विषयावर आधारित ए फोर आकारातील जाहिरात ही आकर्षक मजकूर, लक्षवेधी चित्र आणि विषयाला सुसंगत घोषवाक्यासह असावी. तसेच स्पर्धकांनी ही जाहिरात बहुरंगी भित्तीपत्रक (पोस्टर) स्वरूपात तयार करून पीडीएफ, जेपीईजी किंवा पीएनजी स्वरूपात paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac या मेल आयडीवर पाठवावी. सोबत स्पर्धकाने आपले पूर्ण नाव, शिक्षणक्रमाचे नाव, अभ्यासकेंद्राचे नाव, केंद्र संकेतांक आणि कायम नोंदणी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण ठरणाऱ्या प्रथम पाच जाहिरातींना विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ग्रंथ देऊन गौरविण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन विद्यापीठ पत्रिका ‘संवाद’चे कार्यकारी संपादक प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व माता-पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

स्वामी विवेकानंद सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व माता-पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन हरिभाऊ लाखे  नाशिक : नाशिक येथील इंदिरानगर विभागातील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित पूर्व-प्राथमिक विद्यालयात संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व माता-पालकांसाठी विविध स्पर्धांचे…