Category: मुंबई

Mumbai news

ना’राज’

‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ – छगन भुजबळ मी बाळासाहेबांचा शिवसैनिक- तानाजी सावंत आज प्रमोद महाजनांची आठवण येते- सुधीर मुनगंटीवार मुंबई : महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळ शपथविधीनंतर महायुतीत आनंदाची लाट उसळायच्याएवेजी नाराजीची…

 रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात Slug – 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार मुंबई-  भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.…

Heading – बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा                                                 

 सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून…

 3000 पेक्षा अधिक धावपटू ठाण्याच्या रस्त्यांवर उत्साहाने धावले

 रुनवाल रिअल्टी ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात 300 ज्येष्ठ नागरिक आणि 270 मुलांनी शर्यत पूर्ण केली; मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी पॅरा-धावपटूंना कृत्रिम पाय देण्यासाठी वापरण्यात येणार   मुंबई-  भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या रुनवाल रिअल्टी यांनी प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया यांच्या सहकार्याने ठाणे हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रनवाल 25 आवर्स लाइफ, मानपाडा, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात केले. “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स” या थीमवर वर आधारित या स्पर्धेमध्ये 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी मजेत धावण्याचा तसेच 1 किमी कौटुंबिक धाव अशा शर्यतींचा समावेश होता. 3000 हून अधिक धावपटू आणि 30 पॅरा-अॅथलीट्स यांनी आरोग्य, समावेशकता आणि सकारात्मक बदल या सामूहिक ध्येयासाठी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. चिकाटीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच, ही मॅरेथॉन सामाजिक उद्दिष्टाचे प्रतीक ठरली. या कार्यक्रमातून मिळणारा संपूर्ण निधी भारतातील पॅरा-अॅथलेटिक चॅम्पियन्सना कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे रुनवाल रिअल्टीने जिद्द, सामर्थ्य आणि सकारात्मक बदल घडवण्याची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. ह्युमेबल फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे या कार्यक्रमाचे योगदान अधिक व्यापक झाले असून, समाज अधिक समावेशक करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.…

 बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा    

 सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना कामावर जाण्यायेण्यास जीवावर उदार होऊन मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांनी सेवा दिली. त्याबद्दल प्रोत्साहन म्हणून प्रति दिन तीनशे रुपये विशेष भत्ता घोषित केला होता. परंतु उपक्रमाने गेल्या चार-पाच वर्षांत बेस्ट कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्यापासून वंचित ठेवले आहे. विधानपरिषद आमदार प्रसाद लाड पुढाकार घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये मोठा गाजावाजा करून एका समारंभात बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्री अनिल डिग्गीकर यांच्याकडे 78 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता. परंतु अजूनही बेस्ट कामगारांना कोविड भत्त्याचे वाटप झालेले नाही. त्यामुळे बेस्ट कामगारांची फसवणूक  झाल्याची भावना कामगारांमध्ये पसरली आहे. अशा प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बेस्ट कामगारांमध्ये मलीन होत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते श्री महेश दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. 000

ओम साईश्वर, शिवनेरी, श्री समर्थची विजयी सलामी  

 किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ…

मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल येथे संपन्न

ठाणे : किल्लेकर समूह, वयम, सेवा सहयोग, कोरम मॉल, यांच्या सौजन्यशील उपक्रम कोरम मॉल येथेच आयोजित करण्यात आले होते. मातीचा किल्ला बनविणे ही स्पर्धा कोरम मॉल मध्ये आयोजन करण्यात आले…

परळ येथे युवा क्रीडा महोत्सव २०२४ ला सुरुवात

ठाणे : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन आर एम यु) ने भविष्यवादी व्हिजन अंतर्गत २०२४ मध्ये सुरू झालेला “युवा क्रीडा महोत्सव” आयोजित करण्याचा १० वर्षांचा जुना वारसा सुरू ठेवला आहे.…

विनय क्षीरसागर यांची  व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई: विनय क्षीरसागर यांची १ डिसेंबर २०२४ पासून आयआरक्लास सिस्टम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक – (मॅनेजिंग डायरेक्टर)  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सागरी उद्योग आणि चाचणी, तपासणी आणि प्रमाणता…

ओम साईश्वर, शिवनेरी, श्री समर्थची विजयी सलामी  

किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई – ४०००१६ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उमेश नरवणे (सी.ए.), अॅड. अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई आणि ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील प्रमुख सामने आणि निकाल आज सर्व सामने किशोरीचे झाले. किशोरींच्या ओम साईश्वर सेवा मंडळ ने सरस्वती कन्या संघाचा ९-२ (९-१-१) असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम साईश्वरच्या वीरा मयेकर (४ मि. संरक्षण व ३ गुण), यशस्वी कदम (४ मि. संरक्षण व २ गुण), आर्या जाधव (नाबाद ३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी केलेल्या खेळापुढे सरस्वती कन्या संघाचा निभाव लागला नाही. किशोरींच्या दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेचा ९-४ (९-२-२) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरी तर्फे गार्गी कडगेने ४:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. गौरांगी पेडणकरने आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. इमला बोऱ्हाडेने ३:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आर्यसेनेतर्फे आरुषी परवडीने नाबाद १:५० संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. दिक्षिता घोलपने १ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. किशोरींच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (१७-२-३) १७-५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे सोनम शेलारने नाबाद २ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. युक्ता पटेलने २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. स्नेहा कांबळेने १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. वैभवतर्फे मेघदा देवळेकरने १:१०, १:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. किशोरींच्या चौथ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ व्यायाम मंदिराचा (९-१-१) ९-२ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने ४:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. वीरा मयेकरने ४:५० मिनिटे संरक्षण केले. आर्या गोरिवलेने नाबाद २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ॐ समर्थतर्फे खेळाडूने चांगला प्रतिकार केला. 0000