Category: मुंबई

Mumbai news

स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी बचत गटांनी मालाचा दर्जा आणि पॅकिंगवर भर द्यावा- नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी —जिल्ह्यातील बचत गट तयार करीत असलेल्या मलाचा दर्जा चांगला असेल आणि पॅकिंग चांगले असेल तरच आजच्या स्पर्धेच्या युगात बचत गटांचा टिकाव लागू शकेल.तेव्हा या दोन्ही बाबींवर भर देऊन वाटचाल…

– देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व

 भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन डोंबिवली :“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव…

कच्छी समाजाशी जिव्हाळ्याचे नाते; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : एकनाथ शिंदे

  अनिल ठाणेकर | ठाणेकच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.…

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (Construction and Demolition – C&D) कचऱ्याचे  निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी  ठाणे महापालिकेने C&D Waste Management Portal विकसित केले असून या पोर्टलचे उद्घाटन आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदुषणसंदर्भातील Suo Moto PIL क्र ३/२०२३ मधील निर्देशांच्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने Council on Energy, Environment and Water (CEEW) यांच्या सहकार्याने (Construction and Demolition – C&D) Waste Management Portal विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक नगररचना कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्र.मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच Council on Energy, Environment and…

रिंग मेट्रोमुळे चेंदणी कोळीवाड्यात संभ्रम –  संजय केळकर

ठाणे : वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गामुळे चेंदणी कोळीवाडा परिसरात संभ्रमाचे वातावरण आहे. या मार्गामुळे या कोळीवाड्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भौगोलिक महत्वालाच तडे जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत…

बी.आर. नगरच्या नागरी समस्यांबाबत शिवसेना उबाठा पक्षाचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन

दिवा, दि 16 जुलै : बी.आर. नगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर शाखेच्या वतीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.…

कल्याणच्या केएफसीमध्ये अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली

कल्याण : कल्याणच्या खडकपाडा येथील केएफसीमधील आऊटलेटमध्ये अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचा ठपका अन्न व औषध प्रशासन विभागाने ठेवला आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण मंचचे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांनी एका…

मतदार पडताळणीबाबत संभ्रम कायम

घरोघरी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक -नंदकुमार देशमुख अनिल ठाणेकर ठाणे, मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेबाबत प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरले जात नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील, असे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही कर्मचारी घरी आलेला नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. शिवाईनगर येथील शाळेत सुमारे ५० नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे बीएलओंची यादी उपलब्ध झाली. मात्र यादीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने किंवा आवश्यक माहिती न दिल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने माहिती मिळविणे किंवा अर्ज भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. बीएलओंना आवश्यक सूचना देऊन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केली आहे.

 सोमवारी रसिक श्रोत्यांची होणार तुफान गर्दी !

 प्रा. विसुभाऊ बापट घेऊन येताहेत आपला ३१५० वा महोत्सवी प्रयोग मुंबई, दि. (प्रतिनिधी) : संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई पासून बहिणाबाई चौधरी पर्यंत आणि कुसुमाग्रज, विं. दा. करंदीकर, मंगेश…

१८ वर्षे उलटूनही न्याय नसल्याने आंदोलनाचा इशारा

मेश औताडे मुंबई: श्री छत्रपती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल १७-१८ वर्षे उलटूनही न्याय मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील सात दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा, नाहीतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहनिर्माण विभागाने दिलेल्या निर्देशांचे अभियांत्रिकी विभागाकडून कथितपणे पालन न करता प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मुंबई अध्यक्ष  सर्जेराव निकम व मुंबई सरचिटणीस  महेश महादेव लाड यांनी संस्थेचे पदाधिकारी अरविंद घाग मुख्य प्रवर्तक व मोहन पांचाळ सह प्रवर्तक एस आर ए चे सचिव शदत्तात्रेय नवले यांची भेट घेऊन  निवेदन सादर केले. स्थलांतर झाल्यानंतर ३ ते ४ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेला पुनर्वसन प्रकल्प आजही रखडलेला असून, रहिवाशांचे पुनर्वसन, कायदेशीर हक्क आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. संबंधित प्रशासनाने विलंब न करता तातडीने योग्य निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.