Category: मुंबई

Mumbai news

चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात पुन्हा सवलत मिळणार?

मुंबई : भारतीय जनता पार्टीप्रणित महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाल्यानंतर विकासकांची अनेक महिन्यांपासूनची चटईक्षेत्रफळातील अधिमूल्य सवलतीची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. या बाबतचा प्रस्ताव तयार असून १५ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत साधारणत: सहा महिन्यांसाठी चटईक्षेत्रफळाच्या अधिमूल्यात सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ही सवलत किती असेल, याबाबत या सूत्रांनी मौन धारण केले. या बदल्यात विकासकांनी घरखरेदीदारांना फायदा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे कळते. करोनाच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यावेळी एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून सध्या असलेले अधिमूल्य भरमसाठ असून ते कमी करावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरासाठी चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे पालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रकल्पांत विकासकांनी लाभ उठवला होता. महायुती सरकारने समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात वर्षभरासाठी ५० टक्के सवलत दिली होती. आता अधिमू्ल्यात पुन्हा सवलत पुन्हा मिळावी, याबाबत विकासकांकडून वेळोवेळी शासनाकडे मागणी केली जात आहे. माजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही त्यावेळी तयार करण्यात आला होता. परंतु मावळत्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारकडून याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. करोना काळात चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात दिलेल्या सवलतीच्या बदल्यात घरखरेदीदारांना लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचा संपूर्ण भार संबंधित विकासकांनी उचलावा, अशी अट घालण्यात आली होती. विकासकाने तसे पत्र करारनामा नोंदणीकृत करताना नियोजन प्राधिकरणाला सादर करावा आणि संबंधित प्राधिकरणाने याबाबतची यादी उपनिबंधक कार्यालयाला द्यावी, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. ज्या विकासकांनी असा लाभ दिलेला नाही, त्यांना चटईक्षेत्र‌फळ अधिमूल्यात सवलत न देण्याचे ठरविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विकासकांच्या संघटनेने कंबर कसली असून यावेळी नक्की सवलत मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची दरवाढ झालेली असून विकासकांना विविध शुल्कांपोटी ४० ते ४५ टक्के अधिमूल्य भरावे लागत आहे. त्यात सवलत मिळाली तर बांधकाम व्यवसायाला संजीवनी मिळेल, असा विश्वास विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. ०००००

डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील

पालिकेच्या ‘ग’ प्रभागाची कारवाई डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ‘ग’ प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे. पाच गाळे सील करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या राजाराम निवासमधील पाच दुकान गाळ्यांचा समावेश आहे. या गाळ्यांचे मालक असलेल्या गोविंद पाटील यांच्याकडे मालमत्ता कराची ११ लाख ३७ हजार २३४ रूपयांची थकबाकी आहे. त्यांना ही थकित रक्कम भरणा करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ही रक्कम भरणा न करण्यात आल्याने त्यांचे व्यापारी गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली. मानपाडा रस्त्यावरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर यांचीही पालिकेकडे मालमत्ता कराची सात लाख १६ हजार ७४३ इतक रक्कम थकित होती. त्यांनाही पालिकेने वारंवार नोटिसा पाठवून कर भरणा करण्याची ताकीद दिली होती. त्यांनी ही रक्कम वेळेत भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे क्रिटीकल केअर सेंटर सील करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आस्थापना सील करण्याच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, मोहम्मद खान यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होता. या कालावधीत मालमत्ता कराची अपेक्षित वसुली पालिकेला करता आली नाही. येत्या चार महिन्यावर पालिकेचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाला आता धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका संपताच प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. जे मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कोट ‘ग’ प्रभाग हद्दीत काही मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. अशा धारकांना वारंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नाहीत. त्यामुळे अशा मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त देशपांडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. ग प्रभाग हद्दीतील एकूण सहा आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

एसएनडीटी विद्यापीठात संविधान आणि शहीद दिन

नवी मुंबइ : एसएनडीटी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉँग लर्निंग अँड एक्स्टेन्शन आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विभाग संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, संविधान समजून घेऊन समाजसेवकांनी त्यातील आपली भूमिका ओळखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यातून समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान कसे देता येईल, याबाबतही विचार केला पाहिजे. महिला तसेच उपेक्षित घटकांसाठीही विशेष कार्य करण्याची तळमळ अंगीकारली पाहिजे. सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव यांनी सांगितले की, महिलांना समान संधी देताना त्यांचा चा राजकारणातीलदेखील सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, तुम्ही माझी मंदिरे बांधण्यापेक्षा माझा अनुनय करा, संविधानातील मूल्ये अंगीकृत करा, याची माहिती सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी दिली. यावेळी विभागातील विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. काहींनी गीते गायली, कविता वाचन केले. याप्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचनदेखील करण्यात आले. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. 0000

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश :  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…

शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु

स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…

मुंबई, ठाणेकरांनो आता कपाटातून स्वेटर काढा !

मुंबई : विधानसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय तापमान दिवसागणिक वाढत चालले असले तरी मुंबई ठाण्यासह राज्यातील तापामानात कमालीची घट होत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा आता चांगलाच घसरला आहे. राज्यामध्ये शनिवारी नाशिक येथे ८.९ या सर्वात…

फडणवीसांची मुलुंडमध्ये ‘दिवाळी’

भाजापा नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंडमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह संमेलनात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सहभागी झाले आणि त्यांना कॅमेरात टिपण्यासाठी उपस्थितांमध्ये अशी चढाओढ सुरु झाली.

संघ दक्ष ! फडणवीसच मुख्यमंत्री !

मुंबई : मागील सत्तासंघर्षात सर्वाधिक १०५ जागा जिंकूनही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याएवेजी एनवेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून घेण्यात आला…

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील…

कामगार महर्षी आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबरला

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ७ डिसेंबर रोजी परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात आयोजित…