Category: मुंबई

Mumbai news

 पद्मश्री शंकर महादेवन यांचा ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभाग

नागरिकांना तिरंगा फडकविण्याचे केले आवाहन   नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान…

ई-बाईक व सायकलच्या इकोफ्रेंडली तिरंगा रॅलीतून देशभक्तीसह पर्यावरणशील संदेश प्रसारण

नवी मुंबई : संपूर्ण देशभरात 9 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात येणा-या ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिका आयुक्त…

सुरेश आचरेकर स्मृती चषकाची अनाहिता महाजन मानकरी

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित बीओबी कप विविध ८ वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अनाहिता महाजनने ६ वर्षाखालील गटात सर्व सामने जिंकले आणि समाजरत्न स्व. सुरेश आचरेकर स्मृती चषक…

अटल सेतूतील जोडरस्त्यावरील तडे प्रकरण

अखेर कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड     मुंबई : अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूच्या (अटल सेतू) जोडरस्त्यावर तडे पडल्याचे जूनमध्ये निदर्शनास आले होते. ही बाब निदर्शनास येताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तात्काळ जोडरस्त्याची दुरुस्ती केली. मात्र या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता कंत्राटदारावर कारवाई करून एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. नवी मुंबई आणि मुंबईतील अंतर १५ मिनिटांत पार करता यावे यासाठी एमएमआरडीएने १८ हजार कोटी रुपये खर्च करून २२ किमी लांबीचा अटल सेतू बांधला. या अटल सेतूचे लोकार्पण जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अटल सेतूवरून उलवे येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जोडरस्त्यावर तडे पडल्याची बाब निदर्शनास आली होती. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जूनमध्ये ही बाब प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर यावरून एमएमआरडीए आणि एकूणच कामाच्या दर्जावर टीका झाली होती. दरम्यान, तडे पडल्याचे वृत्त पसरताच एमएमआरडीएने तात्काळ जोरस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले आणि काही तासातच ते पूर्ण केले. अटल सेतूला कुठेही धोका नाही, २२ किमी लांबीच्या सेतूवर तडे पडलेले नाहीत, सेतूला जोडलेल्या जोडरस्त्यावर तडे पडल्याचे स्पष्टीकरण यावेळी एमएमआरडीएकडून देण्यात आले होते. एमएमआरडीएने रस्त्याची दुरूस्ती करून घेतली. मात्र कंत्राटदाराविरोधात केलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध झाली नव्हती. आता मात्र संबंधित कंत्राटदाराविरोधात एमएमआरडीएने दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकाराखाली उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जोडरस्त्यावरील तडेप्रकरणी कंत्राटदार कंपनी स्ट्रॉबॅगवर त्याचवेळी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. सदर रस्त्याचे ५ जानेवारीला काम पूर्ण करण्यात आले असून कामाची गुणवत्ता राखली नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले होते. त्यानंतर अटल सेतूचे सल्लागार के. आर. शिवानंद यांनी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई संबंधी नोटीस बजावली. तसेच एक कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच आवश्यक ती सर्व दुरूस्ती करण्याचेही निर्देश या नोटीसमध्ये कंत्राटदाराला देण्यात आले होते. दरम्यान, अटल सेतू महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून दर सहा महिन्यांनी अटल सेतूचे आवश्यक ते परीक्षण करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

अवयवदान चळवळ इतकी फोफावली पाहिजे की भारतातून नेत्रांची निर्यात होऊ शकेल

प्रा. नयना रेगे यांनी व्यक्त केला निर्धार     मुंबई  : आजच्या तारखेला श्रीलंकेसारखा आपल्यापेक्षा कितीतरी लहान असलेला देश भारतासारख्या महासत्तेकडे झेपावणाऱ्या देशाला नेत्रांची निर्यात करतो. आपल्या देशात अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटवून देत ही चळवळ इतक्या जोमाने फोफावली पाहिजे की भविष्यात भारतातून नेत्रांची निर्यात करता आली पाहिजे, अशी ‘नेत्र’दीपक कामगिरी करण्याचा निर्धार या चळवळीतील क्रीयाशील कार्यकर्त्या प्रा. सौ. नयना रेगे यांनी बोलून दाखविला. जागतिक अवयवदान दिनाच्या निमित्ताने पर्व शैक्षणिक धर्मादाय संस्थेच्या वतीने अवयव दान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.  या सप्ताहाचा शुभारंभ प्रा. सौ. नयना रेगे यांनी अवयव दानाचे महत्त्व कथन करून करण्यात आला. त्यांनी लोकांचा गैरसमज दूर करणारी काही उदाहरणे सुद्धा सांगितली. या  सप्ताहात महाराष्ट्राच्या विविध भागांत १८ ठिकाणी अवयवदान माहिती प्रचार आणि प्रसार ऑनलाईन केंद्र नागरिकांकरीता खुली होणार आहेत. या अवयव दानाच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ROTTO, SOTTO या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य समुपदेशक सुजाता अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संस्थेचे मुख्य सल्लागार विजय वैद्य आणि विश्वस्त सौ. वैशाली वैद्य, प्रविण वराडकर यांच्या समवेत पर्व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून महाराष्ट्र व्यापी अवयवदानचळवळ होणार असल्याचे विजय वैद्य आणि प्रवीण वराडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. 0000

झाडांवरील जाहिरात तसेच रोषणाई प्रतिबंधाबाबत उद्यान विभागाचे जाहीर आवाहन

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, जे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तथापि, काही व्यावसायिक त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करण्याच्या उद्देशाने रस्त्याकडील झाडांना खिळे…

जुडो चॅम्पियन लीग स्पर्धा शिवनेरी किंग संघाची बाजी

मुंबई : नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल जी डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो…

बीओबी १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविनने जोविनला चकविले

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविताना जेविन पलायुरने (४.५ गुण) सरस सरासरीच्या बळावर त्याचाच भाऊ जोविन…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४ (प्रतिनिधी/वार्ताहर) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट…

सरकारच्या खोट्या आश्वासना विरोधात अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात

रमेश औताडे   मुंबई : राज्यातील एक लाख १५ हजार अंगणवाडी केंद्रातील सेविकांना व मदतनीस यांना सरकारने ५ हजार रुपये वाढीव देण्याचे आश्वासन मागील अधिवेशन काळात दिले होते. मात्र त्याची…