Category: मुंबई

Mumbai news

नवउद्योजक,व्यावसायिकांसाठी वरळीत उद्यापासून तीन दिवस प्रदर्शन

मुंबई : क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन (CiiA) या स्वयंसेवी संस्थे तर्फे नवउद्योजक-स्टा स्टार्टअप,इतर व्यावसायिकांसाठी वरळी नेहरू सायन्स सेंटर येथे नवोपक्रम प्रदर्शन ५ ते ७  फेब्रुवारी दरम्यान सकाळी १०:३०…

धारावीत  रायफल शुटींग प्रशिक्षण अकॅडमीचे झाले उद्‌घाटन

केतन खेडेकर मुंबई : बौद्धिक विकासाबरोबरच वि‌द्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणेही तितकेच महत्त्वाचे असून शारीरिक विकासासाठी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खेळाच्या अंगभूत कौशल्याला तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन तथा प्रशिक्षण घेणे आज काळाची…

तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाखाचा अवॉर्ड देणार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान राजेंद्र साळसकर मुंबई : मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास अभियान आणखी ताकदीने पुढे नेण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मुलुंड (पूर्व) येथील आर्यावर्त इंद्रप्रस्थ को. ऑप. सोसायटीतील रहिवाशांनी कोणत्याही बँकेचे आर्थिक पाठबळ न घेता स्वयंपुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारत उभी केली आहे. या इमारतीतील रहिवाशांना आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत चावी वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी  विकास महात्मे, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी, सोसायटीचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, सचिव विशाल मारकड, खजिनदार रत्नाकर वरळीकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले कि, आज तुमच्याकडून आम्ही शिकायला आलोय. हे सगळं शिक्षण पुढे प्रचारीत, प्रसारित करणं म्हणजे घरांची चळवळ आणि ती मराठी माणसांच्या घरांची चळवळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी माणसाच्या घराची, कुटुंबाची चिंता असते म्हणून ते शासन निर्णय काढतात. शेलार पुढे म्हणाले कि,मी यापुढे पालकमंत्री म्हणून अशा शंभर टक्के सहकारी चळवळीतून, सहकार्यातून इमारत उभी करणार आहेत त्या सोसायट्यांना तंटामुक्त सस्नेही सोसायटी म्हणून एक लाख रुपयांचा अवॉर्ड देणार आहे. तसेच तुमच्या ज्या काही नवीन सूचना आल्या आहेत त्या शंभर टक्के नवीन अध्यादेशात घालू. पण ही चळवळ वृद्धिंगत होवो. तुमचे कार्य अनेकांना प्रेरणा देईल, असेही आ. शेलार यांनी म्हटले. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले कि, मुंबईत स्वयंपुनर्विकास व्हावा हा माझा अट्टाहास होता. गेली १५ वर्ष मी यावर काम करतोय. मुंबईत मध्यमवर्गीय सर्वसामान्य मराठी माणसासाठी स्वयंपुनर्विकास हा दिशादर्शक आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच स्वयंपुनर्विकास गतीने होताना दिसतोय. मुंबई जिल्हा बँकेकडे १६०० प्रस्ताव आलेत. त्यातील ३६ प्रकल्पाना कर्जमंजुर केले असून १४ इमारतींमध्ये लोकं राहायला गेली आहेत. पुढील आठवड्यात चारकोप येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्री यांना घेऊन जाणार आहे. गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत स्वयंपुनर्विकासासाठी १८ मागण्या केल्या होत्या त्यापैकी १६ शासन निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काढण्यास सांगितले. आता राज्य सहकारी बँक स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी रूपये आणि एनसीडीसीकडून एक हजार कोटी मुंबई बँकेला मिळणार आहेत. त्यातून मुंबईतील स्वयंपुनर्विकास होणार आहे. तसेच सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन काढावे आणि हे अभियान मुंबई पुरते न राहता नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या ठिकाणी जावे व गरिबाला घर मिळावे यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असल्याचे दरेकरांनी सांगितले. आशिष शेलार आपण मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहात. मुंबईचे अध्यक्ष आहात. तुम्ही पुढाकार घेतलात आणि माझ्या खांद्याला खांदा लावून आपलाही आशीर्वाद या स्वयंपुनर्विकासाला लाभला तर मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला चांगले घर मिळू शकते. सर्वार्थाने मुंबईकरांसाठी स्वयंपुनर्विकास महत्वाचा आहे. हे अभियान आणखी ताकदीने पुढे जावे यासाठी पालकमंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही दरेकर यांनी यावेळी आशिष शेलार यांना केली.

सानपाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

नवी मुंबई : नवीन मुंबई सानपाडा येथील सेक्टर ८ च्या हुतात्मा बाबू गेनू सैद गणेश मैदानावर  गणेश जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा  मंडळाच्या वतीने २६ जानेवारी ते २ फेब्रुवारीच्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली. आळंदीचे ह.भ.प. श्री. महादेव महाराज पैठणकर यांचे काल्याचे किर्तन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान  ह. भ. प. श्री.  अनिल महाराज पाटील,  ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज निंबोळे,  ह. भ. प. श्री. शंकर महाराज मोरे, ह. भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे, ह. भ. प. श्री. देवेंद्र महाराज निढाळकर, ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज शिंदे,  ह.भ. प. श्री. ज्ञानेश्वर महाराज काकडे,  या मान्यवर महाराजांची आध्यात्मिक ज्ञानदानाची किर्तनरुपी सेवा झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ. प. श्री. बाळू महाराज औटी व  ह. भ. प. श्री. मनोहर महाराज लांडे यांनी केले, तर दैनंदिन पूजा व्यवस्था सर्वश्री. रघुनाथ कवडे, ज्ञानेश्वर डोंगरे, शरद घोलप, अशोक घाडगे यांनी केली. या कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी देणगी देऊन  सहकार्य केले. भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजनबद्ध  असा सुंदर कार्यक्रम झाला. अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले होते.

श्री उद्यानगणेश कॅरम स्पर्धेत विश्वेत, निखील, सोहम, केतकीची विजयीदौड

मुंबई : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री उद्यानगणेश मंदिर चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत हिरानंदानी फाउंडेशन स्कूल-ठाणेचा विश्वेत बिजोतकर, सीईएस मायकल…

टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धा

ओरिएंटल इन्शुरन्सचा टाटा एआयए इन्शुरन्सवर विजय मुंबई : टाइम्स शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या एफ डिव्हिजन सामन्यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्सने टाटा एआयए इन्शुरन्सवर ७ विकेट राखून विजय मिळवला. सोहम चुरीचा अष्टपैलू खेळ त्यांच्या…

नव्या वर्षात मिळाले त्याला गमावलेले दोन्ही हात

नव्या हाताने केली त्याने आनंदी जीवनाची सुरवात रमेश औताडे मुंबई : एका भीषण रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या २६ वर्षीय हृतिकला नव्या वर्षात दोन नवीन हात मिळाल्याने त्याचे २०२५ वर्ष…

भायखळा मनसे खाद्य महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद

केतन खेडेकर मुंबई : मराठा सेवा सहकारी संस्था आयोजित एल आय सी पुरस्कृत मनसे भायखळा खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सर्व…

सुशिक्षित बेरोजगार सोसायटी यांना सक्षम करणार- शेखर निकम

केतन खेडेकर मुंबई : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी केले. राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच बृहन्मुंबई व मुंबई फेडरेशन यांचे वतीने नुकताच त्यांचा मुंबईत नरिमन पॉइंट येथील साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि बृहन्मुंबई बेरोजगार सेवा संस्थांचे मार्गदर्शक नंदकुमार काटकर यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकार कडून देण्याचे आदेश ही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात ही उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थाना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशन च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या  नेतृत्वाखाली राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस आमदार प्रसाद लाड, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग,  सिकंदर पटेल लातूर, शरद देवरे नाशिक, जनार्दन चांदणे ठाणे, सचिन कोल्हापुरे रत्नागिरी, समीर रजपूत औरंगाबाद, जयंत शिरीषकर, संजय कांबळे, श्रीनिवास देवरूखकर, विजय केदारे, स्मिता अंजर्लेकर मुंबई, स्वप्नील फाटक तसेच राज्यांतील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४  परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज – डॉ. सुवर्णा खरात

अशोक गायकवाड मुंबई : येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी. महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ खरात यांनी यावेळी सांगितले.