Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही – अंकुश राजपूत

 कल्याण पूर्वेत मनसेच्यावतीने ५८ वृक्षांचे वृक्षारोपण कल्याण : कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत गणेश टेकडी येथे ५८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी अंकुश राजपूत बोलत होते. राज ठाकरे हे एकमेव नेते असे आहेत जे त्यांच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्यांकडून मागत नाहीत. राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे तसेच पाणवठे तयार करण्याचे आवाहन केले होते. जंगलातील झाडे तोडल्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत असून हि झाडे तोडण्यामागे बिल्डर लॉबी असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. त्यासाठी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हि टेकडी काही वर्षांपूर्वी खूप मोठी होती, मात्र आता हि टेकडी कमी झाली असून आजूबाजूच्या बिल्डरांनी पोखरून खाल्ली असल्याचा आरोप यावेळी अंकुश राजपूत यांनी केला. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गणेश टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असून, नागरिकांनी देखील त्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करा. अनेक ठिकाणी झाडे तोडून इमारती उभ्या केल्या जात असून यामुळे प्रदूषण वाढले आहे. आजार वाढले आहेत. सत्तेत असलेले सरकार देखील झाडांची कत्तल करत असून, नाशिक मध्ये महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात येत आहे. मनसेची नाशिक मध्ये सत्ता असताना कुंभमेळा झाला होता. यावेळी एकही झाड तोडण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील झाडे न तोडता वृक्षारोपण करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी केले आहे. ००००

विवाहविषयक जाहिरातीतून महिलांना गंडविणाऱ्या भामट्याला अटक

– घटस्फोटित, दिव्यांग आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य; गुन्हे शाखेची मोठी कारवाई मिरा -भाईंदर : एका महत्त्वपूर्ण कारवाईत, गुन्हे शाखा युनिट-१ ने एका आंतरराज्यीय ठगाला अटक केली आहे. हा आरोपी विवाहविषयक संकेतस्थळे आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून घटस्फोटित, दिव्यांग, मानसिकदृष्ट्या अक्षम आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य करत असे. तसेच, बनावट विवाह आणि खोट्या ओळखीचा वापर करून त्याने या महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही अटक २०२२ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात करण्यात आली आहे. या प्रकरणात एका ७५ वर्षीय महिलेने आरोप केला होता की, आरोपीने “अजय अग्रवाल” असल्याचे भासवून २०१९ मध्ये तिच्या ४५ वर्षीय मुलीशी लग्न केले आणि नंतर कुटुंबाची ९७ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने लखनौमध्ये घर बांधून देण्याचे आणि नवीन फ्लॅट घेऊन देण्याचे आश्वासन देऊन त्या कुटुंबाला त्यांचा मीरा रोड येथील फ्लॅट विकण्यास प्रवृत्त केले. त्याने टप्प्याटप्प्याने ८२ लाख रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. आणखी एका घटनेत, त्याने पीडितेला कौटुंबिक लग्नासाठी दिल्लीला नेले आणि तिथे तिला सोडून पळून जाण्यापूर्वी ३३ तोळे सोने व हिऱ्यांचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे शोधून काढले आणि २४ मे २०२६ रोजी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून “जयप्रकाश गुप्ता” या नावाने बनवलेले बनावट आधार कार्ड, तीन मोबाईल फोन आणि एक एटीएम कार्ड जप्त केले. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपीचे खरे नाव अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे आहे. महिलांचा विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी तो अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद्र गुप्ता अशा विविध बनावट नावांचा वापर करत असे. पोलिसांनी सुमारे २० लाख रुपये किमतीची BMW X१ कार देखील जप्त केली आहे, जी कथितरित्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून खरेदी करण्यात आली होती. पुढील तपासात असे समजले की, आरोपी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या आणखी एका गुन्ह्यात हवा होता; तिथे त्याने एका महिलेशी बनावट ओळख सांगून लग्न केले आणि तिची २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. अशाच पद्धतींचा वापर करून आरोपीने अनेक राज्यांमधील २५ हून अधिक महिलांची फसवणूक केली असावी, असा संशय अधिकाऱ्यांना आहे. तपासादरम्यान आरोपीचा मुलगा अविरल ऊर्फ प्रखर अनुज कुमार त्रिवेदी (वय २७) याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे; त्याच्यावर फसवणूक करण्यात वडिलांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याला या प्रकरणात सह-आरोपी करण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-१ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “आरोपीने बनावट ओळख निर्माण करून आणि लग्न व सहजीवनाचे आश्वासन देऊन महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले व त्यांची फसवणूक केली.” प्राथमिक निष्कर्षांवरून असे दिसून येते की, देशभरातील २५ हून अधिक महिला त्याच्या फसवणुकीला बळी पडल्या असाव्यात. “आम्ही अशा कोणत्याही महिलेला किंवा कुटुंबाला आवाहन करतो ज्यांची या व्यक्तीने मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्म्स किंवा लग्नाच्या प्रस्तावाद्वारे फसवणूक केली असेल, की त्यांनी त्वरित ‘क्राइम ब्रँच युनिट-१’ शी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर पोलीस या कथित देशव्यापी फसवणुकीच्या जाळ्याची व्याप्ती तपासण्याचे आणि आणखी पीडितांचा शोध घेण्याचे काम करत आहेत.

१० कोटीच्या महावितरण, बीएसएनएल केबल चोरी टोळीचे राज्यभर जाळे

 अधिकाऱ्यांसह नाशिकमधील बड्या राजकीय नेत्यांचाही सहभाग ? हरिभाऊ लाखे नाशिक –महावितरण कंपनी तसेच बीएसएनएलच्या महागड्या भूमिगत केबलची चोरी करणाऱ्या टोळीचे जाळे उदध्वस्त करण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले असले तरी हे…

बिळवसच्या श्रीदेवी सातेरी जल मंदिरात २६ जुलैला आषाढी जत्रोत्सव….!

०००००००० मालवण : भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वदूर ख्याती असलेली सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरीचा(जलमंदीर ) आषाढ महिन्यात होणारा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी २६…

कास्ट्राईब महासंघाच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

– किशन जावळे व संदेश शिर्के यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता रायगड-अलिबाग : (अशोक गायकवाड )—-जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमवेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची प्रलंबित मागण्या आणि कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी, दि.११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर बैठकीदरम्यानच थेट फोन लावून तात्काळ निकाल काढला व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने सरळ सेवा भरतीतील अनुशेष भरणे, अनुकंपा भरती प्रक्रियेला गती देणे आणि अधिसंख्य पदांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्रलंबित वैद्यकीय बिले मंजूर करणे, निलंबन व पेन्शन प्रकरणांचा जलद निपटारा करणे या आर्थिक व प्रशासकीय लाभांच्या मागण्यांवर भर देण्यात आला. यासोबतच तीन वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे संकलन बदल करणे, सेवा वर्ग करणे आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३ डिसेंबर १९८० च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याबाबत आणि पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महसूल विभागात काम करताना येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर मार्ग काढण्यावर यावेळी विचारविनिमय झाला. याव्यतिरिक्त, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याचा सामाजिक उपक्रमही या बैठकीत निश्चित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला आश्वस्त करताना सांगितले की, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सर्व मागण्यांबाबत प्रशासन पूर्णपणे सकारात्मक असून, कर्मचाऱ्यांचा कोणताही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. या बैठकीला कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व संघटनेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे महासचिव सुरेश तांबे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश सदावर्ते, रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे, महसूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी, दिव्यांग विभागाचे सचिव शिवाजी बिवराळे, जिल्हा परिषद विभाग रायगडचे जिल्हाध्यक्ष खंडू बागुल, कार्याध्यक्ष सचिन ओव्हाळ, कोषाध्यक्ष विकास बडे, चिटणीस संतोष साळगावकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र गायकवाड तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार व रायगड जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. शेवटी रायगड जिल्हाध्यक्ष संजीव मोरे यांनी प्रशासनाचे आणि उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानल्यानंतर बैठकीची सांगता झाली.

 आता ‘उलटी  गिनती’ सुरु- वैभव नाईक

  वैभववाडीत भाजपामधून आउटगोईंग…! उबाठा सेनेत प्रवेश…! वैभववाडी : देशात, राज्यात सर्वत्र भाजपामध्ये ‘इनकमिंग’ सुरु असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला ‘आउटगोईंग’चा फटका बसला असून नेर्ले गावचे सरपंच, उप सरपंच यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ‘उबाठा’ सेनेत प्रवेश केला आहे. ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार  विनायक राऊत, जिल्हा प्रमुख  वैभव नाईक, माजी आमदार  परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख  सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्गात आता ‘उबाठा’ सेनेत प्रवेश करण्यास सुरुवात झाल्याचे सांगून आता ‘उलटी गिनती’ सुरु झाल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली आहे. वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश  घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना माजी खासदार राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही.भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा,दारू यासारख्याअवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे.पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील ‘कॅसिनो’ देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप  सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. महागाईच्या प्रश्नावर आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे असे ते म्हणाले. सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे त्यांचे कार्यकर्ते  विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत.सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत.त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीच जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचा आरोप केला आहे.  या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजपा विरोधात पहिली ठिणगी वैभववाडीत पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे लोण पसरणार आहे हे निश्चित असा विश्वास युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

 मृतदेहाला मिळेना रस्ता!

– दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे. अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.

 पुणे ग्रँड टूरसाठी गव्हर्निंग कौन्सिल स्थापन करण्याचे निर्देश

 स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन पुणे, दि. १२ : यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता पुढील वर्षीच्या…

मृतदेहाला मिळेना रस्ता!

 दिव्यात बिल्डरांच्या कथित दादागिरी विरोधात नागरिकांचा संताप दिवा : दिवा शहरातील बेडेकरनगर परिसरात राज वाघ यांचा मृत्यू झाला. पण मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्याच्या वेळी रस्ता बंद करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बेडेकरनगर येथील पाटील टॉवर आणि रविना अपार्टमेंट परिसरातील रस्त्याच्या वापराबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या मार्गावरून वाहन किंवा रिक्षा नेण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, एका मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणल्यानंतर अंत्ययात्रेसाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागणार असल्याचे माहिती असतानाही संबंधित रस्ता लोखंडी रॉड टाकून बंद करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच समाजसेवक अमोल केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याला लावण्यात आलेले कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना एका युवकाने चावी आणून कुलूप उघडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “जिवंत माणसांनाच नव्हे तर मृतदेहालाही रस्ता नाकारला जात असेल तर ही अत्यंत अमानुष बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित बिल्डर आणि जागा मालकांविरोधात पोलिसांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, तसेच नागरिकांना मुक्तपणे रस्ता वापरण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात आली आहे. अमोल केंद्रे, समाजसेवक, दिवा बिल्डरांची दादागिरी कधी बंद होणार.राज वाघ यांचे निधन झाले होते.अंतिम संस्कार करण्यासाठी बॉडी घेऊन जाण्याचा रस्ता बंद केला.पोलिस प्रशासनास कळवले,दिवा प्रभाग समिती यांना कळवले. बेडेकर नगर पाटील टॉवर येथे कित्तेक वर्षा पासून हिच परिस्थिती आहे.कोण बोलणार? गुंडागर्दी,हुकूमशाही सुरू आहे.माणुसकी जिवंत राहिली नाही.कायद्याचा धाक राहिला नाही.मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्यावर योग्य ती कारवाई करून हा रस्ता कायमचा खुला करावा.  

ठाणे मध्यवर्ती कारागृहात प्रसादिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन

ठाणे, महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभाग तसेच वै. प. पू. मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ, आळंदी (देवाची) द्वारा संचालित “वारकरी आचारसंहिता परिषद, महाराष्ट्र” याचे  संयुक्त…