Category: मुंबई

Mumbai news

बदलापुरच्या शाळेचे संचालक मंडळ बरखास्त; प्रशासकाची नेमणूक

अत्याचाराची घटना घडलेल्या बदलापुरच्या शाळेवरील संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. तसेच या शाळेवर आता प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांनी पदभार सांभाळला आहे.  चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने…

उद्धव ठाकरेंचा सदावर्तेंवर निशाणा

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि…

बंद मागे, आंदोलन सुरू हाताची घडी, तोंडावर काळी पट्टी

न्यायालयाचा आदर राखत महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे ० आता राज्यभरात निषेध आंदोलने    मुंबई  : बदलापुरमधिल शाळेत चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधात शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद न्यायालयाच्या…

 फेरीवाल्यांवर आणि वाहनांवर कारवाई

दक्षता पथक मार्फत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नेरुळ विभागाअंतर्गत नेरुळ स्टेशन व सेक्टर-20 येथील गुडविल कॉर्नर येथे पदपथावर अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्या तसेच बेवारसपणे वाहन पार्किंग करणारे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पंधरा हातगाडी, तीन टेम्पो व एक रिक्षा इत्यादींवर सदर मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील केंद्रीय अतिक्रमण्‌ दक्षता पथक मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची व सामान जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे. सदर कारवाईसाठी अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, तेरा मजूर, तीन टोईंग, तीन पिकअप, एक आयशेर, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक समवेत सुरक्षारक्षक उपस्थित होते. यापूढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

 11 लाख ‘लखपती दिदींना’ प्रधानमंत्री यांच्याकडून प्रमाणपत्र

जळगावात 25 ऑगस्ट रोजी सोहळा   मुंबई  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-या दरम्यान  जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून श्री.मोदी त्यांचा सत्कार  करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी  एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या  कुटुबांला  हातभार लावत, कुंटुंबीयाना  गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात  मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा प्रधानमंत्री .मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात प्रधानमंत्री 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दिदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दिदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दिदींचा समावेश आहे. ००००

मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये 3 हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री…

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी २४ तारखेला असलेल्या बंदला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मुझप्पर हुसेन यांनी केले आहे. मीरा भायन्दर पत्रकारांशी वार्तालाप करत असतान ते बोलत होते.कायद्याचा कोणताही…

कर्जमुक्ती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना मुंबईत अटक

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन-कापूस दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रात्यक्षिक आंदोलन करताना शेतकऱ्यांना मुंबईत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली. शेतकरी नेते रविकात तुपकर यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनाही अटक करून किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर सुटका केली. पोलिसांना चकमा देत शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. सगळे एकत्र गेलो तर पकडले जाऊ त्यामुळे काही शेतकरी वेगवेगळ्या ग्रुपने मुंबईत दाखल होऊन आंदोलनाच्या स्थळी पोहोचतील असे नियोजन तुपकारांचे होते. तर दुसरीकडे मुंबईत येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांचा  बंदोबस्त लावण्यात आला होता. तरीही पोलिसांना चकमा देऊन  मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाकडे निघाले होते. परंतु मरीन ड्राईव्ह परिसरात  पोलिसांनी रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या व सरकारच्या या भूमिकेविषयी यापुढचे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. 0000

टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांची फेरनिवड

मुंबई : टांकसाळ मजदूर सभेची वार्षिक सर्वधारण सभा टांकसाळमध्ये पार पडली. या सभेमध्ये संघटनेची नवीन कार्यकरिणी बिनविरोध निवडण्यात आली. यात टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के.…

नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या केंद्राविरुद्ध लढावे लागेल! – पृथ्वीराज चव्हाण

राजेंद्र साळसकर मुंबई : कामगार कायदे गुंडाळताना कुणाशी चर्चा नाही की संवाद नाही,  कामगार नको आहेत.  पण उद्योगपती हवे आहेत. केंद्र सरकारने संमत केलेले, कामगार हिताविरोधी चार कोड बिल राज्यात लागू करण्याचा डाव‌ महायुती सरकारचा आहे, तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे सरकार येणार नाही,याची काळजी कामगार वर्गाला घ्यावी लागेल,असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे कामगारांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना दिला. राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने संघटनेचे‌ आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११७ वी जयंती नुकतीच परेल च्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली‌.या प्रसंगी गं.द.आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागतपर भाषण केले. माथाडी कामगार कायदा दुरुस्ती विधेयक मांडणारे हे राज्य सरकार केंद्राने संमत केलेल्या चार श्रम संहिता राज्यात लागू करण्याचा मोका शोधू पाहत आहे.देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश‌‌ विकसित देशांच्या पंक्तीत असेल,असे दिवा स्वप्न दाखविणा-या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चालीविरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल, असे‌ आवाहन‌ राज्याचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कामगार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, मुंबई मधील कामगारांना एक लाख ४० हजार घरे देण्याचे धाडस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविले आहे.परंतु राज्याच्या महायुती सरकारने मागील सरकारने सोडतीत लागलेल्या घरांच्या चावी वाटपापलीकडे काहीच केलेले नाही. या सरकारने सत्तेवर आल्यापासून एकाही कामगारासाठी नवीन घर बांधलेले नाही. यापूर्वी मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या एनटीसीद्वारे चालविण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीचा निर्णय घेतला.परंतु आताचे केंद्र सरकार देशातील बंद पडलेल्या एनटीसीच्या २३ गिरण्या चालविणे आमचे काम नाही,असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.केंद्र सरकारने कोविडचे कारण पुढे करून चालू असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या बंद केल्या आहेत.आम्ही या प्रश्नावर  राष्ट्रीयस्तरावर लढा उभा केला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात,संघटनेने अमृत महोत्सवी वर्षाची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल.केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांना‌ श्रमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आजाराच्या कारणास्तव ते समारंभाला आले नाहीत. मानाचा गं.द.आंबेकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कॉंग्रेस कामगार नेते भाई जगताप यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कारखाने आणि आस्थापनातील कामगार १)(सिन्नर) येथील रिंग प्लस ऍक्वा कंपनीतील कामगार (सिटु) हरिभाऊ बाळाजी तांबे यांनी कामगार चळवळीतून,२) व्हीव्हीएफ इंडिया कंपनीतील कामगार सामाजिक क्षेत्रातील निस्पृह कार्यकर्ते दिलीप गणपत‌ खोंड (मुंबई) यांना सामाजिक क्षेत्रातून,३) पाच‌ कथा संग्रह प्रसिद्ध असलेले महिंद्रा मधील कामगार लेखक विलास पंचभाई (नाशिक) यांना साहित्यातून, ४) सरकारी आस्थापनातील‌ लिपीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू नेहा मिलिंद साप्ते यांना (मुंबई) क्रीडा क्षेत्रातून,५) विविधांगी कलेने सुपरिचित असलेले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कामगार संतोष दत्ताराम शिंदे (रत्नागिरी) यांना कला‌ क्षेत्रातून आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव विजेते कॉंग्रेसनेते आमदार भाई जगताप यांचेही यावेळी भाषण झाले. डॉ.शरद सावंत,राजेंद्र गिरी,प्रदीप मून,काशिनाथ माटल यांनी पूरस्कार निवड समितीचे काम पाहिले.गं.द.आंबेकर जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाटचालीवर एक माहितीपूर्ण चित्रफीत प्रकाशित करण्यात आली.या औचित्याने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गिरणी कामगारांच्या मुलांचा “आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे,रामिम संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.