Category: मुंबई

Mumbai news

आरटीई कायद्यातील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

एक किमी परिघातील खासगी शाळांना सूट देण्यावर बोट मुंबई : शिक्षण हक्क कायद्यातील राखीव आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा वगळण्याच्या निर्णयाला…

म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडल्यानंतर झालेली वाढ कमी न केल्यामुळे म्हाडावासीयांना भविष्यात लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. भाडेपट्ट्याबाबत नवे धोरण जाहीर झाल्यानंतर म्हाडावासीयांनी जोरदार विरोध केला…

राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात

मुंबई : मागच्या महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या नेतृत्वाचं समर्थन करत राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर…

खळबळजनक

हेमंत करकरेंवर कसाबने नव्हे पोलिसांनीच गोळ्या झाडल्या  विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज खळबळजनक दावा केलाय. २६/११ हल्ल्यात शहीद झालेले आयपीएल अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर कोणत्याही दहशतवाद्याने नाही, तर राष्ट्रीय…

भाजपचं इंजिन बंद पडल्यामुळेच मनसेचं इंजिन घेतलं- जयंत पाटील

मुंबई : भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे…

कसाब बिर्याणीबाबत ॲड. निकम यांचा निर्लज्ज खोटेपणा – सुप्रिया श्रीनेत

मुंबईतील सहाही जागांवर मविआ आणि इंडिया आघाडीचाच विजय. मुंबई : ॲड उज्ज्वल निकम हा खोटारडा आणि निर्लज्ज माणूस आहे. कसाबच्या बिर्याणीबाबत त्यांचा खोटेपणा उघड झाला. खोटेपणाती त्यांनीच कबूली दिलेली आहे. आता पुन्हा हाच माणूस उलच्या उड्या मारतोय. एका मुलीला डावलून भाजपने ॲड. निकम यांना उमेदवारी दिलीय. आता कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना निवडून देत मतदार भाजपाला धडा शिकवतील, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य (CWC), सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख श्रीमती सुप्रिया श्रीनेत यांची विशेष पत्रकार परिषद मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत माहिती त्यांनी दिलीच पण ४०० ची घोषणा करणाऱ्या भाजपने कॉंग्रेसची सत्ता येतेय हे मान्य केलंय असंही सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितलं. मुंबईबाबतच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावे सागले. एक धादांत खोटं बोलणारा आहे. तर दुसरे उमेदवार पियुष गोयल यांना भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाचा ते अवमान करतात. हे गरीबांच्या विरोधातील लोक आहेत. कोळी माणसाचा वासही सहन न होणाऱ्या गोयल यांना सामान्य माणसं धडा शिकवतील. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय ही भाजपला गुंगवणारी चाल आहे. यामुळे भाजपची रणनिती उद्धस्त झाली. आता अमेठीत एक सक्रीय कार्यकर्ता भाजपच्या उमेदवारावर सहज मात करेल, असा दावाही सुप्रिया श्रीनेत यांनी केला. मुंबईत इंडिया आघाडीचे सहाही उमेदवार जिंकणारच. देशभरातलं वातावरण भाजप आणि मोदींच्या विरोधातील आहे. याची जाणीव भाजपला होतेय. म्हणूनच कॉंग्रेस सत्तेवर आल्यास काय करेल याच्या खोट्या वावड्या उठवतायत, असं ठामपणे सांगताना सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षात काहीच काम न झाल्याने ते मोदी आणि भाजपच्या नेत्यांना ते सांगता येत नाहीय. म्हणूनच भाजपनेते कॉंग्रेस आणि राहूल गांधी यांचाच जप करतायत.

मुंबईतला पहिला रोपवे मुलुंड ते एसजीएनपी होणार

पर्यटनमंत्र्यांनी विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना SGNP ला धक्का न लावता रोपवे बांधला जाईल आणि नवीन पर्यटन स्थळ विकसित केले जाईल – कोटेचा मुंबई: लवकरच, मुंबईला एक नवीन पर्यटन स्थळ मिळणार असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जुन्या तीन मूर्ती मंदिरासाठी रोपवे (केबल कार) बांधण्यात येणार आहे. तसेच त्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी एक पर्यटन केंद्र विकसित केले जाणार आहे. मुलुंडचे आमदार आणि मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी तशी मागणी केली असून, सरकारने पर्यटन विभागाला त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे. कोटेचा यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना लिहिलेल्या पत्रात मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या मुलुंड विधानसभा क्षेत्रालगत च्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याना जवळच्या तीन मूर्ती मंदिरकरिता रोप वे ची सुविधा व पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत मागणी केली आहे. पत्रामध्ये कोटीचा यांनी असे म्हटले आहे की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील संरक्षित क्षेत्र असून त्याची व्याप्ती साधारण 87 कीमी परिघात आहे. याच राष्ट्रीय उ‌द्यानाची पूर्वेकडील सीमा माझ्या मुलुंड मतदारसंघाला लागून आहे. मुलुंड मधील नागरीकांना आपल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे मी मुलुंडकर नागरिकांच्या वतीने ही मागणी आपणांकडे करीत आहे. संजय गांधी उ‌द्यानाच्या च्या हद्दीत सुंदर असे डोंगर असून या डोंगर माथ्यावर फार जुने तीन मूर्ती मंदीर आहे या मंदिरात भाविकांना सहज रित्या येता यावे म्हणून तिथे रोप वे व्यवस्था तसेच पर्यटकांना viewing gallery केल्यास भाविकांची व पर्यटकां ची संख्या वाढेल. या सुविधा मुळे शासनास महसूल ही मिळेल. माझ्या ह्या मागणीचा सकारात्मक विचार करून या करीता निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे. कोटेचा यांच्या पत्रानंतर महाजन यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यास करण्याचे आदेश दिले. एप्रिलमध्ये पर्यटन विभागाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संचालक, पर्यटन विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला होता.…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात शिष्यवृत्ती धारकांचे सादरीकरण

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गायन, वादन आणि  नृत्य, यांच्या प्रगत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात; आणि या  विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या अवलोकनासाठी दरवर्षी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीचा कार्यक्रम शनिवार दिनांक ११ मे आणि रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. यात सहभागी होणाऱ्या गायकांना केंद्राचे शिष्यवृत्तीधारक निनाद कुणकवळेकर तबल्याची साथ करणार असून हार्मोनियमची साथ ओमकार अग्निहोत्री यांची असेल. शनिवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात समृद्धी शिंदे – भरतनाट्यम नृत्य ( गुरु – स्नेहल फाटक- कळमकर), कनिष्का पोवळे – गायन (गुरु – प्रतिमा टिळक), सिद्धी शितूत – गायन (गुरु- वरदा गोडबोले), आसावरी गोंधळी – गायन (गुरु – पं. अरुण कशाळकर) हे आपली कला सादर करतील तर रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी १० वाजता सावनी पारेकर ( गुरु – पल्लवी जोशी), अदिश्री पोटे (गुरु – पल्लवी पोटे), प्राजक्ता शेंद्रे (गुरु – पल्लवी जोशी), सावनी गोगटे (गुरु पं. शुभदा पराडकर) यांच्या गायनाचे सादरीकरण होईल. सर्व रसिक श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहून सर्व युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती मुंबई : मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित असल्याचे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच, याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सुधारणा केली आहे. रायगड जिल्ह्यात रायगड आणि मावळ हे दोनच लोकसभा मतदारसंघ असून दोन्हींसाठी अनक्रमे ७ व १३ मे रोजी मतदान होणार आहे. ही बाब लक्षात घेता कायद्याने दोन्ही मतदारसंघात केवळ मतदानाच्या ४८ तासांच्या आधी आणि मतदान संपेपर्यंत मद्यविक्रीला बदी घालता येऊ शकते. दोन्ही मतदारसंघात वेगवेगळ्या दिवशी मतदान होणार असल्याने जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अट लागू करू शकत नाहीत, असेही न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या याचिकेवर निर्णय देताना खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत आणि उरण या विधानसभा मतदारसंघाचा, तर रायगड लोकसभा मतदारसंघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. परंतु, लोकप्रतिनिधी कायद्याच्या संबंधित कलमाला बगल देऊन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात मतदान काळात मद्यविक्रीवर बंदी घालणारा आदेश काढला आहे. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात दिलेल्या आदेशाचा दाखला याचिकाकर्त्यांनी आदेशात सुधारणा करण्याची मागणी करताना दिला होता. दुसरीकडे, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १४२ नुसार जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्रीवर बंदी घालण्याचे अधिकार असून त्यात हस्तक्षेप करता येऊ शकत नाही, असा दावा सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्यांच्या याचिकेला विरोध करताना केला. तथापि, कायद्यानुसार बंदीचा आदेश हा केवळ मतदान क्षेत्रापुरता मर्यादित असून त्यापलीकडे तो लागू केला जाऊ शकत नाही. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना मद्यविक्री बंदीचे आदेश लागू करण्याचा अधिकार असला तरी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अधिकाराला मर्यादा आहेत, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देताना नमूद केले. शिवाय, मद्यविक्री बंदीचा आदेश हा केवळ मतदान काळापुरता मर्यादित असून त्यानंतर तो लागू होऊ शकत नाही, या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. तसेच, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी लागू केलेल्या मद्यविक्रीच्या आदेशात सुधारणा केली. न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश हा ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ७ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत लागू असेल. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहील. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मद्यविक्री बंदीचा आदेश ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लागू होऊन १३ मे रोजी मतदान पूर्ण होईपर्यंत कायम राहील. त्यानंतर, ४ जून रोजी हा आदेश पुन्हा लागू होईल आणि तो निकाल जाहीरपर्यंत कायम राहील.

पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार

मुंबई : उन्हाळी हंगामात, सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५८ मडगाव ते पनवेल विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी सकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी पनवेल येथे सायंकाळी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल येथून ८ मे रोजी पहाटे ४ वाजता निघेल. ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला करमळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलावडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा येथे थांबा आहे. या रेल्वेगाडीला २० एलएचबी डबे असून त्यातील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील. गाडी क्रमांक ०११५९ पनवेल – सावंतवाडी रोड विशेष रेल्वेगाडी ६ मे रोजी रात्री ८ वाजता पनवेल येथून निघेल. दुसऱ्या दिवशी ती गाडी सावंतवाडी रोडला सकाळी ६ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता सावंतवाडी रोडवरून निघेल. दुसऱ्या दिवशी ही गाडी रात्री ३ वाजता पनवेलला पोहोचेल. या रेल्वेगाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथे थांबा असेल. या गाडीला २० एलएचबी डबे असून यामधील १० शयनयान, ८ सामान्य आणि दोन एसएलआर डबे असतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. शिमगा म्हणजेच होळीच्या आधीपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची गर्दी वाढू लागते. त्यामुळे या कालावधीत विशेष गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यंदाही मार्चपासूनच कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या मार्गावर ६ जूनपर्यंत विशेष गाड्या धावतील. कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक दरम्यान, विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी, मंगळवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळावर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.