नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनापरवानगी कुठेही लावण्यात येणा-या बॅनर्स / होर्डींगमुळे शहर विद्रुपीकरण होत असून ते रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमार्फत नियमित कारवाई करण्यात येत असते. तथापि मागील दोन दिवसात शहरात मोठया प्रमाणावर बॅनर्स लागले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत धडक मोहीम हाती घेऊन 6 ऑगस्टला एका दिवसात 211 विनापरवानगी बॅनर काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये बेलापूर विभागात 29, नेरुळ विभागात 40, वाशी विभागात 10, तुर्भे विभागात 28, कोपरखैरणे विभागात 18, घणसोली विभागात 42, ऐरोली विभागात 27, दिघा विभागात 17 अशाप्रकारे एकूण 211 विनापरवानगी बॅनरवर धडक कारवाई करण्यात आली.…