Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 सुनेत्रा पवार प्रकरणावर नाशिकमध्ये राजकीय रणकंदन

 काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा हरिभाऊ लाखे नाशिक: राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा उल्लेख समाजमाध्यमांवरील एका चित्रफितीत ‘गुंगी गुडिया’ असा करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर आंदोलकांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या राजकीय घडामोडींमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत आपला मोर्चा महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस पक्ष कार्यालयाकडे वळवला. आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. या आंदोलनात आमदार सरोज अहिरे, जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, भगूर नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, दिलीप खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा एम. जी. रोडवरून पुढे सरकत असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार सरोज अहिरे म्हणाल्या, काँग्रेसने ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याविषयी अपशब्द वापरले, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्यातील सर्व महिला सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. या गदारोळात आमदार अहिरे काँग्रेस पक्ष कार्यालयापर्यंत पोहोचल्या, तर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण तणावपूर्ण होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. यावेळी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाने राष्ट्रवादीचे हसू झाले… राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने काँग्रेस पक्ष कार्यालयावर मोर्चा काढून स्वतःचेच हसू करून घेतले आहे. त्यांनी आमच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी नाशिककरांच्या प्रश्नांवर, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांवर आणि त्यात अनेक नागरिकांना गमवावे लागलेल्या जीवांच्या जबाबदारीचे भान ठेवून महानगरपालिकेवर मोर्चा काढला असता, तर त्यांचे हसू झाले नसते. त्यांना बुद्धी मिळो, हीच माफक अपेक्षा. — निलेश (बबलू) खैरे, अध्यक्ष, नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी, नाशिक ०००००

 दिवा पोलीस स्टेशन कधी सुरू होणार? इमारत तयार, तरीही नागरिकांना मुंब्र्याची वारी!

 वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी आणि अपुरे पोलीस बळामुळे दिवेकर त्रस्त; रात्रीच्या वेळी तक्रार करण्यासाठी मोठी अडचण दिवा, दि. ५ ऑगस्ट (आरती परब) -दिवा शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या…

बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव कापरे यांनी वयाच्या ७४ व्या वर्षात पदार्पण केले त्याबद्दल त्यांचे अभीष्टचिंतन करतांना बोरीवली पूर्व येथील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख राजा खोपकर, अभय नामजोशी, कुशन…

 नाशिकच्या पावसाळी पर्यटनाला बहर

आदिवासी भागातील ‘होमस्टे’मुळे स्थानिकांना रोजगार हरिभाऊ लाखे नाशिक: पावसाची एक सर कोसळली की नाशिककरांना वर्षा सहलीचे वेध लागतात. शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ, तर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांनी फुलून जातात. या गर्दीमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असली, तरी आदिवासीबहुल भागातील स्थानिकांसाठी हा पावसाळा रोजगाराची नवी संधी घेऊन येत आहे. विशेषतः ‘होमस्टे’ संकल्पना, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांमुळे या भागातील पर्यटनाला वेगळी ओळख मिळत आहे. उन्हाच्या कडाक्यानंतर पडणाऱ्या पावसाच्या पहिल्याच सरी वर्षा सहलीचे निमंत्रण घेऊन येतात. यंदा जूनमध्ये तुरळक पाऊस झाला. त्यानंतर जुलैमध्ये अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही काळ पर्यटनावर परिणाम झाला असला, तरी मुसळधार पाऊस, धबधबे आणि निसर्ग अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधबा, गोदाकाठ आणि इतर पर्यटनस्थळांवर दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसात चिंब भिजल्यानंतर गरमागरम मका कणीस, भुट्टा, वडापाव, कांदा भजी, खारे शेंगदाणे आणि फुटाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची रांग लागते. त्यामुळे लहान-मोठ्या विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे. त्र्यंबकेश्वरमधील आंबोली, वाघेरा घाट, कश्यपी धरण, हरसूलमधील दावलेश्वर, खैराई किल्ला, तसेच सुरगाणा परिसरातील भिवतास धबधबा, खोकविहीर येथील केळावण, तातापाणी, पिंपळसोड, भारुंडी आदी ठिकाणे पावसाळ्यात पर्यटकांना खुणावत आहेत. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेल्या या आदिवासीबहुल परिसरात नाशिकसह मुंबई, पुणे आणि परराज्यांतील पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. दिवसभर निसर्गाचा आणि जैवविविधतेचा अनुभव घेतल्यानंतर आदिवासी कुटुंबांकडून त्यांचा पारंपरिक पाहुणचार केला जातो. त्यामुळे या सहलींना केवळ पर्यटन नव्हे, तर ग्रामीण आणि आदिवासी जीवनशैलीचा अनुभव अशीही ओळख मिळत आहे. नाशिकमधील काही पर्यटन व्यावसायिकांकडून या सहलींचे नियोजन केले जाते. त्याअंतर्गत आदिवासी बांधवांच्या घरांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था केली जाते. महिला बचत गटांकडून भोजनाची जबाबदारी सांभाळली जाते. पर्यटकांच्या पसंतीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी भोजनाची व्यवस्था केली जात असली, तरी बहुतांश पर्यटक शाकाहारी जेवणालाच पसंती देतात. भात, डाळ, उडीद डाळीचे भुजिया, नागलीची भाकरी, विविध रानभाज्या आणि स्थानिक पद्धतीचे पदार्थ यांचा समावेश असलेले अमर्यादित भोजन अवघ्या १२० ते १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.

गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महापालिका कायम कटिबद्ध : शर्मिला पिंपळोलकर

अनिल ठाणेकर | ठाणे भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृती, परंपरा आणि विचारांची ओळख आहे. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते आणि इतर भाषांचे ज्ञान आत्मसात करणेही सुलभ…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना दिलासा

 महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध –  मेघना साकोरे-बोर्डीकर रायगड-अलिबाग : महिलांना उद्योजक व आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक महिला लखपती व्हावी, हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पनवेल येथे सांगितले. महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’त त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर व अभिनेते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, सातबारा उतारा आदी महसूल विषयक कागदपत्रांचे जलद वितरण करण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या सक्षमीकरणासाठी तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राज्यात १० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असताना, रायगड जिल्ह्यातच सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांना समाधान शिबिरांचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासकीय योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत महसूल विषयक कामे तत्परतेने पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ००००

वाढवण बंदर खाण प्रकल्पाच्या जन सुनावणीमध्ये आंदोलकांचा गोंधळ

 दगड उत्खननासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली होती जन सुनावणी पालघर :  खोल समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड खाणींमधून दगडाचे उत्खनन करण्यात येणार आहे. सदर बाबीच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर सुनावणीचे आयोजन रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या तज्ञ मंडळींच्या अहवालावरून आणि जन सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी जन सुनावणीत गोंधळ घातला. गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड उत्खननामुळे पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आणि या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर होणारा बदल याबाबत मंडळाकडून एक अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवाल अध्ययनासाठी दिलेला कालावधी अपुरा असल्याचे प्रथमतः आंदोलकांकडून सांगण्यात आले. सदर अहवाल मराठी मध्ये आणि त्याचा मतितार्थ संक्षिप्त रूपात सादर करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्याला देखील नकार दिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने रविवारी शिगाव- खुताड येथे जाहीर जन सुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीत आंदोलकांनी तज्ञ मंडळींच्या अहवाला सोबतच अतिवृष्टी आणि शेतीची कामे सुरू असताना जन सुनावणी का घेतली? असा सवाल उपस्थित केला. दगडखणींमधून होणाऱ्या उत्खननाचा संभाव्य जीवनमानावरील आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या  सुनावणीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. अतिवृष्टी आणि शेतीची कामे यांची कारणे देत जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० ते ७० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना आंदोलकांनी धुडकारले. जन सुनावणीच्या सभा मंडपा बाहेर येऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर देखील आंदोलन सुरूच राहिले. अखेरीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जन सुनावणीचा कारभार सुरू करण्यात आला. यादरम्यान कुठलीही पोलिसी कारवाई होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली. जन सुनावणीचा कारभार सुरू असलेला पाहता घोषणाबाजीचे रूपांतर गोंधळबाजी मध्ये झाले. तुमच्या हरकती व सूचना लिखित अथवा कथित स्वरूपामध्ये प्रशासनाकडे नोंदवा अशी पोलिसांच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. एकंदरीतच जन सुनावणी उधळून लावण्याचा आंदोलकांचा मानस होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकंदरीत झालेल्या घडामोडींची नोंद घेऊन जन सुनावणी पूर्ण केली.पोलिस प्रशासनाने देखील सर्व आंदोलकांच्या मागण्यांची नोंद केली. प्रशासनाच्या वतीने जन सुनावणी मध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. चौकट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला तज्ञ मंडळींचा अहवाल इंग्रजीमध्ये असून तो फार मोठा आणि क्लिष्ट असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मंडळाच्या वतीने तो मराठीमध्ये व संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले ते देखील ग्रामस्थांनी झिडकारले.सुनावणी मध्ये अपेक्षित समस्या निराकरण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

खड्डे बुजविण्यासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री उतरले रस्त्यावर हरिभाऊ लाखे नाशिक : शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर नाशिककरांची झालेली ओरड यामुळे खडबडून जागे झालेले महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, रविवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मंत्री महाजन यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करत, आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील आणि आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसणार असल्याचा दावाही या वेळी दिला. तर, रस्ते दुरुस्तीचे काम गतीने करण्याचे आदेश मनपा आयुक्त खत्री यांनी दिले. शहरातील मखमलाबाद रोड, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, वाहनधारकांना पाठीच्या आजारांना आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. माध्यमांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीची आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेतला. पावसाची उघडीप मिळताच सर्व प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सच्या साहाय्याने तातडीने खड्डे बुजवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामाच्या गुणवत्तेत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शहरात उतरून खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली. आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमधील रस्ते सिमेंट काँक्रीटचे पाहायला मिळतील, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मखमलाबाद रस्ता पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दरवर्षी डांबरी रस्त्यांवर वाहनांचा भार आणि पावसामुळे खड्डे पडतात. त्यामुळे या वर्षी सर्व मुख्य रस्त्यांचे ‘व्हाइट टॉपिंग’ करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस लाईन आणि फायबर केबल यांसारख्या युटिलिटी लाईन्स जमिनीखाली दाबण्याचे काम सुरू असल्याने खुदाई करावी लागत आहे. त्यातच यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, येत्या आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील. या कामाचा वेग वाढवण्यासाठी सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि केंद्रीय एजन्सींची तातडीची बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा: नितेश राणे

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; नागरिकाभिमुख व पारदर्शक प्रशासनावर भर सिंधुदुर्ग : प्रतिनिधी महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील सर्वात महत्त्वाचा दुवा असून जन्मदाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी…

 सीईओ खेबूडकरांचा पुढाकाऱ्याने गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात

संवेदनशील प्रशासनाचा आदर्श…! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य र्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली- पागावाडी येथील जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या पुढाकारामुळे पाटील यांच्या मोडकळीस आलेल्या घराची दुरुस्ती पूर्ण झाली असून शासनाच्या विविध योजनांचाही लाभ त्यांना मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पाटील यांच्या घराचे छप्पर अत्यंत जीर्ण झाल्याने या कुटुंबाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी या संबंधात खेबूडकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पाटील यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून देत काम पूर्ण होण्यासाठीही पुढाकार घेतला. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर खेबूडकर  यांनी पुन्हा एकदा पाटील यांच्या घरी भेट देऊन घराच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घरासाठी आवश्यक असलेले दरवाजे तसेच पत्रे व अन्य किरकोळ कामांसाठी स्वतःच्या खिशातूनच आर्थिक मदत केली. खेबूडकर यांनी या निमित्ताने संवेदनशील प्रशासनाचा आदर्श घालून दिला आहे. खेबुडकर हे एवढेच करून थांबले नाहीत  तर त्यांनी या कुटुंबांना अंत्योदय रेशन कार्ड,शासकीय पेन्शन योजनेचा त्यांना  लाभ मिळावा तसेच आवश्यक औषधोपचार व पुढे  औषधे मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचनाही  दिल्या. सिंधुदुर्गात जि. प. चे   मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून   रुजू झाल्यानंतर खेबुडकर यांनी  शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण, महिला व बालकल्याण या विभागांच्या कामकाजात विशेष लक्ष घालून ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल असे महत्वाचे  निर्णय घेतले आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, अशा सेविका यांच्या प्रश्नात लक्ष घालून त्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा विशेष भर आहे आणि त्या दृष्टीने ते काम करीत आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि त्यांना औषधे घरपोच मिळावीत यासाठी ते सतत आग्रही असतात आणि तशा सूचना त्यानी  जिल्हा आरोग्य अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पाटील कुटुंबाच्या बाबतीत खेबुडकर यांनी जो संवेदनशील पण दाखवला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ००००