Category: मुंबई

Mumbai news

डोंबिवलीत रिजन्सी, गोळवली, दावडीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानीने भाडेवाढ

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून रिजन्सी गृहसंकुल, दावडी, गोळवली, सोनारपाडा दिशेने जाणाऱ्या रिक्षा चालकांना गेल्या काही दिवसांपासून अचानक पाच ते दहा रूपयांची वाढ केली आहे. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन…

भालचंद्र पाटील यांना आगरी समाजभूषण प्रदान

कल्याण : मुंबईत १९३५ साली स्थापन झालेल्या आगरी समाज संघ यांच्या विद्यमाने समाज मोहोत्सव साजरा करण्यात आला. त्या समयी समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणाऱ्या अनेक बांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये…

कल्याण परिमंडळ 3 मध्ये नशेखोरांविरोधात कारवाई सुरूच

 रविवारी 108 नशेखोरांवर आणि 92 मोटारसायकलस्वारांवर कारवाई  कल्याण : अल्पवयीन मुलीची हत्या आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतूल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आणल्याचे दिसत आहे. कल्याणच्या विविध भागांमधील नशेखोरांना ताब्यात घेत डीसीपी अतुल झेंडे यांनी चांगलाच इंगा दाखवला. पोलीसी खाक्या दाखवण्यासह अनेक नशेखोरांना उठाबशा काढायला लावल्या आणि पोलीसांनी त्यांची वरातही काढल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्तांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून अशा प्रकारची कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. कल्याण परिमंडळ 3 मधील विविध पोलीसस्टेशन अंतर्गत मोकळी मैदानी, निर्जनस्थळे व रोडवरील आस्थापना यांच्यावर पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून रविवारी रात्री या ठिकाणी एकुण 108 नशेखोरांविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच रोडवरील अती वेगाने मोटार सायकल चालवणे आणि ट्रिपल सीट वाहन चालवणे अशा एकूण 92 कारवाई कल्याणमध्ये पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. पोलिसांची धडक कारवाई मोहिम अशीच सुरू राहणार  असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पोलिसांच्या या कारवाई सत्रामुळे नशेखोरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

ठाण्याच्या अतिरिक्त पाण्यासाठी मुंबई महापालिकेच्या हालचाली..

 आमदार संजय केळकर यांची दोन्ही महापालिका अधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक अनिल ठाणेकर मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी मिळावे यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत संयुक्त बैठक घेतली. यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी आदी भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे. त्यादृष्टीने आमदार संजय केळकर यांनी  अधिवेशनात अनेकवेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सोमवारी केळकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचीही भेट घेतली. त्यानंतर  मुंबई महापालिकेचे उपजल अभियंता (प्रचालने) पराग शेठ, कार्यकारी अभियंता जयंत खराडे, प्रकाश खराडे, ठाणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार, श्री.कुलकर्णी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. ठाणे शहराला मुंबईकडून मिळणाऱ्या नियोजित ५० एमएलडी पाण्यापैकी २५ एमएलडी पाणी आधी तातडीने मिळावे याबाबत श्र.केळकर यांनी आग्रह धरला. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेला अतिरिक्त पाणी देता येईल असे सांगितले. याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी या आधी ठाणे महापलिकेचे आयुक्त म्हणून काम केले असल्याने त्यांना ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्याची माहिती आहे. त्यांनी ठाण्याला अतिरिक्त पाणी देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे महापालिकेला कशा पद्धतीने अतिरिक्त पाणीपुरवठा करायचा यावर चर्चा झाली. मुंबई महापालिकेचे वरळी येथे पाणी पुरवठा विभागाचे नियोजन केंद्र असून तेथील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या ठाण्याला तातडीने २५ एमएलडी पाणी निश्चित मिळेल, असा विश्वास केळकर यांनी सांगितले.

प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या वतीने जनमोर्चा

ठाणे : दिनांक १० डिसेंबर २०२४रोजी परभणी येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती ही कृत्य जाणीवपूर्वक करण्यात आले यामागे फॅसिस्ट मूलतत्त्ववादाचे कार्य स्थान आहे हे…

एसटी महामंडळाला होणारा तोटा आणि त्यांची वाईट अवस्थेत असलेली स्थानके याबद्दल अजून अभ्यास केला नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मिरा -भाईंदर / अरविंद जोशी भाईंदर पश्चिमेकडील एसटी स्थानकाचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. भाईंदर पश्चिमकडील जागेचा परिवहन खाते आणि मिरा-भाईंदर महापालिका दोघे मिळून…

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्याअडीअडचणी सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेऊ

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाणेकरांना आश्वासन मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही गृहनिर्माण संस्थांची स्वयंपुनर्विकास मोहीम सुरु करा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन राजेंद्र साळसकर ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन…

अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई :उच्च न्यायालयाचे वेळोवेळी आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ.…

‘म्हाडा’तही लवकरच सामान्यांच्या तक्रार, निवारणासाठी शिखर समिती!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातही (म्हाडा) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

शुद्ध हवेसाठी गोरगाववासियांची धडपड

मुंबई : मुंबईत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे आणि तो का याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याचे मत व्यक्त करून…