Category: मुंबई

Mumbai news

मे महिन्यात 1203 अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत असून पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये प्राधान्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या संभाव्य दरडप्रवण क्षेत्रातील झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त्‍ डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांच्या सहा.आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून मे महिन्यात 1203 इतक्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.28 येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण 251 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई केलेली आहे. तसेच नेरुळ विभागात से.9 पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला अशा 90 अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली, मुंबई – पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या 818 अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील 27 अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या 15 झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. दिघा विभागातही ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील 2 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांतील 1203 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

नवनियुक्त खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “वर्षा गायकवाड ही माझी लहान बहिण आहे, तिला लोकसभेत पाठवणार”, हा शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवारांचा १६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून २००४ च्या विजयाची पुनरावृत्ती केली. याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी विजय संपादन केला होता. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवाराचा दणदणित पराभव करत विजय खेचून आणला. यावेळी शिवसेना नेते श्री. अनिल परब, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ. महेश पेडणेकर, संदीप नाईक, वीजू शिंदे आदी उपस्थित होते.

जूनमध्येही मुंबईकर घामाघूम;

सकाळी पाऊस, तर दुपारी उन्हाने होरपळ मुंबई : गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत येण्यास १० जून उजाडण्याची शक्यता असतानाच बुधवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटके बसले. उकाड्याचे प्रमाण अधिक असल्याने जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांची घामाच्या धारांनी अंघोळ होत होती. गुरुवारी शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्य: आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे मान्सून वेळापत्रकानुसार दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचल आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे दक्षिण, अहमदनगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून १० जूनपर्यंतच्या पाच दिवसांदरम्यान कधीही हजेरी लावण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी  बोलताना सांगितले.

मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम;

१४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप मुंबई : जागतिक विद्यापीठांच्या क्यूएस रॅंकिंगमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी)च्या कामगिरीत सुधारणा झाली असून, संस्था १४९ वरून ११८ व्या स्थानावर पोहोचली आहे. ‘आयआयटीने १०० पैकी ५६.३ गुणांची कमाई करत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या १५० संस्थांच्या यादीत इतकी भरीव कामगिरी आयआयटीने प्रथमच केली आहे. विविध नऊ निकषांवर ‘आयआयटी’ची निवड करण्यात आली आहे. भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. त्यात दिल्ली ‘आयआयटी’ (१९७ वरून १५०व्या स्थानावर), बंगळुरू ‘आयआयएससी’ (२२५वरून २११ व्या स्थानावर), खरगपूर ‘आयआयटी’ (२७१ वरून २२२व्या स्थानावर), मद्रास ‘आयआयटी’ (२८५वरून २२७वर), दिल्ली विद्यापीठ (४०७वरून ३२८वर) या संस्थांचा समावेश आहे. एमआयटी सलग १३ व्या वर्षी प्रथम अमेरिकेतील ‘एमआयटी’ने सलग १३ वर्षे आपले स्थान अबाधित ठेवत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर लंडनचे इम्पेरिअल कॉलेज (आधीच्या सहाव्या स्थानावरून दुसऱ्या) आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डने एकत्रितपणे तिसरा रँक मिळवला आहे. तर केंब्रिज दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहे. कोट आयआयटी’ची क्यूएसमधील कामगिरी ३१ गुणांनी सुधारली आहे. हे आमच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे यश आहे. – प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी आयआयटीचे गुण- शिक्षकांची प्रतिष्ठा –  ८६ सायटेशन –  ७९.१ शैक्षणिक प्रतिष्ठा – ५८.५ रोजगारक्षमता – ६४.५ सस्टेनिबीलिटी –  ५२.३ शिक्षक-विद्यार्थी रेशो – १४.४ इंटरनॅशनल फॅकल्टी – ४.३ इंटरनॅशनल रिसर्च नेटव – ५२.३ इंटरनॅशनल स्टुडन्टस – १.३

गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या पूलामुळे

नागरिकांमध्ये  प्रचंड संताप आणि तणाव मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची  दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्येही काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच तणाव अनुभवयाला मिळत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी एक मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका व त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला.  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

8वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा  

अभिजित – काजलला प्रथम मानांकन मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम नरसोबावाडी कोल्हापूर  येथे सुरु होणाऱ्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे पुण्याच्या अभिजित त्रिपनकर व मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात २५६ तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) अभिजित त्रिपनकर ( पुणे ) २) विकास धारिया ( मुंबई ) ३) झैद फारुकी ( ठाणे ) ४) पंकज पवार ( मुंबई ) ५) प्रशांत मोरे ( मुंबई ) ६) रहिम खान ( पुणे  ७) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ८) सागर वाघमारे ( पुणे) महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ) २) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) ३) अंबिका हरिथ ( मुंबई ) ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ५) उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ६) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ७) अंजली सिरीपुरम ( मुंबई ) ८) प्रीती खेडेकर ( मुंबई)

पवईतील ८०० झोपड्यांवर हातोडा

रहिवासी-पोलिसांत संघर्ष घाटकोपरः पवईतील जयभीमनगर झोपडपट्टीतील तब्बल ८०० झोपड्यांवर गुरुवारी  पालिकेने तोडक कारवाई केली. कोणतीही नोटीस न देता मोठा पोलिस फौजफाटा घेऊन पावसाळा तोंडावर असताना ही एकतर्फी कारवाई केल्‍याचा रहिवाशांचा आरोप आहे. ही जागा मोकळी करून एका बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप रहिवाशांनी बोलताना केला.पवईतील जयभीमनगर ही झोपडपट्टी गेल्या २५ वर्षांपासून असून, त्यातील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कारवाई झाल्‍याने आम्‍ही जाणार कुठे, असा सवाल रहिवासी विचारत आहेत. तोडक कारवाईसाठी जवळपास २५० ते ३०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रहिवाशांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा पोलिसांचा आरोप आहे; तर कारवाईला न्यायालयाकडून स्‍थगिती आणण्यासाठी वेळ मागूनही आम्‍हाला दिला नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील एका विकसकाच्या दबावाखाली पालिका, पोलिस आणि राजकारणी झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत, असा रहिवाशांचा आरोप आहे. आम्‍ही गरीब, असहाय झोपडीधारक एकटे पडलो असून कुणीही साथ देण्यास पुढे सरसावत नाही, अशी खंत त्‍यांनी बोलून दाखवली. पवईची ओळख ही मुंबई शहरात उच्चभ्रू परिसर म्हणून असली, तरी येथे अर्ध्यापर्यंत झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. येथे रमाबाई आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर, महात्मा फुलेनगर, मोरारजीनगर, हरिओमनगर आदी…

यश-अपयश सामुहिक जबाबदारी-एकनाथ शिंदे

मुंबई : “निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. मुंबई आणि महाराष्ट्रात जर आपण नीट पाहिले तर मतांची टक्केवारी सारखीच आहे, फक्त जागा कमी जास्त झाल्या आहेत. २ लाख मते आम्हाला जास्त मिळाली होती. पण तरीही यश-अपयश ही आमची…

फडणवीसांची विनंती मान्य होणारी नाही- बावनकुळे

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र फडणवीस यांचा हा निर्णय…

विधानसभेला महाविकास आघाडीच्या 185 जागा येणार : संजय राऊत

मुंबई : “लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना जबाबदारीने मुक्त केलं आहे. त्यांना विधानसभेसाठी मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी १८५ जागा जिंकल्यानंतर कायमची मुक्तता मिळेल. त्यानंतर त्यांना इतर संस्था आहेत. वनवासी आश्रम…